शहरं
Join us  
Trending Stories
1
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
2
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
3
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
4
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
5
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
6
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
7
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
8
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
9
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
10
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
11
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला
12
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
13
'तुम्ही कुणाला त्रास दिला, तर अजिबात ऐकणार नाही'; अजित पवारांचा इशारा
14
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
15
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
16
शेअर बाजारातील जोखीम घटक काय असतो? तुमची गुंतवणूक वाचवून चांगला नफा कसा कमवायचा?
17
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
18
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
19
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
20
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?

त्यावेळची शिवसेना आणि आताच्या शिवसेनेत जमीन-आसमानाचा फरक : नारायण राणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2017 08:39 IST

राज्यात मध्यावधी निवडणुकांची शक्यता नाकारता येत नाही. लोकसभा व विधानसभा निवडणुका एकाचवेळी होण्याचीही चिन्हे आहेत. सर्वच पक्षांचे दिग्गज नेते महाराष्ट्रात दौरे करीत आहेत. त्यांची तयारी तेवढ्यासाठी असू शकते.

ठळक मुद्देस्वभाव बदलणार नाही!माझी फसवणूक होणार नाही...दिवाकर रावते सर्वात निष्क्रीय मंत्रीपन्नास टक्के पाप शिवसेनेचेगुजरातमध्ये भाजपच सत्तेवर येणार

सांगली : राज्यात मध्यावधी निवडणुकांची शक्यता नाकारता येत नाही. लोकसभा व विधानसभा निवडणुका एकाचवेळी होण्याचीही चिन्हे आहेत. सर्वच पक्षांचे दिग्गज नेते महाराष्ट्रात दौरे करीत आहेत. त्यांची तयारी तेवढ्यासाठी असू शकते. आम्हीही आमच्या पक्षीय दौऱ्याची तयारी मध्यावधीची शक्यता गृहीत धरूनच करीत आहोत, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री व महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी शनिवारी सांगलीत पत्रकार परिषदेत केले .ते म्हणाले की, बाळासाहेबांना कोणत्याही प्रकारचे दु:ख मी दिले नाही. याऊलट मातोश्रीवर त्या काळात काय काय घडले हे मी माज्या डोळ््यांनी पाहिले आहे. उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांनी बाळासाहेबांना प्रचंड त्रास दिला. मी काम करीत होतो त्यावेळची शिवसेना आणि आताच्या शिवसेनेत जमीन-आसमानाचा फरक आहे.

सध्याच्या शिवसेनेत ५ टक्केही प्राण राहिला नाही. तत्व आणि शब्दाप्रमाणे चालणारी शिवसेना आता तशी अजिबात दिसत नाही. सत्तेचा लाभ घेऊन केवळ पोकळ इशारे देत उद्धव ठाकरे फिरत आहेत. त्यांच्या बोलण्यात कोणताही दम नाही. काय आणि कधी बोलावे हे कळण्याइतपत त्यांना राजकारणाचा गंधही नाही. शिवसेनेबरोबरच आता कॉंग्रेसचेही अस्तित्व संपल्यात जमा आहे. त्यांची सध्याची दशा पाहिली तर पक्ष दिशाहीन झाल्याचे स्पष्ट दिसून येते. मुख्यमंत्रीपदासाठी तीनवेळा कॉंग्रेसने आश्वासन देऊन विमानाने मला दिल्लीला नेले. शब्द मला देऊन इतरांनाच मुख्यमंत्री केले. या गोष्टी मला रुचल्या नाहीत. आजवर कधी पदांच्या अपेक्षेने काम केले नाही, मला माझ्या मेरिटवरच पदे मिळत गेली आहेत. त्यामुळे यापुढेही अशाच पद्धतीने काम करेन.राज्यातील सत्ताधाऱ्यांना पाठींबा देण्यामागचा माझा उद्देश स्पष्ट आहे. लोकांचे प्रश्न सोडवायचे असतील तर सरकारबरोबर रहावे लागते. विरोधात राहून कामे होणे कठीण असते. शिवसेना मात्र सत्तेत राहून गेल्या काही वर्षातकोणत्याही घटकाचे प्रश्न सोडविण्यात यशस्वी झाली नाही.

पक्षीय दौरा करताना मला शेतकरी, व्यापारी, उद्योजक व सामान्य जनतेचे प्रश्न जाणवतात. शासनाने त्यांच्या धोरणात काही बदल केले तर निश्चितपणे ही परिस्थिती बदलू शकते. सरकारबद्दलची नाराजी असली तरी प्रमाणापेक्षा ती जास्त पसरविली जात आहे. पक्ष म्हणून आम्ही असे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करू.शिवसेनेकडूनही होती आॅफरपरखड स्वभावामुळे माझे नुकसान झाले, असे मी समजत नाही. कारण आजवर मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते किंवा अन्य कोणतीही पदे मिळाली ती माझ्या स्वभावामुळेच मिळाली. आजही सर्वच पक्षांकडून मला आॅफर मिळतआहेत.शिवसेनेकडूनही वर्षभरापूर्वी मला पक्षात येण्यासाठी आॅफर होती, मात्र मी ती नाकारली.  त्यामुळे स्वभावात फरक करणार नाही. मी जसा आहे तसाच राहणार, असे राणे म्हणाले.

माझी फसवणूक होणार नाही...कॉंग्रेसने वारंवार मुख्यमंत्रीपदाचा शब्द देऊन फसविले असले तरी भविष्यात भाजप किंवा अन्य कोणी मला फसवेल, असे वाटत नाही. मी फसणारा माणूस नाही, असे राणे म्हणाले.दिवाकर रावते सर्वात निष्क्रीय मंत्रीपराभूत झालेल्या लोकांना विधानपरिषदेवर घेऊन शिवसेनेने त्यांच्या गळ््यात मंत्रीपदाची माळ घातली. प्रत्यक्षात दिवाकर रावतेहे अत्यंत निष्क्रीय मंत्री मंत्री निघाले. तीन वर्षात यांना एकही काम करता आले नाही, अशी टीका राणे यांनी केली.पन्नास टक्के पाप शिवसेनेचेराज्यातील शेतकरी व सर्वसामान्य लोकांचे प्रश्न दूर झाले नाहीत.त्यांच्यासमोरील अडचणी वाढल्या आहेत. यातील पन्नास टक्के पाप हे शिवसेनेचे आहे, असा आरोप राणे यांनी केला.गुजरातमध्ये भाजपच सत्तेवर येणारगुजरात विधानसभेत चूरस असली तरी भाजपचीच सत्ता येईल, असे भाकीत राणे यांनी येथे केले.

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे SangliसांगलीShiv Senaशिवसेना