शहरं
Join us  
Trending Stories
1
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
2
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
3
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
4
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
5
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
6
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
7
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
8
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
9
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
10
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
11
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
12
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
13
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
14
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
15
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
16
“महाराष्ट्र विधानपरिषद देशासाठी आदर्श”; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे कौतुकोद्गार
17
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
18
Mamata Banerjee : "मी माफी मागते"; मेस्सीच्या कार्यक्रमातील गोंधळ पाहून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी नाराज
19
H-1B व्हिसाच्या नव्या नियमांवरुन ट्रम्पच गोत्यात, वॉशिंग्टन ते कॅलिफोर्नियापर्यंत १९ राज्यांनी कोर्टाचा दरवाजा ठोठावला
20
Lionel Messi: सॉल्ट लेक स्टेडियम तोडफोडप्रकरणी आयोजकाला अटक, प्रेक्षकांनाही तिकिटाचे पैसे परत मिळणार!
Daily Top 2Weekly Top 5

मनमोहन सिंग यांच्या पुढाकाराने सांगलीच्या सिंचन योजना मार्गी, योगदानाचे स्मरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2024 16:57 IST

राष्ट्रीय जलआयोगाची मान्यता 

प्रताप महाडिककडेगाव : सांगली जिल्ह्यातील दुष्काळी भागातील टेंभू, ताकारी व म्हैशाळ जलसिंचन योजना मार्गी लावण्यासाठी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी पुढाकार घेतला होता. त्यामुळे उपसा जलसिंचन योजनांना राष्ट्रीय जल आयोगाने लवकर मान्यता दिली होती. त्यामुळे मनमोहन सिंग यांच्याविषयी सांगलीच्या कृषी, सामाजिक व राजकीय क्षेत्रातून कृतज्ज्ञता व्यक्त होत आहे.१९८४ मध्ये मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांन ताकारी योजनेस व त्यानंतर लगेच म्हैसाळ योजनेस मंजुरी मिळाली. यानंतर शिवसेना-भाजप युतीसरकारने १९९६ मध्ये टेंभू योजनेस मान्यता दिली. या योजनांसाठी राज्य सरकारने निधीची तरतूद केली. परंतु, केंद्रीय जल आयोगाच्या मान्यते अभावी केंद्र शासनाचा निधी मिळत नव्हता. २००९ मध्ये मुख्यमंत्री विलासराव देशमुख, तत्कालीन मंत्री पतंगराव कदम, आर. आर. पाटील व अनिल बाबर या नेतेमंडळींनी, तसेच केंद्रीय राज्यमंत्री प्रतिक पाटील यांनी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याकडे पाठपुरावा केला. परिणामी, ९ मे २००९ रोजी केंद्रीय जल आयोगाच्या ९८ व्या बैठकीत ताकारी आणि म्हैसाळ योजनांना केंद्रीय जल आयोगाची मान्यता मिळाली.दरम्यान, १ जुलै २००९ रोजी या योजनांना पर्यावरण विभागाची मान्यता आणि १७ डिसेंबर २००९ रोजी नियोजन आयोगाची मान्यता मिळाली. यामुळे केंद्र सरकारच्या एआयबीपी योजनेतून या योजनांना निधी मिळू लागला. याच कालखंडात २०११ मध्ये टेंभू उपसा सिंचन योजनेसही केंद्रीय जल आयोगाने मान्यता दिली. मनमोहन सिंग यांनी दुष्काळी भागातील सिंचन योजनांना चालना देण्यासाठी व मान्यतेसाठी पुढाकार घेतला होता. त्यामुळे या तिन्ही योजना अंतिम टप्प्यात असून, दुष्काळी भागाचा कायापालट करण्यासाठी त्या प्रभावी ठरत आहेत.

डॉ. मनमोहन सिंग यांनी देशाची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी मोठी भूमिका पार पाडली आहे. त्यांच्या काळातच जिल्ह्यातील सिंचन योजनांना जल आयोगासह केंद्र सरकारच्या आवश्यक त्या मान्यता मिळाल्या. याची जाणीव येथील सर्वसामान्य दुष्काळी जनतेला आहे. त्यांच्या योगदानाबद्दल आम्ही सांगलीकर त्यांचे ऋणी राहू. त्यांचे कार्य सांगलीकरांच्या नेहमीच स्मरणात राहील - आमदार विश्वजित कदम  

मनमोहन सिंग यांच्या मंत्रीमंडळात आम्हाला यंग ब्रिगेडला समावून घेण्यात आले. सांगलीच्या दुष्काळी भागातील उपसा सिंचन योजनांना त्यांनी भरघोस निधी दिला होता. देशभरातील कृषी व ग्रामीण विकासाच्या योजनाकडे त्यांचे बारकाईने लक्ष होते. तसेच, जैन समाजाला अल्पसंख्याक दर्जा त्यांनी मिळवून दिला होता. - प्रतिक पाटील, माजी केंद्रीय राज्यमंत्री.

तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी जागतिक बाजारपेठ खुली करताना त्याचा लाभ सर्वसामान्य शेतकरी व मजुरापर्यंत कसा पोहचले. या दूरदृष्टीने विकासाचे व अर्थिक नियोजन केले होते. तसेच, सर्वसामान्य नागरिक, गरीब व गरजू यांना शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी आधार कार्ड व युपीआय सारख्या संकल्पनाची अंमलबजावणी सुरू केली होती. - गिरीश चितळे, संचालक, बी. जी. चितळे डेअरी.

टॅग्स :SangliसांगलीWaterपाणीdroughtदुष्काळManmohan Singhडॉ. मनमोहन सिंग