शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
2
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
3
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
4
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
5
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
6
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
7
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
8
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
9
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
10
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
11
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
12
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
13
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
14
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
15
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
16
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
17
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
18
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
19
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
20
VIDEO: दोन बैलांमध्ये भांडण, स्कूटीवाल्या मुलीला बसली जोरदार धडक, ती रस्त्यावर पडली अन् मग...

भारतीय संविधान कोणीच बदलू शकत नाही, गोपीचंद पडळकरांनी व्यक्त केले स्पष्ट मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2022 13:58 IST

भारतीय संविधानानेच देशांमध्ये लोकशाही मूल्यांची रुजवणूक करून हजारो वर्षे प्रस्थापितांच्या गुलामीत असणाऱ्या भारत देशाला स्वाभिमानी बनविले.

आटपाडी : भारतीय संविधानानेच देशांमध्ये लोकशाही मूल्यांची रुजवणूक करून हजारो वर्षे प्रस्थापितांच्या गुलामीत असणाऱ्या भारत देशाला स्वाभिमानी बनविले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या भारतीय संविधानाला देशातील कोणताही राजकीय पक्ष बदलू शकत नाही, असे प्रतिपादन आ. गोपीचंद पडळकर यांनी आटपाडीत फुले-शाहू-आंबेडकर विचारमंच आयोजित भारतीय संविधान जनजागृती सप्ताह उद्घाटनप्रसंगी केले.व्याख्यानमालेच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख, भवानी एज्युकेशन सोसायटीचे रावसाहेब पाटील, अनिल पाटील, नवनीत लोंढे, साहेबराव चवरे, नंदकुमार केंगार, लक्ष्मण मोटे उपस्थित होते.आ. पडळकर म्हणाले की, आटपाडीमध्ये सुरू असणारा संविधान सप्ताह पुढील वर्षांपासून मोठ्या स्वरूपात राबविणार आहे. बहुजनांचे नाव घेऊन अनेक नेत्यांनी स्वत:चा उद्धार करून घेतला आहे. ओबीसी समाजाचे राजकीय अस्तित्व संपवण्याचे काम काही मंडळींनी राजकीय द्वेषापोटी केले.देशमुख म्हणाले की, खुल्या गटामध्ये संविधानावर आधारित स्पर्धा घेण्यात यावी. त्यामुळे भारतीय संविधानाबद्दल जनजागृती घडून येण्यास मदत होईल.आंबेवाडीचे सुपुत्र सेवानिवृत्त मेजर महादेव शेलार यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन, तर कौठुळीचे सुपुत्र सेंट्रल बँकेचे व्यवस्थापक डी. एस. सावंत यांना समाजभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले.रिपाइंचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात यांनी स्वागत, प्रा. डॉ. रामदास नाईकनवरे यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन विजय पवार यांनी केले. अर्चना काटे यांनी आभार मानले. यावेळी तुषार लोंढे, धनंजय वाघमारे, हनुमंत खिलारी, सुरेश मोटे, रणजित ऐवळे, समाधान ऐवळे, विवेक सावंत, शरद वाघमारे उपस्थित होते.आरक्षणाचे राजकारणमॉरिशस येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, विचारवंत प्रा. डॉ. प्रकाश कुंभार यांनी ‘ओबीसी आरक्षण आणि भारतीय संविधान’ या विषयावर मार्गदर्शन केले. एका रात्रीमध्ये सरकार बदलता येते, पण राज्यघटना बदलता येत नाही. सर्वच राजकीय पक्षांकडून ओबीसी आरक्षणाचे राजकारण चालू आहे, पण ते पूर्ण क्षमतेने देण्याचा प्रयत्न होत नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

टॅग्स :SangliसांगलीGopichand Padalkarगोपीचंद पडळकर