ना हातात बसतात, ना खिशात मावतात, असे मोबाईल चोरट्यांचे सोयीचे ठरतात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:31 IST2021-08-14T04:31:13+5:302021-08-14T04:31:13+5:30
फोटो दुपटे लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : कोरोना संसर्गामुळे लागू करण्यात आलेल्या निर्बंधांत शिथिलता देण्यात आल्यानंतर बाजारपेठेतील गर्दी वाढत ...

ना हातात बसतात, ना खिशात मावतात, असे मोबाईल चोरट्यांचे सोयीचे ठरतात!
फोटो दुपटे
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : कोरोना संसर्गामुळे लागू करण्यात आलेल्या निर्बंधांत शिथिलता देण्यात आल्यानंतर बाजारपेठेतील गर्दी वाढत आहे. या कालावधीत मोबाईल चोरीच्या घटना वाढल्या असून, आकाराने मोठे असलेले मोबाईल हातात न घेता खिशात ठेवले जातात आणि चोरटे अलगदपणे हा मोबाईल लांबवत असल्याने आकाराने मोठे मोबाईल चोरट्यांचे लक्ष्य ठरत आहेत.
हातात मोबाईल धरता येत नसल्याने अनेकजण खिशात ठेवतात. मोबाईल आकाराने मोठा असल्याने खिशातही तो अर्धवटच बसतो. अशावेळी बाजारपेठेत, गर्दीच्या ठिकाणी पॅन्टच्या खिशात अथवा अगदी शर्टच्या खिशातूनही मोबाईल लंपास केले जात आहेत.
भाजीपाला खरेदीवेळी अनेकजण वाकून ती खरेदी करतात. यावेळी हीच संधी साधून चोरटे हळूवारपणे खिशात हात घालून मोबाईल काढतात. त्यातूनही व्यक्तीला चाहुल लागलीच तर उलट तेच चोरटे त्याला तुमचा मोबाईल पडत होता म्हणून दिशाभूलही करतात.
चौकट
पोलिसांकडे तक्रारी वाढल्या
* सांगलीत या पंधरवड्यात दिवसाला सरासरी एक ते दोन मोबाईल चाेरीच्या घटना घडल्या आहेत.
* शहरात घरात घुसून मोबाईल चोरीच्या प्रकारांत मात्र वाढ झाली आहे.
* गर्दीच्या ठिकाणी खिशातून अथवा पर्स, पिशवीमधून मोबाईल चोरीचे प्रकार वाढले आहेत.
चौकट
या भागांमध्ये मोबाईल सांभाळा
* शहरातील विश्रामबाग आठवडा बाजार, संजयनगर, मंगळवार बाजार व शनिवार बाजारावेळी मोबाईल चोरीच्या घटना नेहमी वाढत असतात.
* सांगलीतील कापड पेठ, हरभट रोड, मारुती रोड, गणपती पेठ, विश्रामबाग याठिकाणी नागरिकांनी आपला मोबाईल सांभाळण्याची आवश्यकता आहे.