शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

शेतीमाल पुरवठ्याबाबत बाजारपेठेत संभ्रम

By admin | Updated: May 31, 2017 23:19 IST

शेतीमाल पुरवठ्याबाबत बाजारपेठेत संभ्रम

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : रघुनाथदादा पाटील यांच्या शेतकरी संघटनेने पुकारलेल्या शेतकऱ्यांच्या बंद आंदोलनास १ जूनपासून सुरुवात होत आहे. किसान सभेनेही या आंदोलनास पाठिंबा दर्शविला असून, दूध, भाजीपाला, फळभाज्यांचा पुरवठा गुरुवारपासून बंद करण्याचा इशारा संघटनेने दिल्याने, सांगलीच्या बाजारात संभ्रमाचे व चिंतेचे वातावरण आहे. राज्यात अनेक शेतकरी संघटनांनी याबाबतचे आंदोलन पुकारले आहे. सांगली जिल्ह्यात रघुनाथदादा पाटील आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांनी याबाबत शेतकऱ्यांना बंदचे आवाहन केले आहे. आंदोलनाबाबत रघुनाथदादा पाटील म्हणाले की, बंद आंदोलनात शेतकरी स्वत:हून उतरले आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील पुणतांब्यापासून सुरू झालेल्या आंदोलनाची ही धग आता संपूर्ण महाराष्ट्रात पसरणार आहे. आर्थिक संकट शेतकऱ्यांच्या जिवाशी आल्याने, ते स्वत:हून आंदोलनात उतरले आहेत. दूध, फळभाज्या, भाजीपाला यांची विक्री १ जूनपासून बंद करण्यात येईल. शेतीतून तयार झालेला कोणताही माल शेतकरी बाजारात विकणार नाहीत. गावातच वस्तुविनिमय स्वरुपात त्याचा विनियोग होईल. त्यामुळे या आंदोलनाचे चटके हळुहळू बाजारपेठांना आणि पर्यायाने शासनाला बसायला सुरुवात होईल. आंदोलनाची तीव्रता वाढविण्यासाठी येत्या काही दिवसात रास्ता रोकोसारखी आंदोलनेही करण्यात येतील. ते म्हणाले की, शेतकऱ्यांचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न सरकार करीत आहे. यातून सरकारची मानसिकता दिसत आहे. अशाप्रकारे शेतकऱ्यांमधील सरकारविरोधी असंतोष आणखी तीव्र होईल. आंदोलनात अन्य संघटनाही उतरतील अशी आशा आहे. मला किंवा कोणत्याही संघटनेच्या श्रेयाचा हा प्रश्न नाही. त्यामुळेच पुणतांब्यातील आंदोलनात स्वाभिमानी, शरद जोशीप्रणित शेतकरी संघटना, किसान सभा असे सर्वजण एकत्र दिसले. पश्चिम महाराष्ट्रातही हे चित्र दिसेल, अशी आशा आहे. शेतकरी संघटनेचा पाठिंबासांगली : अहमदनगर जिल्ह्यातील पुणतांबे या गावातील शेतकऱ्यांनी संपाची घोषणा केली आहे. त्याला शरद जोशीप्रणित शेतकरी संघटनेचा पाठिंबा आहे. शेतकरी संपावर या आंदोलनांतर्गत दि. १ जूनपासून दूध व भाजीपाला न विकण्याचे आंदोलन जाहीर केले आहे. सरकारला शेतकरी एकजूट दाखवण्यासाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती नेते संजय कोले यांनी दिली. आंदोलनात रस्त्यावर आंदोलन करण्यापेक्षा बांधावरच करण्यात यावे. यासाठी कुटुंबाला लागेल तेवढेच धान्य, भाजीपाला, दूध उत्पादित करावे. तेवढाच पेरा करावा. उर्वरित शेतात हिरवळीचे खत उत्पादित करणारी पिके करावीत. जनावरांच्या चाऱ्याचे उत्पादन घ्यावे. दूध बाजारात नेण्यापेक्षा त्याचे घरीच लोणी, तूप बनवावे. ते दीर्घकाळ टिकते. उत्पादित शेतमाल शहराकडे न पाठवता गावातच विकावा. त्यामुळे आंदोलन शांततेत पार पडेल. शेतकऱ्यांनी आंदोलनात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाप्रमुख रामचंद्र कणसे, जिल्हाध्यक्ष सुनील फराटे, जिल्हा प्रतिनिधी मोहन परमणे, मिरज तालुकाप्रमुख एकनाथ कापसे, माजी जिल्हाप्रमुख शीतल राजोबा आदींनी केले आहे. विक्रेते अनभिज्ञशेतकऱ्यांच्या संपाबाबत अधिकृत माहिती उपलब्ध नसल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात येत आहे. यामुळे सांगलीच्या विविध भाजी मंडईत व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांमध्ये संभ्रम आहे. शेतकऱ्यांच्या शेतीमाल पुरवठा बंदच्या आंदोलनाबाबत अनेकजण अनभिज्ञ आहेत. येत्या दोन दिवसातील परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येणार असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.