शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
2
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
3
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
4
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
5
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
6
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
7
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
8
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
9
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
10
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
11
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
12
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
13
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
14
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
15
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
16
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
17
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
18
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
19
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
20
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक

अल्पवयीन मुलीच्या आत्महत्येने राजकीय वातावरण तापले, पोलिसांचे कॉल डिटेल्स तपासणीची आमदार बाबर यांची विधानसभेत मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2025 18:30 IST

मुलीला न्याय मिळणार का? नराधमांना कडक शिक्षा होणार का?

आटपाडी : करगणी (ता. आटपाडी) येथील अल्पवयीन मुलीने चार नराधमांच्या लैंगिक छळाला कंटाळून गळफास लावून आत्महत्या केल्याच्या संतापजनक घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे. तिच्या मृत्यूनंतर संपूर्ण आटपाडी तालुक्यात राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. “मुलीला न्याय मिळणार का? नराधमांना कडक शिक्षा होणार का?” असे प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.या घटनेनंतर भाजप आमदार गोपीचंद पडळकर व शिवसेना (शिंदे गट) आमदार सुहास बाबर पीडितेच्या कुटुंबीयांना धीर देण्यासाठी करगणीत दाखल झाले. त्यांनी “आरोपींना शिक्षा होईल,” अशी ग्वाही दिली. मात्र, घटनेनंतर तब्बल आठ तास पोलिस निष्क्रिय का होते, असा सवाल उभा राहतो. गावकऱ्यांनी आटपाडी पोलिस ठाण्यासमोर ठिय्या देऊन पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

पोलिसांनी तत्काळ कारवाई न करता ‘वरून आदेश’ येण्याची वाट पाहिली, यामुळे संतप्त ग्रामस्थांनी राजकीय हस्तक्षेपाचा थेट आरोप केला. “कोणातरी मोठ्या नेत्याचा दबाव आहे,” असे खुलेआम बोलले जात असून, आमदार सुहास बाबर यांनी विधानसभेत पोलिसांच्या कॉल डिटेल्सची मागणी केली आहे.

जनतेचा विश्वास ढासळणारही घटना राजकारण, पोलिस यंत्रणेची निष्क्रियता आणि जनआक्रोशामुळे हलणारी न्यायप्रक्रिया यांचा विषारी संगम आहे. जर आरोपींना संरक्षण देण्याचा प्रयत्न झाला, तर लोकशाहीतील जनतेचा विश्वास कायमचा ढासळेल. मुलीला खरा न्याय मिळणार का, हे उत्तर आता काळच देईल.