शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

बड्यांना माफी अन् शेतकऱ्यांवर जप्तीची कारवाई का?; सांगलीत जिल्हा बँकेसमोर ‘स्वाभिमानी’चा शंखध्वनी

By अशोक डोंबाळे | Updated: January 29, 2024 18:53 IST

सांगली : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या बड्या थकबाकीदारांना कर्ज माफी दिली जात आहे. तसेच थकीत पीक कर्जदार शेतकऱ्यांच्या मालमत्तेवर बँकेकडून ...

सांगली : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या बड्या थकबाकीदारांना कर्ज माफी दिली जात आहे. तसेच थकीत पीक कर्जदार शेतकऱ्यांच्या मालमत्तेवर बँकेकडून जप्तीची कारवाई होत आहे. या घटनेच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी सांगलीत जिल्हा बँकेच्या मुख्य कार्यालयासमोर सोमवारी शखध्वनी आंदोलन करून प्रवेशद्वारात ठिय्या मारला. बँक प्रशासनाच्या भूमिकेबद्दल शेतकऱ्यांनी जोरदार घोषणा दिल्या.जिल्हा बँकेच्या प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले की, जिल्ह्यातील खासदार, आजी-माजी आमदार आणि पुढाऱ्यांची कोट्यवधींची कर्जे थकीत आहेत. जिल्ह्यातील साखर कारखाने आणि सूतगिरण्याची सुमारे एक हजार कोटीची थकीत कर्जे आहेत. अनेक कारखाने, सूतगिरण्या बंद आहेत, त्याच्यावर जप्तीची कारवाई होत नाही. त्यांना बँकेचे अधिकारी पायघड्या घालत आहेत. शेतकऱ्यांवर मात्र तातडीने जप्तीची कारवाई केली जाते, हे चालू देणार नाही. प्रथम बड्या नेत्यांची कर्जे वसूल करा, मग शेतकऱ्यांची थकबाकी वसूल करा, अशी मागणी केली.स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष पोपट मोरे म्हणाले, जिल्हा बँकेची हुकूमशाही पद्धतीने शेतकऱ्यांची कर्ज वसुली चालू आहे. या विरोधात आणखी तीव्र आवाज उठविण्यात येणार आहे. यावेळी संजय बेले, राजेंद्र पाटील, अजित हलिगले, भरत चौगुले, बाळासाहेब लिंबेकाई, गुलाब यादव, सुनील पाटील, मच्छिंद्र पाटील, सुधाकर पाटील, पीरगोंडा पाटील आदींसह शेतकरी उपस्थित होते.

जिल्हा बँकेला टाळे ठोकणार : महेश खराडेजिल्हा बँकेच्या प्रशासनाने आदी बड्या थकबाकीदारांवर कारवाई केली पाहिजे. त्यानंतरच शेतकऱ्यांवर कारवाई करण्याची गरज आहे. प्रशासनाने शेतकऱ्यांविरोधातील जप्तीची कारवाई थांबविली नाही तर जिल्हा बँकेच्या कार्यालयाला टाळे ठोकण्यात येईल, असा इशारा स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिला.

टॅग्स :SangliसांगलीSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाbankबँक