शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
2
महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा सामुहिक राजीनामा
3
दिल्लीचे प्रदूषण रोखण्यासाठी चीनचा 'धक्कादायक' सल्ला! ३००० मोठे उद्योग बंद करण्याची सूचना; बीजिंगच्या धर्तीवर प्लॅन तयार?
4
"...म्हणून आम्ही सांगत होतो करा सदैव हिंदुत्वाची कदर"; पवारांचा उल्लेख, आशिष शेलारांनी उद्धव ठाकरेंवर डागली तोफ
5
Investment Plan : केवळ एका वर्षासाठी गुंतवणूक करायचीये? 'हे' ५ पर्याय देऊ शकतात तुम्हाला जबरदस्त रिटर्न, जाणून घ्या
6
गृहकर्जावर होईल १८ लाख रुपयांपर्यंतची बचत! EMI कमी करण्यापेक्षा वापरावा लागेल 'हा' पर्याय
7
कोल्हापूर हादरलं! मुलानेच केली आई-वडिलांची हत्या; धक्कादायक कारण आले समोर
8
ICICI Prudential AMC IPO Listing: आयसीआयसीआय प्रूडेंशियल एएमसीच्या आयपीओनं केलं मालामाल; प्रत्येक शेअरवर मिळाला 'इतका' नफा
9
बांगलादेशात ISI सक्रीय, कंटरपंथींकडून जाळपोळ, हिंसाचार सुरू; भारताविरोधात पाकिस्तानचं षडयंत्र?
10
नोकरी बदलणाऱ्यांना EPFO चा मोठा दिलासा! 'ब्रेक'बाबतचे नियम बदलले; आता शनिवार-रविवारची सुट्टी अडथळा ठरणार नाही
11
Dolphin in Mumbai: मुंबईकरांना सुखद धक्का! वरळी सी फेसच्या समुद्रकिनाऱ्यावर डॉल्फिनची मस्ती, व्हिडीओ व्हायरल
12
मुंबईत ठाकरे बंधू युतीत शरद पवारांची राष्ट्रवादी सहभागी होणार?; २२ जागांचा देणार प्रस्ताव
13
VIDEO: दादरमध्ये अजब प्रकार, एक तरुण या इमारतीवरुन त्या इमारतीवर मारतोय उड्या; पोलिसांची दमछाक
14
Stock Market Today: शेअर बाजाराची जबरदस्त सुरुवात; Sensex ची ३३० अंकांनी उसळी; IT Stocks सुस्साट
15
अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनामध्ये जेट विमानाचा अपघात; संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त
16
'...तर त्यांचा एक हात तोडून दुसऱ्या हातात दिला असता'; इम्तियाज जलील मंत्री संजय निषाद यांच्यावर संतापले
17
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
18
मुंबई विमानतळाची गोपनीय माहिती चोरट्यांच्या हाती; ऐरोलीतील घटना : अदानी ग्रुपच्या मॅनेजरचा लॅपटॉप चोरीला
19
मी सर्वांसमोर तिला चुकीच्या पद्धतीने का किस करेल? ट्रोल झाल्यावर राकेश बेदींनी दिलं स्पष्टीकरण
20
Vijay Mallya : देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
Daily Top 2Weekly Top 5

मोदी-शहांनी पुन्हा लोकसभा निवडणुका घेऊन दाखवाव्यात : जयंत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2020 20:45 IST

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले की, धर्मा-धर्मांत तेढ निर्माण करण्याचे काम सरकार करत आहे. देशासाठी आमच्या पूर्वजांनी रक्त सांडले आहे, आम्हाला पुरावे विचारणारे हे बाजारबुणगे कोण?

ठळक मुद्दे विश्वजित कदम यानचीही भाजपवर टीका

सांगली : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पुन्हा एकदा लोकसभा निवडणुका घेऊन दाखवाव्यात, त्यातून लोक ताकद दाखवून दिल्याशिवाय राहणार नाहीत. नागरिकत्वविषयक कायद्यांना होणारा विरोधही त्यातून स्पष्ट होईल, असे आव्हान जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी दिले. या कायद्याच्या निमित्ताने मोदी-शहांची जोडी देशाला पुन्हा एकदा फाळणीच्या वाटेवर नेत असल्याचा आरोप कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी केला. सांगलीत शनिवारी निघालेल्या संविधान संरक्षण मार्चमध्ये ते बोलत होते.

मंत्री पाटील म्हणाले की, देशातील धार्मिक सलोखा बिघडवण्याचे काम केंद्र सरकार करत आहे. भाजपविरोधात देश पेटून उठला आहे. सर्वांना एकत्र घेऊन जाण्याऐवजी फूट पाडण्याचे काम सुरू आहे. लोकसभा निवडणुकांत भाजपचा प्रचंड विजय झााला. बहुमत देऊन मोठी घोडचूक केल्याची भावना आता नागरिक बोलून दाखवत आहेत. नागरिकत्वविषयक कायद्यांची अंमलबजावणी करण्यापूर्वी पुन्हा एकदा लोकसभेच्या निवडणुका घेऊन दाखवाव्यात, त्यावेळी लोक तुम्हाला ताकद दाखवतील. त्यातून लोक कायद्याच्या बाजूने की विरोधात हेदेखील स्पष्ट होईल.

ते म्हणाले की, देशाची अर्थव्यवस्था रसातळाला जात आहे. हे अपयश सर्वस्वी मोदींचेच आहे. तिच्यात सुधारणा करण्याऐवजी धर्मा-धर्मांत तेढ वाढविण्याचे काम मोदी-शहा करत आहेत. कायद्यांच्या अंमलबजावणीनंतर सामान्यांना चौकशीसाठी पोलिसांत बोलावले जाईल, पन्नासभर कागद मागितले जातील, छळवणूक करून वेठीस धरले जाईल, यातून दुही माजवली जाईल. याविरोधात दिल्लीत शाहीन बागेत महिलांचे आंदोलन सुरू आहे. त्याच धर्तीवर सांगलीतही वसंतदादांच्या पुतळ््यासमोर ‘वसंतबाग’ आंदोलन सुरू आहे. भाजपच्या धोरणांविरोधात या महिलांचा संताप व्यक्त होत आहे. या महिलांना सरकार म्हणून माझे पूर्ण समर्थन आहे.

मंत्री डॉ. कदम म्हणाले की, या कायद्यांच्या निमित्ताने देशात हुकूमशाही आणण्याचे प्रत्यत्न भाजप सरकार करत आहे. गुण्यागोविंदाने राहणाऱ्या विविध जाती-धर्मांत विष पेरण्याचे काम सुरू आहे. काँग्रेसने कधीही जाती-धर्माचे राजकारण केले नाही. नागरिकत्व कायद्यांविरोधातील लढ्यात काँग्रेस लोकांच्या खांद्याला खांदा देऊन लढेल. एकाही देशवासीयावर अन्याय होऊ देणार नाही. तुमच्या संरक्षणासाठी सरकार ताकद देईल.

 

 

टॅग्स :SangliसांगलीJayant Patilजयंत पाटील