शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
6
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
7
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
8
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
9
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
10
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
11
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
12
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
13
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
14
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
15
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
16
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
17
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
18
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
19
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
20
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव

साडेचार हजार शेतकऱ्यांचे ठिबकचे नऊ कोटी थकित-: जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 23:10 IST

केंद्र पुरस्कृत सूक्ष्म सिंचन योजना अभियानांतर्गत राज्यात सूक्ष्म सिंचन योजना राबिवण्यात येत आहे. यासाठी केंद्राकडून ८० टक्के व राज्य सरकारकडून २० टक्के खर्च केला जात आहे.

ठळक मुद्देशासनाकडे प्रयत्न करून शेतकरी थकले

सांगली : पाण्याचा अतिरिक्त वापर कमी व्हावा व जमिनीची सुपिकता कायम रहावी, यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने अनुदानावर ठिबक सिंचन योजना सुरू केली आहे. या योजनेतून जिल्ह्यातील चार हजार ७३ लाभार्थींनी लाभ घेऊन अनुदानासाठी २०५-१६ मध्ये प्रस्ताव कृषी विभागाकडे पाठविले आहेत.

या लाभार्थींचे नऊ कोटी २० लाख थकीत असून, चार वर्षांत शेतकऱ्यांनी पाठपुरावा करूनही त्यांना अद्याप अनुदान मिळाले नाही. शेतकºयांच्या या प्रश्नाकडे लोकप्रतिनिधी केव्हा लक्ष देणार, असा प्रश्नही शेतकºयांनी उपस्थित केला आहे.केंद्र पुरस्कृत सूक्ष्म सिंचन योजना अभियानांतर्गत राज्यात सूक्ष्म सिंचन योजना राबिवण्यात येत आहे. यासाठी केंद्राकडून ८० टक्के व राज्य सरकारकडून २० टक्के खर्च केला जात आहे. ठिबक सिंचन योजनेतंर्गत अल्पभूधारक शेतकºयाला ६०, तर बहुभूधारकाला ५० टक्के अनुदान देण्यात येत आहे. २०१५-१६ मध्ये जिल्ह्यातील चार हजार ७३ शेतकºयांनी प्रत्यक्ष ठिबक सिंचन बसवल्यानंतर कृषी कार्यालयाकडे अनुदानासाठी प्रस्ताव पाठविले होते. मात्र प्रस्ताव मंजूर होऊन व ठिबक सिंचन बसवूनही शेतकºयांना अनुदान मिळालेले नाही. ही रक्कम तब्बल नऊ कोटी वीस लाख रुपये असल्यामुळे अनेक शेतकरी या अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत.

वारंवार शेतकरी अनुदानासाठी शासकीय कार्यालयांकडे फेºया मारुनही त्यांना अद्याप अनुदानाचा लाभ मिळाला नाही. शासकीय यंत्रणेच्या या धोरणामुळे योजनेला खीळ बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.पाण्याच्या अतिरिक्त वापरामुळे वाळवा, मिरज, पलूस या तालुक्यातील एक लाखाहून अधिक एकर जमीन क्षारपड झाली आहे. क्षारपड जमिनीचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन शेतकरी ठिबक सिंचनकडे वळला आहे. परंतु, सरकारच या शेतकºयांना प्रोत्साहन देण्याऐवजी अनुदान देण्यास टाळाटाळ करून त्यांची आर्थिक कोंडीच केली जात आहे, असा शेतकºयांनी आरोप केला आहे.

शासनाचे शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष : पाटीलठिबक सिंचनसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याऐवजी त्यांची आर्थिक कोंडी करणे शासनाने बंद करावे. प्रोत्साहन सादर केलेल्या सर्वच शेतकºयांना शासनाने ठिबक सिंचन योजनेचा लाभ दिला पाहिजे. थकीत शेतकºयांना त्वरित अनुदान दिले नाही, तर आम्ही तीव्र आंदोलन छेडणार आहे, असा इशारा नांद्रे (ता. मिरज) येथील शेतकरी महावीर पाटील यांनी दिला आहे.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे थकित अनुदानतालुका शेतकरी संख्याआटपाडी १०७जत ७७२कडेगाव ५७३खानापूर २४३क़वठेमहांकाळ २२०मिरज ७३४पलूस ४२५शिराळा ९३तासगाव ३४३वाळवा ५६३एकूण ४०७३

टॅग्स :Farmerशेतकरीgovernment schemeसरकारी योजना