शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: चांदोली धरण, वारणा नदीतील दुर्घटना रोखणार कशी?; सुरक्षा व्यवस्थेची ऐशी-तैशी

By संतोष भिसे | Updated: May 11, 2024 16:01 IST

जलसंपदा विभागाला नाही गांभीर्य

आनंदा सुतारवारणावती : चांदोली पर्यटन व्यवसायाला चालना देण्यासाठी पायाभूत सुविधांचा स्तर उंचाविताना पर्यटकांच्या सुरक्षिततेकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे. चांदोली धरण व सह्याद्री व्याघ्र प्रकल्प या पर्यटन स्थळाबरोबर धरणाच्या पायथ्याला निसर्गरम्य वातावरणात भोजन करण्याच्या व पोहण्याच्या उद्देशाने अनेक पर्यटक सहकुटुंब येतात. या ठिकाणी घडणाऱ्या दुर्घटना रोखणारी यंत्रणाच अस्तित्वात नाही. जलसंपदा विभागाचे याकडे दुर्लक्ष झाले आहे.धरणाच्या सांडव्यातून पाणी सोडले जाते, तेथून वारणा नदी पात्रात प्रवाहित होते. याठिकाणी पर्यटकांना पाण्यात किंवा नदी पात्रात उतरण्यास मज्जाव करण्याची यंत्रणा कार्यरत नाही. पर्यटक खुलेआम पाण्यात उतरतात. आनंद घेण्याच्या नादात स्वतःचा जीव गमावतात. जलसंपदा विभागाने याकडे सुरक्षेच्या नजरेने पाहिले नसल्यामुळे सुरक्षा रक्षक तैनात नाहीत. धोकादायक ठिकाणी सूचना फलक लावलेले नाहीत, तसेच नदी पात्रात किंवा सांडव्याजवळ पाण्यात उतरणाऱ्या हुल्लडबाजांवर अद्याप दंडात्मक कारवाई केली नसल्याने असे अनुचित प्रकार वारंवार घडत आहेत. तरीदेखील धोकादायक व दुर्घटनाग्रस्त ठिकाणच्या सुरक्षा व्यवस्थेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. अजून किती जीव गेल्यानंतर पाटबंधारे विभागाला जाग येणार आहे?धरणाच्या पायथ्याला सांडव्याजवळ वारणा नदी पात्रात आत्तापर्यंत अक्षय पाटील, राहुल मगदूम, तुषार कुंभार, सुधीर कांबळे, करण कळंत्रे व परवा अभिषेक मंडले, या सहा जणांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यांना वाचवण्यात ग्रामस्थांना किंवा इतर उपस्थित पर्यटकांना यश आले नाही.चांदोली धरण व अभयारण्य महत्त्वाचे पर्यटन स्थळ आहे. सुटीच्या दिवशी पर्यटक गर्दी करतात. मौजमजा करताना पर्यटकांचे मृत्यू होत आहेत. वारंवार घडणाऱ्या दुर्घटना रोखण्यासाठी प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे स्थानिक नागरिक व पर्यटकांतून बोलले जात आहे.

शनिवारी व रविवारी अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात ठेवावा. पाटबंधारे विभागाने दुर्घटनाग्रस्त व धोकादायक ठिकाणी सूचना फलक लावावे. संरक्षक भिंत किंवा तारेचे कुंपण करून याबाबत कायमस्वरूपी तोडगा काढणे आवश्यक आहे. - वसंत पाटील, माजी सरपंच, मणदूर 

शाहुवाडी तालुका हद्दीत नवीन पोलिस चौकीची इमारत बांधली आहे. तेथे वीज व पाण्याची व्यवस्था नसल्यामुळे सुरक्षा रक्षकांची गैरसोय होते. नवीन चौकीजवळ प्रतिबंधात्मक फलक लावले आहेत. लवकरच सुरक्षारक्षक नेमण्यात येईल. - गोरख पाटील, शाखा अभियंता, वारणा पाटबंधारे विभाग, वारणावती.

टॅग्स :SangliसांगलीDamधरणriverनदी