केंद्र राम नामात; तर राज्य सरकार औरंगाबादच्या नामकरणात व्यस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:21 IST2021-01-14T04:21:09+5:302021-01-14T04:21:09+5:30
नेर्ले : केंद्र सरकार राम नामात व्यस्त, तर राज्य शासन औरंगाबादच्या नामांतराच्या विषयात व्यस्त आहे. दुसरीकडे देशात कित्येक वर्षे ...

केंद्र राम नामात; तर राज्य सरकार औरंगाबादच्या नामकरणात व्यस्त
नेर्ले : केंद्र सरकार राम नामात व्यस्त, तर राज्य शासन औरंगाबादच्या नामांतराच्या विषयात व्यस्त आहे. दुसरीकडे देशात कित्येक वर्षे गरिबी हटाव अभियान चालविले तरी आजतागायत गरिबी हटली नाही, हे आपले दुर्दैव असल्याचे मत दलित महासंघाचे संस्थापक डॉ. मच्छिंद्र सकटे यांनी व्यक्त केले.
नेर्ले (ता. वाळवा) येथील विकास श्यामराव बल्लाळ यांची दलित महासंघाच्या सांगली जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. डॉ. तुळशीदास पाटील, अवधूत कुलकर्णी, राजेंद्र पाटील, संघटनेचे प्रवक्ते लालासाहेब पाटील, प्रदेश सरचिटणीस शंकर महापुरे यांची उपस्थिती होती.
सकटे म्हणाले, मी देवाला पाहिलं नाही; पण कोरोना काळात मात्र डॉक्टर, पोलीस, नर्स, पत्रकार यांच्यात मात्र देव मला भेटला. कोरोनामुळे जगाचे अर्थकारण, समाजकारण, राजकारण बदलून गेले. गावं बंद झाली; संसार उघड्यावर आले. थाळ्या वाजल्या, टाळ्या वाजल्या, मंदिरे उघडण्यासाठी घंटा घुमू लागल्या, पण शाळा उघडण्यासाठी घंटानाद झाला नाही.
बापूराव बेडेकर यांनी स्वागत केले. विकास बल्लाळ यांनी सूत्रसंचालन केले. रवी बल्लाळ यांनी आभार मानले.
फोटो- १३०१२०२१-नेर्ले न्यूज
फोटो ओळ : नेर्ले (ता. वाळवा) येथे दलित महासंघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल विकास बल्लाळ यांचा प्रा. मच्छिंद्र सकटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.