शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
2
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
3
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
4
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
5
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
6
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
7
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
8
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
9
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
10
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
11
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
12
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
13
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
14
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
15
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
16
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
17
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
18
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
19
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
20
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक

राष्ट्रवादी नेत्यांकडून गटबाजीवर चर्चा, सांगलीत बैठक : कमलाकर पाटील गटाकडून तक्रारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 12:40 IST

राष्ट्रवादीअंतर्गत गटबाजीवर मंगळवारी रात्री माजी उपमुख्यमंत्री अजित पवार व पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी चर्चा केली. यावेळी कमलाकर पाटील गटाने शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांच्या कारभाराविषयी तक्रार मांडल्या. दोन्ही गटांचे म्हणणे ऐकून हल्लाबोल आंदोलनानंतर याविषयीचा निर्णय घेण्यात येईल, असे या नेत्यांनी स्पष्ट केले.

ठळक मुद्देराष्ट्रवादी नेत्यांकडून गटबाजीवर चर्चा, सांगलीत बैठक कमलाकर पाटील गटाकडून तक्रारी

सांगली : राष्ट्रवादीअंतर्गत गटबाजीवर मंगळवारी रात्री माजी उपमुख्यमंत्री अजित पवार व पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी चर्चा केली. यावेळी कमलाकर पाटील गटाने शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांच्या कारभाराविषयी तक्रार मांडल्या. दोन्ही गटांचे म्हणणे ऐकून हल्लाबोल आंदोलनानंतर याविषयीचा निर्णय घेण्यात येईल, असे या नेत्यांनी स्पष्ट केले.सांगली-माधवनगर रस्त्यावरील शासकीय विश्रामगृहात रात्री अकरा ते साडे बारा या कालावधित बैठक झाली. या बैठकीत राष्ट्रवादीच्या सांगली विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष कमलाकर पाटील, माजी महापौर सुरेश पाटील, प्रा. पद्माकर जगदाळे, महापालिकेतील विरोधी पक्षनेते शेडजी मोहिते, नगरसेवक विष्णु माने, सोमनाथ सूर्यवंशी आदी उपस्थित होते. या सर्वांनी बजाज यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली.

एकाचवेळी दोन महत्त्वाची पदे घेतल्यानंतरही पक्षीय कारभारात त्यांचा एकमुखी कारभार असल्याची तक्रार कमलाकर पाटील यांनी केली. ते म्हणाले स्वीकृत सदस्य पदाचा राजीनामा बजाज यांना देण्याची सूचना नेत्यांनी दिली होती, मात्र त्यांनी तो दिला नाही. या पदावर काही काळ माजी नगरसेवक हरीदास पाटील यांना संधी देण्याचे निश्चित झाले होते.

प्रत्यक्षात हरीदास पाटील यांना पदापासून वंचित ठेवण्यात आले. त्यामुळे सामान्य कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. आमच्या मताशी सहमत असलेले १८ नगरसेवक आहेत. त्याचबरोबर महत्त्वाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याही त्याच भावना आहेत. त्यामुळे एकूण ३३ लोकांची लेखी तक्रार आम्ही प्रदेशकडे केली आहे.तातडीने पक्षाने याविषयी निर्णय घेऊन पक्षांतर्गत वातावरण चांगले ठेवण्यास मदत करावी, अशी मागणीही पाटील यांनी केली. पक्षातील कार्यकर्ते व लोकांचे खच्चीकरण करण्याचे काम गेल्या काही वर्षापासून सुरू आहे. या गोष्टी तातडीने थांबविणे गरजेचे आहे. अन्यथा महापालिका निवडणुकीत पक्षाला मोठे नुकसान सोसावे लागू शकते, असाही इशारा त्यांनी दिला.अजित पवार म्हणाले की, हल्लाबोल आंदोलनावेळी गटबाजीचा मुद्दा बाजुला ठेवावा. आंदोलने झाल्यानंतर एकदिवस येथील गटबाजीवर बैठक घेऊन त्याचठिकाणी निर्णय घेण्यात येईल. पक्षाने व नेत्यांनी घेतलेला निर्णय सर्वांनी मान्य करायला हवा. सामान्य कार्यकर्त्यांच्या भावनांचा विचारही यावेळी करण्यात येईल. विनाकारण पक्षातील वातावरण कुणी दूषित करीत असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले. 

टॅग्स :SangliसांगलीAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस