शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
3
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
4
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
5
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
6
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
7
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
8
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
9
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
10
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
11
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
12
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
13
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
14
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
15
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
16
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
17
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
18
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
19
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
20
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास

साडेचार हजार शेतकऱ्यांचे ठिबकचे नऊ कोटी थकित-: जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 23:10 IST

केंद्र पुरस्कृत सूक्ष्म सिंचन योजना अभियानांतर्गत राज्यात सूक्ष्म सिंचन योजना राबिवण्यात येत आहे. यासाठी केंद्राकडून ८० टक्के व राज्य सरकारकडून २० टक्के खर्च केला जात आहे.

ठळक मुद्देशासनाकडे प्रयत्न करून शेतकरी थकले

सांगली : पाण्याचा अतिरिक्त वापर कमी व्हावा व जमिनीची सुपिकता कायम रहावी, यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने अनुदानावर ठिबक सिंचन योजना सुरू केली आहे. या योजनेतून जिल्ह्यातील चार हजार ७३ लाभार्थींनी लाभ घेऊन अनुदानासाठी २०५-१६ मध्ये प्रस्ताव कृषी विभागाकडे पाठविले आहेत.

या लाभार्थींचे नऊ कोटी २० लाख थकीत असून, चार वर्षांत शेतकऱ्यांनी पाठपुरावा करूनही त्यांना अद्याप अनुदान मिळाले नाही. शेतकºयांच्या या प्रश्नाकडे लोकप्रतिनिधी केव्हा लक्ष देणार, असा प्रश्नही शेतकºयांनी उपस्थित केला आहे.केंद्र पुरस्कृत सूक्ष्म सिंचन योजना अभियानांतर्गत राज्यात सूक्ष्म सिंचन योजना राबिवण्यात येत आहे. यासाठी केंद्राकडून ८० टक्के व राज्य सरकारकडून २० टक्के खर्च केला जात आहे. ठिबक सिंचन योजनेतंर्गत अल्पभूधारक शेतकºयाला ६०, तर बहुभूधारकाला ५० टक्के अनुदान देण्यात येत आहे. २०१५-१६ मध्ये जिल्ह्यातील चार हजार ७३ शेतकºयांनी प्रत्यक्ष ठिबक सिंचन बसवल्यानंतर कृषी कार्यालयाकडे अनुदानासाठी प्रस्ताव पाठविले होते. मात्र प्रस्ताव मंजूर होऊन व ठिबक सिंचन बसवूनही शेतकºयांना अनुदान मिळालेले नाही. ही रक्कम तब्बल नऊ कोटी वीस लाख रुपये असल्यामुळे अनेक शेतकरी या अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत.

वारंवार शेतकरी अनुदानासाठी शासकीय कार्यालयांकडे फेºया मारुनही त्यांना अद्याप अनुदानाचा लाभ मिळाला नाही. शासकीय यंत्रणेच्या या धोरणामुळे योजनेला खीळ बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.पाण्याच्या अतिरिक्त वापरामुळे वाळवा, मिरज, पलूस या तालुक्यातील एक लाखाहून अधिक एकर जमीन क्षारपड झाली आहे. क्षारपड जमिनीचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन शेतकरी ठिबक सिंचनकडे वळला आहे. परंतु, सरकारच या शेतकºयांना प्रोत्साहन देण्याऐवजी अनुदान देण्यास टाळाटाळ करून त्यांची आर्थिक कोंडीच केली जात आहे, असा शेतकºयांनी आरोप केला आहे.

शासनाचे शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष : पाटीलठिबक सिंचनसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याऐवजी त्यांची आर्थिक कोंडी करणे शासनाने बंद करावे. प्रोत्साहन सादर केलेल्या सर्वच शेतकºयांना शासनाने ठिबक सिंचन योजनेचा लाभ दिला पाहिजे. थकीत शेतकºयांना त्वरित अनुदान दिले नाही, तर आम्ही तीव्र आंदोलन छेडणार आहे, असा इशारा नांद्रे (ता. मिरज) येथील शेतकरी महावीर पाटील यांनी दिला आहे.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे थकित अनुदानतालुका शेतकरी संख्याआटपाडी १०७जत ७७२कडेगाव ५७३खानापूर २४३क़वठेमहांकाळ २२०मिरज ७३४पलूस ४२५शिराळा ९३तासगाव ३४३वाळवा ५६३एकूण ४०७३

टॅग्स :Farmerशेतकरीgovernment schemeसरकारी योजना