शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

तुटलेल्या विद्युत तारेला स्पर्श, माय-लेकीचा जागीच मृत्यू; सांगलीतील कुरळप येथील दुर्दैवी घटना 

By शीतल पाटील | Updated: July 3, 2023 19:32 IST

अन् सुदैवाने मुलगा बचावला

कुरळप : कुरळप (ता. वाळवा) येथे तुटलेल्या विद्युत तारेस स्पर्श हाेऊन विजेचा जाेरदार धक्का बसल्याने वंदना विश्वास माळी (वय ४५) व माधुरी विश्वास माळी (वय २०) या माय-लेकीचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवार, दि. २ जुलै राेजी सायंकाळी ६ वाजता घडली.वंदना माळी यांची कुरळप येथे वशी हद्दीवर शेती आहे. त्यांच्या पतीचे १५ वर्षांपूर्वी निधन झाले आहे. मुलगी माधुरी, संजीव व सुरेश या दाेन मुलांसह त्या शेतातील घरात राहत हाेत्या. रविवारी दुपारी ४ वाजता त्या माधुरीसह शेतात टाेकणीसाठी गेल्या हाेत्या. टाेकण करून सायंकाळी सहा वाजता त्या घरी परतत हाेत्या. यावेळी वाटेत तुटून पडलेली वीजवाहक तार त्यांना दिसली नाही. या तारेला स्पर्श होताच माधुरीला विजेचा जाेरदार धक्का बसला. हे पाहून वंदना तिला वाचविण्यासाठी धावल्या. त्यांनाही विजेचा धक्का बसला. जागीच दाेघींचाही मृत्यू झाला. त्यांच्यासोबत असलेल्या कुत्र्याचाही विजेचा धक्का लागून मृत्यू झाला.उशिरापर्यंत आई व बहीण घरी न आल्याने मुलगा संजीव त्यांना शाेधण्यासाठी गेला. यावेळी शेताच्या बांधावर दाेघीही निपचित पडल्याचे दिसले. त्याने वंदना यांना स्पर्श केला असता त्यालाही विजेचा धक्का बसला; मात्र हातात लाकडी काठी असल्याने बाजूला फेकला गेल्याने तो बचावला. माधुरी सध्या पदवीचे शिक्षण घेत होती. रविवारी महाविद्यालयास सुटी असल्याने आईला मदत म्हणून ती शेतात टोकणीसाठी गेली होती. वंदना यांच्या पश्चात संजीव व सुरेश ही दोन मुले आहेत. आई व बहिणीच्या निधनाने दोन्ही भावांचा आक्रोश उपस्थितांचे हृदय हेलावून टाकत हाेता.

टॅग्स :SangliसांगलीelectricityवीजDeathमृत्यू