शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

नरेंद्र मोदी फक्त भारताची नव्हे, तर संपूर्ण जगाची गरज : मंत्री चंद्रकांत पाटील

By संतोष भिसे | Updated: November 27, 2023 16:51 IST

काही मंडळी सूर्याला झाकण्याचा प्रयत्न करीत आहेत

सांगली : पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी निवडून येणे ही फक्त भारताचीच नव्हे, तर संपूर्ण जगाची गरज असल्याचे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. सांगलीत सोमवारी एका कार्यक्रमात ते बोलत होते.पाटील म्हणाले, जगभरात सुरू असलेल्या युध्दांदरम्यान मोदी यांनी मध्यस्थी केली, त्यामुळे तीन दिवस युध्दविराम मिळाला. हे फक्त मोदीच करु शकतात. पण काही मंडळी सूर्याला झाकण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र त्यांच्या गाडीला चालकच नाही हेच त्यांच्या ध्यानी येत नाही. कोणीही येतो आणि त्यांच्या गाडीत बसतो. पण चालक नसलेली ही गाडी धावणार कशी?ते म्हणाले, अजित पवार  उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्याने माझे महत्व कमी होण्याचा प्रश्न निर्माण होत नाही. मी एक कोरे पाकिट आहे. त्यावर संघटना कोणता पत्ता लिहिल, तेथे जायचे एवढेच माझे काम आहे. पक्षात शिस्त असल्याने पक्षफुटीचा प्रसंग कधीच भाजपवर आलेला नाही. काही मंडळी नाराज होऊन बाजूला गेली असली, तरी त्याचा पक्षावर काहीही परिणाम झालेला नाही.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या कामाची पद्धत वेगवेगळी आहे. दोघेही कामासाठी योग्य आहेत. फडणवीस यांची संवेदनशीलता महापुरावेळी दिसून आली, तर पवार यांच्या कामाचा उरक मोठा आहे. प्रशासनावर त्यांचा वचकही आहे. 

चर्चेतूनच मार्ग निघू शकतोपाटील म्हणाले, फडणवीस यांनी मराठा आरक्षण दिले होते, मात्र महाविकास आघाडी सरकारला न्यायालयात टिकविता आले नाही. महाराष्ट्रात सर्व जाती-धर्मांना सोबत घेऊन वाटचाल करण्याची संतांची शिकवण आणि परंपरा आहे. यामुळे तेढ निर्माण होईल असे वक्तव्य टाळून मुख्यमंत्र्यांसमवेत चर्चेला बसावे. चर्चेतूनच मार्ग निघू शकतो.

टॅग्स :SangliसांगलीNarendra Modiनरेंद्र मोदीchandrakant patilचंद्रकांत पाटीलBJPभाजपा