शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

Sangli: चांदोली धरण, वारणा नदीतील दुर्घटना रोखणार कशी?; सुरक्षा व्यवस्थेची ऐशी-तैशी

By संतोष भिसे | Updated: May 11, 2024 16:01 IST

जलसंपदा विभागाला नाही गांभीर्य

आनंदा सुतारवारणावती : चांदोली पर्यटन व्यवसायाला चालना देण्यासाठी पायाभूत सुविधांचा स्तर उंचाविताना पर्यटकांच्या सुरक्षिततेकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे. चांदोली धरण व सह्याद्री व्याघ्र प्रकल्प या पर्यटन स्थळाबरोबर धरणाच्या पायथ्याला निसर्गरम्य वातावरणात भोजन करण्याच्या व पोहण्याच्या उद्देशाने अनेक पर्यटक सहकुटुंब येतात. या ठिकाणी घडणाऱ्या दुर्घटना रोखणारी यंत्रणाच अस्तित्वात नाही. जलसंपदा विभागाचे याकडे दुर्लक्ष झाले आहे.धरणाच्या सांडव्यातून पाणी सोडले जाते, तेथून वारणा नदी पात्रात प्रवाहित होते. याठिकाणी पर्यटकांना पाण्यात किंवा नदी पात्रात उतरण्यास मज्जाव करण्याची यंत्रणा कार्यरत नाही. पर्यटक खुलेआम पाण्यात उतरतात. आनंद घेण्याच्या नादात स्वतःचा जीव गमावतात. जलसंपदा विभागाने याकडे सुरक्षेच्या नजरेने पाहिले नसल्यामुळे सुरक्षा रक्षक तैनात नाहीत. धोकादायक ठिकाणी सूचना फलक लावलेले नाहीत, तसेच नदी पात्रात किंवा सांडव्याजवळ पाण्यात उतरणाऱ्या हुल्लडबाजांवर अद्याप दंडात्मक कारवाई केली नसल्याने असे अनुचित प्रकार वारंवार घडत आहेत. तरीदेखील धोकादायक व दुर्घटनाग्रस्त ठिकाणच्या सुरक्षा व्यवस्थेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. अजून किती जीव गेल्यानंतर पाटबंधारे विभागाला जाग येणार आहे?धरणाच्या पायथ्याला सांडव्याजवळ वारणा नदी पात्रात आत्तापर्यंत अक्षय पाटील, राहुल मगदूम, तुषार कुंभार, सुधीर कांबळे, करण कळंत्रे व परवा अभिषेक मंडले, या सहा जणांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यांना वाचवण्यात ग्रामस्थांना किंवा इतर उपस्थित पर्यटकांना यश आले नाही.चांदोली धरण व अभयारण्य महत्त्वाचे पर्यटन स्थळ आहे. सुटीच्या दिवशी पर्यटक गर्दी करतात. मौजमजा करताना पर्यटकांचे मृत्यू होत आहेत. वारंवार घडणाऱ्या दुर्घटना रोखण्यासाठी प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे स्थानिक नागरिक व पर्यटकांतून बोलले जात आहे.

शनिवारी व रविवारी अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात ठेवावा. पाटबंधारे विभागाने दुर्घटनाग्रस्त व धोकादायक ठिकाणी सूचना फलक लावावे. संरक्षक भिंत किंवा तारेचे कुंपण करून याबाबत कायमस्वरूपी तोडगा काढणे आवश्यक आहे. - वसंत पाटील, माजी सरपंच, मणदूर 

शाहुवाडी तालुका हद्दीत नवीन पोलिस चौकीची इमारत बांधली आहे. तेथे वीज व पाण्याची व्यवस्था नसल्यामुळे सुरक्षा रक्षकांची गैरसोय होते. नवीन चौकीजवळ प्रतिबंधात्मक फलक लावले आहेत. लवकरच सुरक्षारक्षक नेमण्यात येईल. - गोरख पाटील, शाखा अभियंता, वारणा पाटबंधारे विभाग, वारणावती.

टॅग्स :SangliसांगलीDamधरणriverनदी