शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
3
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
4
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
5
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
6
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
7
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
8
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
9
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
10
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
11
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
12
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
13
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
14
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
15
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
16
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
17
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
18
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
19
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
20
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
Daily Top 2Weekly Top 5

मोदी-शहांनी पुन्हा लोकसभा निवडणुका घेऊन दाखवाव्यात : जयंत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2020 20:45 IST

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले की, धर्मा-धर्मांत तेढ निर्माण करण्याचे काम सरकार करत आहे. देशासाठी आमच्या पूर्वजांनी रक्त सांडले आहे, आम्हाला पुरावे विचारणारे हे बाजारबुणगे कोण?

ठळक मुद्दे विश्वजित कदम यानचीही भाजपवर टीका

सांगली : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पुन्हा एकदा लोकसभा निवडणुका घेऊन दाखवाव्यात, त्यातून लोक ताकद दाखवून दिल्याशिवाय राहणार नाहीत. नागरिकत्वविषयक कायद्यांना होणारा विरोधही त्यातून स्पष्ट होईल, असे आव्हान जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी दिले. या कायद्याच्या निमित्ताने मोदी-शहांची जोडी देशाला पुन्हा एकदा फाळणीच्या वाटेवर नेत असल्याचा आरोप कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी केला. सांगलीत शनिवारी निघालेल्या संविधान संरक्षण मार्चमध्ये ते बोलत होते.

मंत्री पाटील म्हणाले की, देशातील धार्मिक सलोखा बिघडवण्याचे काम केंद्र सरकार करत आहे. भाजपविरोधात देश पेटून उठला आहे. सर्वांना एकत्र घेऊन जाण्याऐवजी फूट पाडण्याचे काम सुरू आहे. लोकसभा निवडणुकांत भाजपचा प्रचंड विजय झााला. बहुमत देऊन मोठी घोडचूक केल्याची भावना आता नागरिक बोलून दाखवत आहेत. नागरिकत्वविषयक कायद्यांची अंमलबजावणी करण्यापूर्वी पुन्हा एकदा लोकसभेच्या निवडणुका घेऊन दाखवाव्यात, त्यावेळी लोक तुम्हाला ताकद दाखवतील. त्यातून लोक कायद्याच्या बाजूने की विरोधात हेदेखील स्पष्ट होईल.

ते म्हणाले की, देशाची अर्थव्यवस्था रसातळाला जात आहे. हे अपयश सर्वस्वी मोदींचेच आहे. तिच्यात सुधारणा करण्याऐवजी धर्मा-धर्मांत तेढ वाढविण्याचे काम मोदी-शहा करत आहेत. कायद्यांच्या अंमलबजावणीनंतर सामान्यांना चौकशीसाठी पोलिसांत बोलावले जाईल, पन्नासभर कागद मागितले जातील, छळवणूक करून वेठीस धरले जाईल, यातून दुही माजवली जाईल. याविरोधात दिल्लीत शाहीन बागेत महिलांचे आंदोलन सुरू आहे. त्याच धर्तीवर सांगलीतही वसंतदादांच्या पुतळ््यासमोर ‘वसंतबाग’ आंदोलन सुरू आहे. भाजपच्या धोरणांविरोधात या महिलांचा संताप व्यक्त होत आहे. या महिलांना सरकार म्हणून माझे पूर्ण समर्थन आहे.

मंत्री डॉ. कदम म्हणाले की, या कायद्यांच्या निमित्ताने देशात हुकूमशाही आणण्याचे प्रत्यत्न भाजप सरकार करत आहे. गुण्यागोविंदाने राहणाऱ्या विविध जाती-धर्मांत विष पेरण्याचे काम सुरू आहे. काँग्रेसने कधीही जाती-धर्माचे राजकारण केले नाही. नागरिकत्व कायद्यांविरोधातील लढ्यात काँग्रेस लोकांच्या खांद्याला खांदा देऊन लढेल. एकाही देशवासीयावर अन्याय होऊ देणार नाही. तुमच्या संरक्षणासाठी सरकार ताकद देईल.

 

 

टॅग्स :SangliसांगलीJayant Patilजयंत पाटील