शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
2
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
3
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
4
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
5
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
6
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
7
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
8
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
9
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
10
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
11
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
12
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
13
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
14
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
15
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
16
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
17
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
18
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
19
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)

साखर आयुक्तांच्या तोंडाला काळे फासणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:29 IST

इस्लामपूर : येत्या १५ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या ऊस गळीत हंगामातील एफआरपी तीन टप्प्यांत घ्यावी, अशी शिफारस साखर आयुक्त ...

इस्लामपूर : येत्या १५ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या ऊस गळीत हंगामातील एफआरपी तीन टप्प्यांत घ्यावी, अशी शिफारस साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी केली आहे. त्याचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते भागवत जाधव यांनी निषेध केला आहे. ही शिफारस मागे न घेतल्यास प्रसंगी पुणे येथे जाऊन साखर आयुक्तांना काळे फासण्याचा इशारा जाधव यांनी दिला आहे.

जाधव म्हणाले, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक, माजी खासदार राजू शेट्टी यांनी एकरकमी एफआरपीचा कायदा लागू करण्यासाठी संघर्ष केला आहे. तो एफआरपीचा कायदा देशाच्या सर्वोच्च सभागृहात पारित करण्यात आला आहे. साखर कारखानदार साखरेला बाजारात दर नाही, असे सांगून शेतकऱ्यांना फसवत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत साखरेचा दर ३५०० रुपयांवर गेला आहे. उसापासून इथेनॉल, मद्य, स्पिरिट, बगॅस आणि वीजनिर्मिती यातून मिळणाऱ्या पैशाचा हिशेब शेतकऱ्यांना दाखविला जात नाही. शेतकऱ्यांनी तीन टप्प्यांत एफआरपी घ्यावी, त्यामुळे कारखान्यांचे प्रतिटन २०० ते ३०० रुपये व्याज वाचेल, असे मत साखर आयुक्त गायकवाड यांनी व्यक्त केले होते. त्यांनी राजीनामा देऊन एक एकर ऊसशेती करून बघावी, म्हणजे ऊस उत्पादकांचे काय हाल होतात, हे समजेल.

जाधव म्हणाले, गेल्या दोन वर्षांपासून पूरस्थितीमुळे ऊस उत्पादक देशोधडीला लागला आहे. रासायनिक खतांची दरवाढ न परवडणारी आहे. लागवड ते ऊस तुटेपर्यंत शेतकऱ्यांना विकास सोसायटीचे कर्ज काढून १२ टक्के व्याजदराने शेती करावी लागते. तीन टप्प्यांतील एफआरपीमुळे सोसायटीचे कर्जही भागणार नाही. आत्महत्या करावी लागेल. त्यामुळे गायकवाड यांनी शेतकरीविरोधी वायफळ बडबड बंद करावी.