शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

नदीकाठची संपूर्ण शेतजमीन झाली जिरायत... मिरज तालुक्यातील प्रकार : शेतकरी संघटनेकडून अजब प्रकार उजेडात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2018 21:11 IST

सांगली : नदीकाठच्या बागायत जमिनींची नोंद जिरायत करून शेतकºयांचे आर्थिक नुकसान करण्याचा प्रकार शेतकरी संघटनेमार्फत नुकताच उजेडात आला.

ठळक मुद्देकोणत्याही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झालेल्या नाहीतपाटबंधारे विभागास नुकसानभरपाईचा प्रस्ताव तयार करण्यास भाग पाडले

सांगली : नदीकाठच्या बागायत जमिनींची नोंद जिरायत करून शेतकºयांचे आर्थिक नुकसान करण्याचा प्रकार शेतकरी संघटनेमार्फत नुकताच उजेडात आला. संपूर्ण मिरज तालुक्यातील नदीकाठच्या सर्व गावांच्या जमिनींच्या सात-बाराला जिरायत नोंद झाली आहे. त्यामुळे आजवर शेतकºयांची यामाध्यमातून मोठी फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

शेतकरी संघटनेचे नेते संजय कोले यांनी यासंदर्भात शनिवारी पत्रकार परिषदेत माहिती दिली. ते म्हणाले की, पूरसंरक्षक भिंत बांधण्यासाठी कसबे डिग्रज येथील शेतकरी अशोक रामू तोडकर व बाळासाहेब यशवंत पाटील या दोन शेतकºयांची अनुक्रमे ३८ गुंठे व १५ गुंठे कृष्णा नदीकाठची शेतजमीन २००७ मध्ये अधिग्रहित करण्यात आली. आजअखेर या दोन्ही शेतकºयांना त्याची नुकसानभरपाई मिळाली नव्हती. या शेतकºयांनी शेतकरी संघटनेकडे याबाबतचे गाºहाणे मांडले. त्यानंतर याबाबतचा पाठपुरावा करून पाटबंधारे विभागास नुकसानभरपाईचा प्रस्ताव तयार करण्यास भाग पाडले. मात्र पाटबंधारे विभागाने शेतजमिनीचे मूल्यांकन ५० टक्के कमी दाखविले.

मूल्यांकनाबाबत तहसीलदारांशी संपर्क साधून विचारणा करण्यात आल्यानंतर एक धक्कादायक प्रकार उजेडात आला. संपूर्ण मिरज तालुकाच आॅनलाईन सात-बारावर जिरायत झाल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत अनेक अडचणी येत असल्याने पंधरा दिवसात याबाबतची दुरुस्ती होईल, असे आश्वासन दिले. याप्रकरणी सखोल चौकशी केली असता, पूरसंरक्षक भिंत बांधताना कोणत्याही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झालेल्या नाहीत. आजही संबंधित जमिनींच्या सात-बारा उताºयावर शेतकºयांचेच नाव दिसते. इतर हक्कांमध्येही कोणतीच नोंद नाही. तरीही शासकीय निधी खर्च करून मोठा गुन्हा करण्यात आला आहे. महाराष्टÑातील असे अनेक प्रकल्प जमिनी ताब्यात न घेता बेकायदेशीरपणे पूर्ण करण्यात आल्याचा आमचा दावा आहे. यावेळी कोले यांच्यासोबत सुनील फराटे, रावसाहेब दळवी, बाळासाहेब पाटील, आण्णासाहेब पाटील, अशोक चौगुले, अशोक तोडकर, वसंतराव भिसे, शंकर तपासे उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणारकोले म्हणाले की, यासदंर्भात पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्याकडे आम्ही तक्रार केली आहे. लवकरच आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही तक्रार करुन संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी करणार आहोत. शेवटपर्यंत या प्रकरणाचा पाठपुरावा केल जाईल.

अन्यत्र शोधाशोधसांगली जिल्ह्यातील अन्य काही तालुक्यांमध्ये असे काही प्रकार झाले आहेत का, याचा शोध आता संघटनेमार्फत सुरू झाला आहे. त्याबाबतची माहिती संकलित केली जात आहे.

टॅग्स :WaterपाणीSangliसांगली