शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

वाळवा पंचायत समिती सभागृहास बापूंचेच नाव

By admin | Updated: November 19, 2015 00:24 IST

जिल्हा परिषदेत ठराव : नामकरणावरून वादळी चर्चा, रणधीर नाईक, सम्राट महाडिकांचा न्यायालयात जाण्याचा इशारा

 सांगली : वाळवा पंचायत समितीच्या नूतन सभागृहाला लोकनेते राजारामबापू पाटील यांचे नाव देण्याचा ठराव जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत अध्यक्षा रेश्माक्का होर्तीकर यांनी मंजूर केला. त्यास राष्ट्रवादीच्या सर्व सदस्यांनी पाठिंबा दिला. अध्यक्षांच्या या निर्णयावर सदस्य रणधीर नाईक, सम्राट महाडिक यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करून, पदाधिकाऱ्यांचा निषेध करीत सभात्याग केला. पदाधिकारी, अधिकाऱ्यांच्या भूमिकेविरोधात न्यायालयात दाद मागण्याचा इशाराही नाईक व महाडिक यांनी दिला. वाळवा पंचायत समितीच्या जुन्या इमारतीमधील सभागृहास वसंतदादा पाटील यांचे नाव देण्यात आले होते. त्यानंतर वर्षभरापूर्वी वाळवा पंचायत समितीची नवीन इमारत बांधली आहे. या इमारतीतील सभागृहास लोकनेते राजारामबापू पाटील यांचे नाव देण्यात आले आहे. दोन नेत्यांच्या नावावरून गेल्या दोन महिन्यांपासून वाद सुरू आहे. वाळवा पंचायत समितीने मासिक सभेमध्ये सभागृहाला राजारामबापू पाटील यांचे नाव देण्याचा ठराव मंजूर केला आहे. त्यानंतर सभागृहास बापूंचे नाव दिले आहे. याला वाळवा तालुक्यातील वसंतदादाप्रेमींनी तीव्र विरोध केला होता. सदस्य सम्राट महाडिक म्हणाले की, राज्य शासनाच्या २००४ मधील आदेशानुसार, शासकीय कार्यालय, सभागृहाला कोणत्याही राजकीय नेत्याचे नाव देता येत नाही. तरीही वाळवा पंचायत समितीला बापूंचे नाव दिल्याप्रकरणी सभापती रवींद्र बर्डे, गटविकास अधिकारी यांच्यावर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी कारवाई करण्याची मागणी केली. महाडिक यांची ही मागणी धुडकावून लावत राष्ट्रवादी सदस्यांनी एकमताने मंजुरीचा ठराव मांडला. अखेर अध्यक्षा रेश्माक्का होर्तीकर यांनी, वाळवा पंचायत समितीने राजारामबापू यांचे नाव देण्याचा केलेला ठराव योग्य आहे, त्यामुळे जिल्हा परिषद सभागृह त्या ठरावास मंजुरी देत आहे, असे सांगून, नाव देण्याबाबतची शासकीय पातळीवरील कायदेशीर प्रक्रिया वाळवा पंचायत समितीने पूर्ण करावी, अशी सूचनाही त्यांनी संबंधित पदाधिकारी व अधिकाऱ्यांना केली. होर्तीकर यांनी ठराव मंजूर करताच रणधीर नाईक यांनी आक्रमक भूमिका घेतली. अध्यक्षांनी शासकीय आदेश डावलून ठराव मंजूर केला आहे, हे पूर्णत: चुकीचे आहे. या निर्णयाविरोधात आम्ही न्यायालयात दाद मागणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सत्ताधारी बहुमताच्या जोरावर चुकीचा ठराव करीत असल्यामुळे त्यांनी पदाधिकाऱ्यांचा निषेध करून सभात्याग केला. सम्राट महाडिक यांनीही प्रशासन व पदाधिकाऱ्यांचा निषेध करून सभात्याग केला. अखेर सदस्यांनी समजूत काढल्यानंतर दहा मिनिटांनी दोन्ही सदस्य सभागृहात हजर झाले. या सदस्यांना काँग्रेसच्या सदस्यांकडून म्हणावे तसे पाठबळ मिळाले नाही. उपाध्यक्ष लिंबाजी पाटील म्हणाले की, जुन्या सभागृहाला दादांचे नाव असून, नवीन सभागृहाला बापूंचे नाव दिले आहे. यामुळे दादांचे नाव पुसले जाणार नाही. यावर सम्राट महाडिक यांनी, जुनी इमारत पाडण्यात येणार असल्यामुळे दादांचे नाव कसे राहणार, असा प्रश्न उपस्थित केला. या प्रश्नावर वाळवा पंचायत समितीचे सभापती रवींद्र बर्डे यांनी जुनी इमारत पाडली तरीही, दादांचे नाव पुसले जाणार नाही, याची आम्ही काळजी घेऊ, असा प्रतिटोला लगाविला. माजी अध्यक्ष देवराज पाटील म्हणाले की, दादा आणि बापूंचे जिल्ह्यासाठी तेवढेच योगदान आहे. त्यांच्या नावावरून कारण नसताना वादंग निर्माण करू नये. भीमराव माने, सुरेश मोहिते आदी सदस्यांनीही चर्चेत भाग घेतला. (प्रतिनिधी) दोघांचा सभात्याग : कॉँग्रेस सदस्यांचे मौन नामकरण प्रश्नावर रणधीर नाईक, सम्राट महाडिक यांनी सभा त्याग केला. या दोन सदस्यांना काँग्रेसच्या पक्षप्रतोद सुरेश मोहिते यांच्यासह अन्य एकाही सदस्याने त्यांच्याबरोबर जाऊन साथ दिली नसल्यामुळे सत्ताधाऱ्यांनी बहुमताने ठराव मंजूर केला. पदाधिकारी चुकीच्या पध्दतीने ठराव मंजूर करीत असल्याचे नाईक सांगत होते. यावरही काँग्रेस सदस्यांनी मौन बाळगले. अध्यक्षांनी राजीनामा द्यावा - महाडिक शासनाची परवानगी न घेता पंचायत समिती सभागृहाला नाव दिल्याप्रकरणी संबंधित अधिकारी, पदाधिकाऱ्यांवर जिल्हा परिषदेने कारवाई करावी. कारवाई करणार नसाल तर, अध्यक्षा होर्तीकरांना अध्यक्षपदाच्या खुर्चीवर राहण्याचा नैतिक अधिकार नाही, अशी टीका सम्राट महाडिक यांनी केली. भावना दुखावल्या..! ४अध्यक्षांनी ‘राजारामबापू पाटील सभागृह’ असे नामकरण करण्याच्या ठरावास मंजुरी दिली. त्यानंतर संतप्त भावना व्यक्त करताना रणधीर नाईक यांनी तुम्ही दादांचे नाव बदलून दादाप्रेमींच्या भावना दुखाविल्या आहेत, अशी खंत व्यक्त केली.