शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Update : काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार
2
स्वामी चैतन्यानंद फसवणुकीतही माहिर! लोकांवर प्रभाव पाडण्यासाठी बनावट UN-BRICS कार्ड; धक्कादायक माहिती उघड
3
Tamilnadu Stampede : "अभिनेत्याला यायला उशीर, पाण्याची कमतरता आणि..."; चेंगराचेंगरीबद्दल काय म्हणाले पोलीस?
4
IND vs PAK Final, Asia Cup 2025: फायनलमध्ये पाकिस्तानविरोधात भारताचा रेकॉर्ड फारसा चांगला नाही; आजपर्यंत १० वेळा भिडला, पण...
5
'पीएम किसान'चा २१ वा हप्ता जाहीर! ३ राज्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कधी?
6
IND vs PAK Final, Asia Cup 2025: भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
7
Video - तामिळनाडूतील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह पाहून शिक्षणमंत्री ढसाढसा रडले
8
LPG ते पेन्शन, UPI पासून रेल्वे तिकीटापर्यंत... १ ऑक्टोबरपासून 'हे' ५ नियम बदलणार
9
आधी मसाज करायला आले अन्..; हायकोर्टाच्या वकिलाकडून ब्लॅकमेलिंगद्वारे पैसे उकळले!
10
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
11
वाट चुकलेले दुचाकीस्वार थेट बेलापूर खाडीत; दोन महिन्यांतील दुसरी घटना; एक जण गेला वाहून
12
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वामी चैतन्यानंद यांना अटक; पोलिसांनी आग्र्यातून ताब्यात घेतले
13
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
14
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
15
"एकेकाळी कौतुक करणारे लोक आज...", सलमान खानचा अप्रत्यक्षपणे अभिनव कश्यपवर निशाणा
16
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
17
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
18
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
19
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
20
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी

विधानसभेच्या निमित्ताने पुन्हा कॉँग्रेसअंतर्गत गटबाजीस धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2019 15:20 IST

लोकसभा निवडणुकीत अनुभवास आलेली कॉँग्रेसमधील गटबाजी विधानसभा निवडणुकीतही कायम आहे. दोन वेगवेगळे गट दोन वेगवेगळ्या उमेदवारांना तिकीट मिळावे म्हणून कार्यरत आहेत. मदनभाऊ पाटील गटाने मेळावा घेऊन स्वतंत्र चूल मांडली आहे.

ठळक मुद्देविधानसभेच्या निमित्ताने पुन्हा कॉँग्रेसअंतर्गत गटबाजीस धारमदनभाऊ पाटील गटाने मांडली स्वतंत्र चूल

सांगली : लोकसभा निवडणुकीत अनुभवास आलेली कॉँग्रेसमधील गटबाजी विधानसभा निवडणुकीतही कायम आहे. दोन वेगवेगळे गट दोन वेगवेगळ्या उमेदवारांना तिकीट मिळावे म्हणून कार्यरत आहेत. मदनभाऊ पाटील गटाने मेळावा घेऊन स्वतंत्र चूल मांडली आहे.एकीकडे कॉँग्रेस-राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांचे सूर जुळत असताना, कॉँग्रेसअंतर्गत गटबाजीने तोंड वर काढले आहे. लोकसभा निवडणुकीत अशाच भांडणातून सांगलीची जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला गेली होती.

एकत्रित येऊन कॉँग्रेसचे नेते कोणताही निर्णय घेत नसल्याने पक्षाशी प्रामाणिक असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था वाढली आहे. दीड महिन्यापूर्वी कॉँग्रेस भवनात झालेल्या बैठकीत दादा गटातील काही कार्यकर्त्यांनी शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर वातावरण शांत होते, मात्र गटबाजी धुमसतच होती.

पृथ्वीराज पाटील यांच्या समर्थकांनी उमेदवारीसाठी तसेच निवडणुकीच्या तयारीसाठी प्रयत्न चालविले असताना, मंगळवारी मदन पाटील यांच्या समर्थकांनी जयश्रीताई पाटील यांच्या उमेदवारीसाठी मेळावा घेतला.

या मेळाव्याला पृथ्वीराज पाटील यांना निमंत्रण देण्यात आले नव्हते. उमेदवारीची मागणी करणे किंवा त्यासाठी बैठका घेणे यात गैर काही नसले तरी, तिकीट न मिळाल्यास प्रत्येकवेळी कॉँग्रेसमधील एखादा गट नाराज होत असतो. कोणालाही उमेदवारी मिळाल्यास त्यांचा प्रचार करू, असे पृथ्वीराज पाटील यांनी स्पष्ट केले आहे, मात्र मदनभाऊ पाटील गटाने स्वतंत्र चूल मांडली आहे.

सर्वांना सोबत घेऊन एकसंधपणे लढण्यासाठी त्या गटाची मानसिकता दिसत नसल्याचे चित्र आहे. काँग्रेसच्या प्रदेश कार्यकारिणीनेही अनेकदा गटबाजी संपविण्यासाठी प्रयत्न केले, मात्र त्यांना यश आलेले नाही.

टॅग्स :congressकाँग्रेसPoliticsराजकारणSangliसांगली