शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नागपंचमी साजरी करावी, नाग पकडणाऱ्या गावांवर लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2025 19:45 IST

जिल्हा पोलिस प्रमुख संदीप घुगे : पारंपरिक वाद्य वाजविल्यास सत्कार करून बक्षीस देऊ

शिराळा : उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नागपंचमी साजरी करावी. कोठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी काळजी घ्यावी. आवाजाचे प्रदूषण झाल्यास डॉल्बी आदींवर कारवाई करण्यात येईल. पारंपरिक वाद्य, ढोल वाजविल्यास त्यांचा आम्ही यथोचित सत्कार करून बक्षीस देऊ, असे प्रतिपादन जिल्हा पोलिस प्रमुख संदीप घुगे यांनी केले.येथील तहसीलदार कार्यालयात नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर आयोजित नाग मंडळे, ग्रामस्थ यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी उपवनसंरक्षक सागर गवते विभागीय पोलिस अधीक्षक सचिन थोराबोल, तहसीलदार शामला खोत पाटील, पोलिस निरीक्षक सिद्धेश्वर जंगम, वनक्षेत्रपाल एकनाथ पारधी यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी जिल्हा पोलिसप्रमुख घुगे यांनी न्यायालयाच्या सूचनांचे पालन तंतोतंत पाळावे. आठ वाजेपर्यंत मिरवणूक काढावी. डॉल्बी आदींवर कारवाई करण्यात येईल. पोलिस, वनविभाग, स्थानिक प्रशासन व नागरिक यांनी समन्वयाने नागपंचमी साजरी करावी.

आपत्कालीन सेवेसाठी मार्ग मोकळा ठेवावासंपूर्ण सणावर सीसीटीव्ही, व्हिडीओ कॅमेरे मार्फत लक्ष ठेवण्यात येणार आहे. धार्मिक भावनांचा अवमान होणार नाही याची काळजी घ्यावी. स्वागत कमानी स्टक्चरल ऑडिट करून घ्यावे स्वागत कमानीवर आक्षेपार्ह मजकूर नको, सेलिब्रिटीच्या नावाखाली नर्तकी नकोत, अफवा पसरवू नका, सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडीओ पसरवू नका आदी सूचना दिल्या.यावेळी रणजितसिंह नाईक, प्रमोद नाईक, पृथ्वीसिंह नाईक, वसंत कांबळे, अजय जाधव, आबासाहेब काळे, वैभव कुंभार, जयसिंग गायकवाड, वीरेंद्र पाटील, लालासाहेब तांबिट, फिरोज मुजावर, अभिजित शेणेकर, सचिन नलवडे, स्वप्नील निकम, संतोष हिरुगडे, धन्वंतरी ताटे, सम्राट शिंदे, राम पाटील नाग मंडळाचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.नाग पकडणाऱ्या गावांवर लक्षयावेळी ओझर्डे, सुरुल, कुरळप, सरुड, बांबवडे, मांगले याठिकाणी जिवंत नाग पकडून मिरवणूक काढली जाते. त्यामुळे शिराळा येथील नागरिकांच्यावर गुन्हे दाखल केल्याने त्रास होतो, अशी तक्रार करण्यात आली. यावेळी या सर्व गावांवर लक्ष ठेवण्यात येईल, असे सांगितले.डॉल्बीवर कारवाईडॉल्बीमुळे ज्येष्ठ नागरिकांना त्रास होतो याबाबत संघटनेमार्फत तीन वर्षांपासून निवेदन देतो मात्र कोणताही कारवाई होत नाही अशी भूमिका जयसिंगराव गायकवाड यांनी मांडली. यावेळी प्रशासन करवाई करेल तसेच गावाबाहेरच अशी वाहने अडवली जातील, असे आश्वासन दिले.