शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
3
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
4
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
5
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
6
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
7
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
8
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
9
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
10
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
11
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
12
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
13
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
14
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
15
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
16
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
17
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
18
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
19
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
20
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला

हातकणंगलेत ‘मशाल’ दिलीय, आता सांगलीत हट्ट कशासाठी?; विश्वजित कदम यांचा सवाल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2024 16:48 IST

दिल्लीत ठरेल, त्यानुसार काम करू

सांगली : उद्धवसेनेला पश्चिम महाराष्ट्रात एक जागा हवी होती, त्यासाठी ते सांगली मागत होते. बुधवारी त्यांनी हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून सत्यजित पाटील यांना उमेदवारी दिली. आता तिथे ‘मशाल’ चिन्ह आले आहे, मग सांगलीचा हट्ट कशासाठी? असा सवाल काँग्रेस कार्याध्यक्ष व आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी गुरुवारी पुणे येथे एका वृत्तसंस्थेशी बोलताना केला.कोल्हापूरच्या बदल्यात सांगली या विषयाला लॉजिक नाही. कोल्हापूरच्या जागेबाबत महाविकास आघाडीची राज्य पातळीवर चर्चा झाली. छत्रपती शाहू महाराजांचे नाव चर्चेला आले. त्यांच्याबद्दल समाज मनात खूप आदरचे स्थान आहे. ते जो पक्ष निवडतील, त्याचा सन्मान ठेवावा, असे ठरले. त्यानुसार त्यांनी काँग्रेस निवडला. कोल्हापूर पुरोगामी जिल्हा आहे, म्हणून त्यांनी तसा विचार केला. ती जागा काँग्रेसला गेली. त्यावेळी कुठेही अदलाबदलाची चर्चा नव्हती. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात यांना त्याची कल्पना होती. पश्चिम महाराष्ट्रात तुम्हाला जागा हवी होती. आता तुम्ही हातकणंगलेला जागा घेतली आहे. मशाल चिन्हावर तुम्ही लढत आहात. सत्यजीत पाटील उमेदवार आहेत, मग आता पुन्हा सांगलीसाठी शिवसेनेचा हट्ट कशासाठी? करता असे डॉ. कदम यांनी म्हटले आहे.

ते म्हणाले, ‘‘महाविकास आघाडीत काँग्रेस पक्षाने सामंजस्याची भूमिका घेतली आहे. ज्याची जिथे ताकद व नेटवर्क आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सदस्य व कार्यकर्त्यांचे जाळे आहे, तेथे त्या पक्षाने लढावे, असे अपेक्षित आहे. त्याअर्थाने सांगली आमची हक्काची जागा आहे. सांगलीतील काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते, जनतेसाठी मी कठोर भूमिका घेतली आहे. ज्या सांगलीत मी काम करतो, तेथे आग्रही राहणे माझी जबाबदारी आहे. आमचाच प्रश्न सुटत नसेल, तर काँग्रेसच्या बैठकीला का जायचे? शिवसेनेने त्यांची उमेदवारी जाहीर केली असली तरी महाविकास आघाडीचा निर्णय झालेला नाही. कार्यकर्त्यांना अजून दिशा नाही. भाजप उमेदवार जाहीर झालेत, त्यांनी प्रचार सुरू केला. आमचा निर्णय लवकर झाला पाहिजे.’’

दिल्लीत ठरेल, त्यानुसार काम करूसांगलीबाबत काय राजकारण काय शिजते आहे, माहिती नाही. मला त्यात पडायचे नाही. निवडणुकीला केवळ एक महिना राहिलाय. मला भाजपच्या ऑफरबाबत बातम्या पेरल्या जातात, त्यात मला पडायचे नाही. सांगलीबाबत मात्र शेवटपर्यंत आग्रह राहील. त्यानंतर जे आमचे राज्यातील व दिल्लीतील नेते ठरवतील, महाविकास आघाडीचे जे ठरेल, त्यानुसार काम करू.’’

टॅग्स :Sangliसांगलीlok sabhaलोकसभाVishwajeet Kadamविश्वजीत कदमShiv Senaशिवसेना