शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

मिरज-बिकानेर साप्ताहिक एक्सप्रेस सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2024 19:10 IST

मिरज : मध्य रेल्वेच्या मिरज ते बिकानेर साप्ताहिक एक्सप्रेसचा (क्र. २०४७६) मंगळवारपासून मिरजेतून प्रारंभ झाला. मिरजेत भाजपचे नेते सुशांत ...

मिरज : मध्य रेल्वेच्यामिरज ते बिकानेर साप्ताहिक एक्सप्रेसचा (क्र. २०४७६) मंगळवारपासून मिरजेतून प्रारंभ झाला. मिरजेत भाजपचे नेते सुशांत खाडे, प्रभाकर पाटील व रेल्वे विभागीय सहायक व्यवस्थापक ब्रिजेशकुमार सिंग यांनी रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला. ही एक्सप्रेस मिरज स्थानकातून बिकानेरला रवाना झाली.मिरज ते बिकानेर एक्सप्रेसचा मिरजेपर्यंत विस्तार करण्यात आला असून प्रत्येक मंगळवारी ही गाडी मिरजेतून बिकानेरला जाणार आहे. मिरज-बिकानेर एक्सप्रेसचा विस्तार करण्यासाठी माजी खासदार संजय पाटील, पालकमंत्री सुरेश खाडे, रेल्वे कृती समितीचे अध्यक्ष मकरंद देशपांडे यांनी पाठपुरावा केला होता. ही एक्सप्रेस मिरजेतून दर मंगळवारी दुपारी २:२० वाजता, सांगलीतून दुपारी २:४० वाजता, किर्लोस्करवाडी येथून दुपारी ३ वाजता सुटेल.दुसऱ्या दिवशी बिकानेर येथे रात्री ८:४० वाजता पोहोचेल. या गाडीमुळे पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील प्रवाशांना राजस्थानला जाण्यासाठी थेट गाडी उपलब्ध झाली आहे. या गाडीचा मिरज-पुणे हा विशेष दर्जा काढून नियमित क्रमांकाने ही गाडी धावणार आहे. यामुळे तिकिटासाठी विशेष शुल्क आकारले जाणार नाही. त्यामुळे प्रवाशांच्या पैशाचीही बचत होणार आहे.मिरजेत उद्घाटनप्रसंगी रेल्वे कृती समितीचे उपाध्यक्ष गजेंद्र कल्लोळी, ओंकार शिखरे, ज्ञानेश्वर पोतदार, राजेश कुकरेजा, रेल्वे प्रवासी सेनेचे किशोर भोरावत, संदीप शिंदे व रेल्वे प्रवासी उपस्थित होते. आठवड्यातून एकदा धावणारी ही गाडी किमान तीन दिवस धावावी यासाठी रेल्वेकडे प्रस्ताव सादर करण्यात आल्याचे रेल्वे सल्लागार समिती सदस्य सुकुमार पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :Sangliसांगलीmiraj-acमिरजrailwayरेल्वे