शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
2
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
3
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
4
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
5
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
6
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
7
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
8
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
9
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
10
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
11
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
12
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
13
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
14
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
15
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
16
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
17
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
18
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
19
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
20
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे

नरेंद्र मोदी यांनी जनतेला सतत खोटी स्वप्ने दाखवली, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केली टीका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2024 14:41 IST

अंकलखोप येथे सरपंचांचा कॉंग्रेसमध्ये प्रवेश

अंकलखोप : ‘नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून सतत खोटे बोलत आहेत. युवकांना नोकऱ्या देतो, महागाई कमी करतो, अशी खोटी स्वप्ने दाखवून त्यांनी सत्ता मिळवली. मात्र गेल्या १० वर्षांत महागाईचा उच्चांक झाला आहे. गरिबांना संपवण्याचे काम हे भाजप सरकार करत आहे,’ अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.अंकलखोप (ता. पलूस) येथे काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा व कार्यकर्त्यांच्या पक्ष प्रवेश कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार मोहनराव कदम होते. यावेळी सरपंच राजेश्वरी सावंत यांनी कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश केला.पटोले म्हणाले, ‘महाराष्ट्रातील सरकार गुजरातधार्जिणे असल्याचे लोकांच्या लक्षात आले आहे. राज्यात कॉंग्रेस आघाडीशिवाय पर्याय नाही. मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा केवळ आठ महिन्यांत पडत असेल तर भ्रष्टाचार किती फोफावला आहे हे लक्षात येते. एकीकडे ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ म्हणायचे आणि दुसरीकडे आमच्या दैवताचा अपमान करायचा हे फक्त भाजपच करू शकते. दुष्काळ व महापूर काळात डाॅ. विश्वजीत कदम जखमी असतानाही मदतकार्यात होते. लोकांच्या सुखदुःखात सहभागी होण्याचे काम फक्त कदम कुटुंबीयच करू शकतात.

आमदार डॉ. विश्वजित कदम म्हणाले, ‘विधानसभा निवडणुकीतही काँग्रेसला चांगले यश मिळणार नाही या गैरसमजातून काही लोक बाजूला गेलेले असतात, त्यांना सन्मानाने पक्षात परत सामील करून घेतले जात आहे. अंकलखोपच्या सरपंचांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने काँग्रेसची ताकद वाढली आहे.’ यावेळी खासदार विशाल पाटील, जिल्हा बँकेचे संचालक महेंद्र लाड यांनीही मार्गदर्शन केले. सरपंच सावंत यांनीही मनोगत व्यक्त केले.

बदल्यांसाठी पैसे द्यावे लागताहेतपटोले म्हणाले, ‘राज्यातून महिला व मुली मोठ्या प्रमाणात गायब होत आहेत, त्यांचा तपास लागत नाही हे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अपयश आहे. कायदा सुव्यवस्था बिघडली आहे. पोलिस अधिकारी, महसूल अधिकारी यांच्या बदल्यांसाठी पैसे द्यावे लागत आहेत. ही परिस्थिती बदलण्यासाठी काँग्रेसशिवाय पर्याय नाही.’

टॅग्स :SangliसांगलीNana Patoleनाना पटोलेNarendra Modiनरेंद्र मोदी