शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

भाजपवासी झालेल्यांकडून काँग्रेसचा राजीनामा नाही! : विधानसभेनंतर पुन्हा चर्चा सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2019 19:19 IST

दरम्यान, रेड येथे १५ सप्टेंबररोजी काँग्रेसची बैठक झाली होती. त्यामध्ये काँग्रेसचे तत्कालीन प्रदेश सरचिटणीस सत्यजित देशमुख यांच्यासह पदाधिकारी, सदस्यांनी काँग्रेसच्या सर्व पदांचा राजीनामा दिल्याचे जाहीर केले होते. यानंतर देशमुख यांनी कोकरूड जिल्हा परिषद सदस्य पदाचाही राजीनामा दिला होता.

ठळक मुद्दे शिराळा तालुक्यातील चित्र

विकास शहाशिराळा : विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसमधील काही जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र त्यांनी अद्याप पदाचा राजीनामा दिलेला नाही. त्यामुळे हे सदस्य अद्यापही काँग्रेसमध्ये आहेत, की भाजपमध्ये, याची चर्चा सध्या मतदारसंघात सुरू आहे.

गत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीवेळी काँग्रेस व राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष वेगवेगळे लढले होते. फक्त या तालुक्यात काँग्रेस आघाडी म्हणजे काँग्रेसचे नेते शिवाजीराव देशमुख व राष्टÑवादीचे आमदार मानसिंगराव नाईक गट एकत्र, तर त्यांच्याविरुद्ध भाजपमधून माजी आमदार शिवाजीराव नाईक गट अशी लढत झाली होती. यामध्ये जिल्हा परिषदेच्या चारपैकी प्रत्येकी दोन जागा काँग्रेस व राष्ट्रवादीने जिंकल्या होत्या, तर पंचायत समितीच्या आठ जागांपैकी चार राष्ट्रवादी, तीन काँग्रेस व एक जागा भाजपने जिंकली होती.

दरम्यान, रेड येथे १५ सप्टेंबररोजी काँग्रेसची बैठक झाली होती. त्यामध्ये काँग्रेसचे तत्कालीन प्रदेश सरचिटणीस सत्यजित देशमुख यांच्यासह पदाधिकारी, सदस्यांनी काँग्रेसच्या सर्व पदांचा राजीनामा दिल्याचे जाहीर केले होते. यानंतर देशमुख यांनी कोकरूड जिल्हा परिषद सदस्य पदाचाही राजीनामा दिला होता. आता या जिल्हा परिषद गटाची निवडणूक घेण्याच्यादृष्टीने शासकीय पातळीवर तयारी सुरू झाली आहे. मात्र पणुंब्रे तर्फ वारूण गटाच्या जिल्हा परिषद सदस्या शारदा पाटील, पंचायत समितीच्या सभापती माया कांबळे (मांगले), अमर पाटील (बिळाशी), पांडुरंग पाटील (आरळा) हे तीन पंचायत समिती सदस्य काँग्रेसच्या उमेदवारीवर निवडून आले आहेत. त्यांनी मात्र अद्याप राजीनामा दिलेला नाही. त्यामुळे हे चौघे अजून काँग्रेसचे की भाजपचे आहेत, याची चर्चा सुरू आहे....म्हणून देशमुख यांचा राजीनामासत्यजित देशमुख यांना भाजपकडून विधानसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता होती. जर त्यांना काँग्रेसने पक्षातून काढले असते व त्यांच्यावर पक्षीय कारवाई झाली असती, तर त्यांना सहा वर्षे निवडणूक लढवता आली नसती. त्यामुळे त्यांनी पदाचा लगेच राजीनामा दिला होता, असे देशमुख गटाच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.तिघात लढतीची शक्यताशिराळा तालुक्यात कोकरूड जिल्हा परिषद गटव २४ ठिकाणी ग्रामपंचायतीची पोटनिवडणूक होणार आहे. त्यापैकी जिल्हा परिषद निवडणूक भाजपच्या अस्मितेची, तर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या प्रतिष्ठेची असणार आहे. कोकरूड गट काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. आता सत्यजित देशमुख यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने येथे काँग्रेसची उमेदवारी कोणाला, असा प्रश्न आहे. तर सद्यस्थितीत भाजप, राष्ट्रवादी-कॉँग्रेस व महाडिक युवा शक्ती यांच्यात लढतीची शक्यता वर्तविली जात आहे.

 

टॅग्स :PoliticsराजकारणSangliसांगलीcongressकाँग्रेस