कवठेएकंदमध्ये आता कारभारी निवडीकडे लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:26 IST2021-02-05T07:26:55+5:302021-02-05T07:26:55+5:30
येथील ग्रामपंचायतीच्या अटीतटीच्या निवडणुकीनंतर सरपंच आरक्षणाबबत उत्सुकता होती. निवडणुकीमध्ये सत्ताधारी राष्ट्रवादीला पराभूत करून शेतकरी कामगार पक्ष व ...

कवठेएकंदमध्ये आता कारभारी निवडीकडे लक्ष
येथील ग्रामपंचायतीच्या अटीतटीच्या निवडणुकीनंतर सरपंच आरक्षणाबबत उत्सुकता होती. निवडणुकीमध्ये सत्ताधारी राष्ट्रवादीला पराभूत करून शेतकरी कामगार पक्ष व भाजपच्या ग्रामविकास पॅनेलने १७ पैकी १३ जागा मिळवत बाजी मारली. ग्राम विकास पॅनलच्या शेतकरी कामगार पक्षाच्या आठ तर भाजपच्या पाच जागा आहेत. सरपंचपद पहिली अडीच वर्ष शेतकरी कामगार पक्षाकडे; तर नंतरची अडीच वर्षे भाजपकडे राहणार आहे. सरपंच आरक्षण सर्वसाधारण पुरुष पडल्याने शेतकरी कामगार पक्ष्याकडील प्रभाग पाच मधील निवडून आलेले राजेंद्र धनपाल शिरोटे, प्रभाग एकमधील अशोक शंकर माळी, प्रभाग सहामधील चंद्रकांत धोंडीराम नागजे यांच्यासह अनेक जण दावेदार राहणार आहेत.
चाैकट
कार्यक्षम चेहरा देण्यासाठी प्रयत्न
गेल्या पाच वर्षांच्या अस्थिर कारभाराला चोख प्रतिउत्तर देत मतदारांनी ग्रामविकास पॅनेलला पसंती दिली आहे. त्यामुळे गावच्या अनेक समस्यांबाबत नव्या सरपंच, पदाधिकाऱ्यांसमोर आव्हान आहे. त्यामुळे कार्यक्षम चेहरा देण्यासाठी प्रयत्न असणार आहे. यामुळे सरपंच कोण होणार? याबाबत ग्रामस्थांमध्ये उत्सुकता आहे.