शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

शेअर बाजाराच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्यावर मोका लावा, सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर मनसेचा मोर्चा

By शीतल पाटील | Updated: October 13, 2022 19:02 IST

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूकीच्या नावाखाली गंडा घालणाऱ्या कंपन्यांचे पेव फुटले आहे

सांगली : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने जिल्ह्यातील नागरिकांना अनेक कंपन्यांनी हजारो कोटींचा गंडा घातला आहे. या कंपन्यांची चौकशी करून दोषीवर मोका कायद्यान्वये कारवाई करावी, या मागणीसाठी गुरुवारी मनसेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.मनसेचे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, शेअर मार्केटमध्ये गुंतवणूकीच्या नावाखाली गंडा घालणाऱ्या कंपन्यांचे पेव जिल्ह्यात फुटले आहे. आतापर्यंत हजारो कोटी रुपयांचा चुना या कंपन्यांनी गुंतवणूकदारांना लावला आहे. पोलिसांमध्ये रोज गुन्हे दाखल होत आहेत. कंपन्यांच्या संचालकांना अटकही करण्यात आली आहे. मात्र ठोस कारवाई होत नाही. गुंतवणूकदारांचे पैसे कसे मिळणार याचे उत्तर पोलिसांच्याकडे नाही. कंपन्यांच्या संचालकांनी गुंतवणूकदारांचे पैसे हवालामार्फत परदेशात पाठविल्याची चर्चा आहे.लोकप्रतिनिधींनी तपास यंत्रणांच्या सहाय्याने गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. मात्र त्यांचे दुर्लक्ष आहे. गंडा घालणाऱ्या कंपन्यांमध्ये काही लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी, उद्योजक, व्यावसायिकांप्रमाणेच सर्वसामान्यांचाही पैसा अडकला आहे. तरीही लोकप्रतिनिधी मूग गिळून गप्प आहेत. या कंपन्यांनी गुंतवणूकदारांशी करार केलेला नाही. त्यांचे डिमॅट खातेही उघडलेले नाही. या कंपन्याच्या चौकशीसाठी स्वतंत्र तपास यंत्रणा नियुक्त करावी, अशी मागणीही करण्यात आली. या आंदोलनात मनसेचे संदीप टेंगले यांच्यासह गुंतवणूकदार सहभागी झाले होते.

टॅग्स :SangliसांगलीMNSमनसेshare marketशेअर बाजारfraudधोकेबाजी