शहरं
Join us  
Trending Stories
1
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
2
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
3
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
4
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
5
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
6
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
7
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
8
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
9
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
10
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय
11
फक्त एक मिस्ड कॉल किंवा SMS द्वारे PF बॅलन्स तपासा; कुठेही लॉगइन करण्याची गरज नाही
12
'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
13
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक
14
मुलगा देशसेवेसाठी दिलाय;काही झालं तर मन घट्ट केलंय! कर्नल नितीन काळदाते यांच्या आईची कृतार्थ भावना
15
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
16
IPL Re-Start : फायनल ठरलेल्या दिवशीच खेळवण्याचा प्लॅन; पण ते कसं शक्य होईल?
17
पाकिस्तानकडून युद्धविरामचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
18
"बुद्धिमत्तापूर्ण आणि संतुलित"; पी चिदंबरम यांनी पंतप्रधान मोदींच्या युद्ध धोरणाचं केलं भरभरुन कौतुक
19
पुन्हा समोर आला पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा; युद्धविरामानंतर रात्री काय-काय घडलं? जाणून घ्या
20
भीषण! भरधाव कारने घराबाहेर बसलेल्या महिलेसह ४ मुलांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video

विधानसभेच्या निमित्ताने पुन्हा कॉँग्रेसअंतर्गत गटबाजीस धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2019 15:20 IST

लोकसभा निवडणुकीत अनुभवास आलेली कॉँग्रेसमधील गटबाजी विधानसभा निवडणुकीतही कायम आहे. दोन वेगवेगळे गट दोन वेगवेगळ्या उमेदवारांना तिकीट मिळावे म्हणून कार्यरत आहेत. मदनभाऊ पाटील गटाने मेळावा घेऊन स्वतंत्र चूल मांडली आहे.

ठळक मुद्देविधानसभेच्या निमित्ताने पुन्हा कॉँग्रेसअंतर्गत गटबाजीस धारमदनभाऊ पाटील गटाने मांडली स्वतंत्र चूल

सांगली : लोकसभा निवडणुकीत अनुभवास आलेली कॉँग्रेसमधील गटबाजी विधानसभा निवडणुकीतही कायम आहे. दोन वेगवेगळे गट दोन वेगवेगळ्या उमेदवारांना तिकीट मिळावे म्हणून कार्यरत आहेत. मदनभाऊ पाटील गटाने मेळावा घेऊन स्वतंत्र चूल मांडली आहे.एकीकडे कॉँग्रेस-राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांचे सूर जुळत असताना, कॉँग्रेसअंतर्गत गटबाजीने तोंड वर काढले आहे. लोकसभा निवडणुकीत अशाच भांडणातून सांगलीची जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला गेली होती.

एकत्रित येऊन कॉँग्रेसचे नेते कोणताही निर्णय घेत नसल्याने पक्षाशी प्रामाणिक असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था वाढली आहे. दीड महिन्यापूर्वी कॉँग्रेस भवनात झालेल्या बैठकीत दादा गटातील काही कार्यकर्त्यांनी शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर वातावरण शांत होते, मात्र गटबाजी धुमसतच होती.

पृथ्वीराज पाटील यांच्या समर्थकांनी उमेदवारीसाठी तसेच निवडणुकीच्या तयारीसाठी प्रयत्न चालविले असताना, मंगळवारी मदन पाटील यांच्या समर्थकांनी जयश्रीताई पाटील यांच्या उमेदवारीसाठी मेळावा घेतला.

या मेळाव्याला पृथ्वीराज पाटील यांना निमंत्रण देण्यात आले नव्हते. उमेदवारीची मागणी करणे किंवा त्यासाठी बैठका घेणे यात गैर काही नसले तरी, तिकीट न मिळाल्यास प्रत्येकवेळी कॉँग्रेसमधील एखादा गट नाराज होत असतो. कोणालाही उमेदवारी मिळाल्यास त्यांचा प्रचार करू, असे पृथ्वीराज पाटील यांनी स्पष्ट केले आहे, मात्र मदनभाऊ पाटील गटाने स्वतंत्र चूल मांडली आहे.

सर्वांना सोबत घेऊन एकसंधपणे लढण्यासाठी त्या गटाची मानसिकता दिसत नसल्याचे चित्र आहे. काँग्रेसच्या प्रदेश कार्यकारिणीनेही अनेकदा गटबाजी संपविण्यासाठी प्रयत्न केले, मात्र त्यांना यश आलेले नाही.

टॅग्स :congressकाँग्रेसPoliticsराजकारणSangliसांगली