शहरं
Join us  
Trending Stories
1
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
2
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
3
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
4
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
5
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
6
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
7
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
8
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
9
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
10
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
11
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
12
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
13
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
14
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
15
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
16
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
17
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
18
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
19
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
20
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
Daily Top 2Weekly Top 5

निकृष्ट बियाणेप्रकरणी तीन कंपन्यांना नोटिसा

By admin | Updated: July 16, 2015 23:29 IST

जिल्हा परिषद : कृषी समिती बैठकीत अधिकाऱ्यांवर सदस्यांचा हल्लाबोल

सांगली : आटपाडी व कवठेमहांकाळ तालुक्यातील शेतकऱ्यांना पुरवठा करण्यात आलेले कापसाचे बियाणे निकृष्ट असल्याचे निष्पन्न झाले आहे. तरीही याकडे जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने दुर्लक्ष केल्यावरून सदस्यांनी त्यांना चांगलेच धारेवर धरले. कार्यालयात बसून अहवाल न करता शेतकऱ्यांच्या बांधावर जाण्याची सूचनाही सदस्यांनी अधिकाऱ्यांना केली. याप्रकरणी संबंधित तीन कंपन्यांनी शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, यासाठी नोटिसा बजाविण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या कृषी समिती सभेत शुक्रवारी घेण्यात आला. सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती मनीषा पाटील होत्या. आटपाडी तालुक्यातील ७००, तर कवठेमहांकाळ तालुक्यातील ७० शेतकऱ्यांना कापसाचे बियाणे पुरविण्यात आले होते. हे बियाणे निकृष्ट असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी जिल्हा परिषदेकडे केल्या होत्या. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने या बियाणांचे नमुने राहुरी कृषी विद्यापीठाकडे तपासणीसाठी पाठविले होते. त्याचा अहवाल प्राप्त झाला असून बियाणांची उत्पादन क्षमता कमी असल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी कृषी समिती बैठकीत सदस्यांनी आक्रमक भूमिका घेतली. कृषीधन (सुपर फायबर बियाणे), ग्रीन गोल्ड (कविता गोल्ड), तर वर्धा येथील दफ्तरी सीड या बियाणांच्या कंपन्यांना नोटिसा बजावण्याचे आदेश सभापती मनीषा पाटील यांनी दिले. या कंपन्यांनी निकृष्ट बियाणे दिल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करून संबंधित शेतकऱ्यांना संबंधित कंपन्यांकडून तातडीने नुकसान भरपाई मिळवून द्यावी, असेही आदेश यावेळी देण्यात आले. जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. खरीप हंगाम वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यावरही सभेत चर्चा झाली. जिल्ह्यातील तीन लाख ९२ हजार हेक्टरपैकी २ लाख ६७ हजार हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली आहे. पावसाअभावी पिके करपू लागली आहेत. त्यामुळे शासनाने या पिकांचा पंचनामा करून शेतकऱ्यांना मदत द्यावी, असा ठराव करण्यात आला. (प्रतिनिधी)ग्रामसेवकांना नोटिसाइको व्हिलेजअंतर्गत प्रचारसाहित्य खरेदीप्रकरणी वाळवा तालुक्यातील ६४ ग्रामसेवकांना नोटिसा बजाविल्या आहेत. इको व्हिलेज अभियानात फलक खरेदी करण्यात आली होती. त्यात ४ लाख ७८ हजार रुपयांची अनियमितता होती. याप्रकरणी पूर्वी ग्रामसेवकांना नोटिसा बजाविल्या होत्या. आता विभागीय चौकशी का करू नये?, अशी नोटीस बजाविली आहे.