शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
2
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
3
यूएईकडून भारताला धोका? ६००० कोटींच्या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार दुबईतून गायब; सुप्रीम कोर्ट संतापले
4
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
5
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
6
प्रणित मोरे आज परत येतोय? 'बिग बॉस १९' मध्ये मोठा ट्विस्ट; सोशल मीडियावर चर्चांना उधाण
7
लर्निंग लायसन्सचे ऑडिट कधी होणार? 'फेसलेस' प्रणालीमध्ये गंभीर त्रुटी उघड तरीही विभाग गप्प
8
अखेर सूरज चव्हाणने दाखवला होणाऱ्या बायकोचा चेहरा! अंकिता वालावलकरच्या घरी झालं केळवण, पाहा व्हिडीओ
9
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
10
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
11
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
12
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
13
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
14
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
15
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
16
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
17
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
18
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
19
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
20
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 

साडेचार हजार शेतकऱ्यांचे ठिबकचे नऊ कोटी थकित-: जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 23:10 IST

केंद्र पुरस्कृत सूक्ष्म सिंचन योजना अभियानांतर्गत राज्यात सूक्ष्म सिंचन योजना राबिवण्यात येत आहे. यासाठी केंद्राकडून ८० टक्के व राज्य सरकारकडून २० टक्के खर्च केला जात आहे.

ठळक मुद्देशासनाकडे प्रयत्न करून शेतकरी थकले

सांगली : पाण्याचा अतिरिक्त वापर कमी व्हावा व जमिनीची सुपिकता कायम रहावी, यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने अनुदानावर ठिबक सिंचन योजना सुरू केली आहे. या योजनेतून जिल्ह्यातील चार हजार ७३ लाभार्थींनी लाभ घेऊन अनुदानासाठी २०५-१६ मध्ये प्रस्ताव कृषी विभागाकडे पाठविले आहेत.

या लाभार्थींचे नऊ कोटी २० लाख थकीत असून, चार वर्षांत शेतकऱ्यांनी पाठपुरावा करूनही त्यांना अद्याप अनुदान मिळाले नाही. शेतकºयांच्या या प्रश्नाकडे लोकप्रतिनिधी केव्हा लक्ष देणार, असा प्रश्नही शेतकºयांनी उपस्थित केला आहे.केंद्र पुरस्कृत सूक्ष्म सिंचन योजना अभियानांतर्गत राज्यात सूक्ष्म सिंचन योजना राबिवण्यात येत आहे. यासाठी केंद्राकडून ८० टक्के व राज्य सरकारकडून २० टक्के खर्च केला जात आहे. ठिबक सिंचन योजनेतंर्गत अल्पभूधारक शेतकºयाला ६०, तर बहुभूधारकाला ५० टक्के अनुदान देण्यात येत आहे. २०१५-१६ मध्ये जिल्ह्यातील चार हजार ७३ शेतकºयांनी प्रत्यक्ष ठिबक सिंचन बसवल्यानंतर कृषी कार्यालयाकडे अनुदानासाठी प्रस्ताव पाठविले होते. मात्र प्रस्ताव मंजूर होऊन व ठिबक सिंचन बसवूनही शेतकºयांना अनुदान मिळालेले नाही. ही रक्कम तब्बल नऊ कोटी वीस लाख रुपये असल्यामुळे अनेक शेतकरी या अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत.

वारंवार शेतकरी अनुदानासाठी शासकीय कार्यालयांकडे फेºया मारुनही त्यांना अद्याप अनुदानाचा लाभ मिळाला नाही. शासकीय यंत्रणेच्या या धोरणामुळे योजनेला खीळ बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.पाण्याच्या अतिरिक्त वापरामुळे वाळवा, मिरज, पलूस या तालुक्यातील एक लाखाहून अधिक एकर जमीन क्षारपड झाली आहे. क्षारपड जमिनीचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन शेतकरी ठिबक सिंचनकडे वळला आहे. परंतु, सरकारच या शेतकºयांना प्रोत्साहन देण्याऐवजी अनुदान देण्यास टाळाटाळ करून त्यांची आर्थिक कोंडीच केली जात आहे, असा शेतकºयांनी आरोप केला आहे.

शासनाचे शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष : पाटीलठिबक सिंचनसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याऐवजी त्यांची आर्थिक कोंडी करणे शासनाने बंद करावे. प्रोत्साहन सादर केलेल्या सर्वच शेतकºयांना शासनाने ठिबक सिंचन योजनेचा लाभ दिला पाहिजे. थकीत शेतकºयांना त्वरित अनुदान दिले नाही, तर आम्ही तीव्र आंदोलन छेडणार आहे, असा इशारा नांद्रे (ता. मिरज) येथील शेतकरी महावीर पाटील यांनी दिला आहे.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे थकित अनुदानतालुका शेतकरी संख्याआटपाडी १०७जत ७७२कडेगाव ५७३खानापूर २४३क़वठेमहांकाळ २२०मिरज ७३४पलूस ४२५शिराळा ९३तासगाव ३४३वाळवा ५६३एकूण ४०७३

टॅग्स :Farmerशेतकरीgovernment schemeसरकारी योजना