शहरं
Join us  
Trending Stories
1
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’साठी पुन्हा ठाकरे बंधू एकत्र; उद्धव अन् राज ठाकरे मोर्चास्थळी निघाले
2
"७५ वर्षांत काश्मीर ताब्यात घेता आले नाही अन्..."; तालिबानने पाकिस्तानच्या दुखऱ्या बाजूवर मीठ रगडले....
3
'या' रेल्वे कंपनीला मुंबई मेट्रोकडून मिळालं २४८१ कोटी रुपयांचं काम, फोकसमध्ये राहणार शेअर्स
4
मनसेचा 'सत्याचा मोर्चा', मुंबईच्या वाहतुकीत बदल;  'या' भागांत रस्त्यांवर निर्बंध, पोलिसांच्या सूचना
5
Plastic Bans: महाराष्ट्राच्या शेजारी राज्याने प्लास्टिक वापराबाबत उचललं कठोर पाऊल!
6
केरळमध्ये आता कुणीही 'अत्यंत गरीब' नाही, मुख्यमंत्री पिनराई विजयन यांचा मोठा दावा
7
टेस्ला... सॅम अल्टमन बुक करून फसला; साडे सात वर्षे झाली डिलिव्हरीच मिळाली नाही, रिफंड तर...
8
शुक्र गोचर २०२५: २ नोव्हेंबर, कार्तिकीच्या मुहूर्तावर 'मालव्य' राजयोगात ५ राशींना धन-समृद्धी योग!
9
SSC-HSC Exam Dates: महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी-बारावी परीक्षा २०२६ चे वेळापत्रक जाहीर; पहिला पेपर कधी?
10
KYC पूर्ण नसेल तर FASTag बंद होणार का; पाहा NHAI काय म्हटलं? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
11
श्रेयस अय्यरबाबत मोठी अपडेट; रुग्णालयातून आज डिस्चार्ज मिळाला, लगेचच भारतात आणले जाणार?
12
Satyacha Morcha: राज ठाकरे लोकल ट्रेनमधून पोहोचले, तिकीटावर ऑटोग्राफ दिला; 'सत्याचा मोर्चा'ला अद्याप पोलिसांची परवानगी नाही
13
“प्रत्येक संकटाच्या डोळ्यात डोळे घालून तू लढतोस, जिंकतोस”; आदित्य ठाकरेंची राऊतांसाठी पोस्ट
14
IND vs SA World Cup Final: दक्षिण आफ्रिकेचा पुरुष संघ 'चोकर्स', महिलांचा संघ कसा? भारतासोबत ३४ सामने झाले, त्यापैकी...
15
ट्रेन तिकीट बुकिंगचे नियम बदलले, या लोकांना मिळणार लोअर बर्थ; झोपण्याची वेळही ठरली!
16
Social Viral: उत्तराखंडच्या 'या' सरोवरात पाणी नाही, तर आहेत फक्त सांगाडे; काय आहे गूढ?
17
एकीकडे पाकिस्तानसोबत युद्धविराम, मात्र दुसरीकडे अफगाणिस्तानने दिला मोठा इशारा! काय आहे प्रकरण?
18
UPI New Rules: ३ नोव्हेंबरपासून युपीआय पेमेंटमध्ये होणार मोठा बदल! पटापट करा चेक
19
"मी दोन दिवसांपूर्वीच रोहित आर्याला भेटलेलो...", मराठी अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला- "त्याच्यावर शंका आली नाही कारण..."
20
Tarot Card: नवा उत्साह, चैतन्य आणि आशादायी चित्र घेऊन येणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य

'वाळवा तालुक्यात विरोधकांना संपवण्यासाठी गुंडशाही व्यवस्था', इस्लामपूरच्या नगराध्यक्षांचे मंत्री पाटलांवर टीकास्त्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2022 12:38 IST

राजकारणातील प्रस्थापितांची ही गुंडशाही मोडून काढण्यासाठी चांगल्या आणि शिक्षित मंडळींनी राजकारणात यायला हवे.

इस्लामपूर : विचारांची लढाई विचारानेच लढली पाहिजे. मात्र वाळवा तालुक्यात विरोधकांना नेस्तनाबूत करा, त्यांना संपवा किंवा त्यांना निर्माणच होऊ देऊ नका, अशी व्यवस्था असल्याची टीका जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे नाव न घेता नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी केली.

राजकारणातील प्रस्थापितांची ही गुंडशाही मोडून काढण्यासाठी चांगल्या आणि शिक्षित मंडळींनी राजकारणात यायला हवे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. येथे ज्येष्ठ निवेदक सुधीर गाडगीळ यांनी पाटील यांची प्रकट मुलाखत घेतली.

पाटील म्हणाले की, वडिलांच्या अकाली निधनाने वयाच्या १८ व्या वर्षीच कौटुंबिक जबाबदारी आली. त्यानंतर तीन वर्षांनी अनुकंपा तत्त्वावर वीज मंडळात भरती झालो. वडील प्रकाशतात्यांनी राज्यभरात उभारलेली इंटकची संघटना समर्थपणे पुढे चालविली. चुलते दिवंगत अशोकदादा पाटील यांचा स्पष्टवक्तेपणा, माजी खासदार प्रकाशबापू पाटील यांचे मृदु बोलणे आणि सालस स्वभाव तर माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांचे प्रशासकीय कामाचे कौशल्य याचा माझ्यावर प्रभाव आहे.

शहरातील मातब्बरांची झुंडशाही, गुंडगिरी आणि सामान्यांची पिळवणूक अशा वेदनेतून ईर्षा निर्माण झाली आणि त्याच ईर्षेतून लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत जनतेने मला विजयी केले. विधानसभा निवडणुकीतही विघातक प्रवृत्ती नाहीशा झाल्या पाहिजेत, यासाठी निवडणूक लढलो.

यावेळी माजी मंत्री शिवाजीराव नाईक, भगवानराव साळुंखे, पृथ्वीराज पवार, जयराज पाटील, धैर्यशील मोरे, वैभव पवार, चंद्रकांत पाटील, मधुकर हुबाले, अशोकराव खोत, अजित पाटील, अक्षय पाटील उपस्थित होते. संदीप सावंत यांनी आभार मानले.

सोज्वळ चेहरा आणि टेरर गॅँग..

इस्लामपूरसारख्या छोट्या शहरात एमबीबीएस वैद्यकीय महाविद्यालय होऊच नये यासाठी अनेक यंत्रणा काम करत होत्या. मात्र जुलै २०१६मध्ये या महाविद्यालयास दिल्लीतून परवानगी मिळाली, तो क्षण आनंदाचा ठरला. इथले नेतृत्व सोज्वळ चेहरा पुढे करून टेरर गॅँगची भाषा वापरते. सज्जन असणे आणि सज्जन असल्याचे दाखविणे यातील फरक नवी पिढी ओळखते. त्यामुळे अशा विघातक प्रवृत्ती राजकारणातून उखडून फेकल्या जातील, असे निशिकांत पाटील म्हणाले.

टॅग्स :Sangliसांगलीislampur-acइस्लामपूरJayant Patilजयंत पाटील