शहरं
Join us  
Trending Stories
1
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
2
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
3
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
4
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
5
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
6
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
7
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
8
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
9
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
10
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
11
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
12
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
13
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
14
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...
15
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू
16
Hero: ड्युअल डिस्क ब्रेक्स, मल्टीपल राइडिंग मोड्स आणि बरेच काही; हिरो एक्सट्रीम १२५ आर लॉन्च!
17
Dance Bar Raid: उल्हासनगरातील चांदणी लेडीज सर्व्हिस बारवर पोलिसांची धाड, ९ महिलांसह १५ जणांना अटक
18
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
19
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
20
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या

शेतीमाल पुरवठ्याबाबत बाजारपेठेत संभ्रम

By admin | Updated: May 31, 2017 23:19 IST

शेतीमाल पुरवठ्याबाबत बाजारपेठेत संभ्रम

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : रघुनाथदादा पाटील यांच्या शेतकरी संघटनेने पुकारलेल्या शेतकऱ्यांच्या बंद आंदोलनास १ जूनपासून सुरुवात होत आहे. किसान सभेनेही या आंदोलनास पाठिंबा दर्शविला असून, दूध, भाजीपाला, फळभाज्यांचा पुरवठा गुरुवारपासून बंद करण्याचा इशारा संघटनेने दिल्याने, सांगलीच्या बाजारात संभ्रमाचे व चिंतेचे वातावरण आहे. राज्यात अनेक शेतकरी संघटनांनी याबाबतचे आंदोलन पुकारले आहे. सांगली जिल्ह्यात रघुनाथदादा पाटील आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांनी याबाबत शेतकऱ्यांना बंदचे आवाहन केले आहे. आंदोलनाबाबत रघुनाथदादा पाटील म्हणाले की, बंद आंदोलनात शेतकरी स्वत:हून उतरले आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील पुणतांब्यापासून सुरू झालेल्या आंदोलनाची ही धग आता संपूर्ण महाराष्ट्रात पसरणार आहे. आर्थिक संकट शेतकऱ्यांच्या जिवाशी आल्याने, ते स्वत:हून आंदोलनात उतरले आहेत. दूध, फळभाज्या, भाजीपाला यांची विक्री १ जूनपासून बंद करण्यात येईल. शेतीतून तयार झालेला कोणताही माल शेतकरी बाजारात विकणार नाहीत. गावातच वस्तुविनिमय स्वरुपात त्याचा विनियोग होईल. त्यामुळे या आंदोलनाचे चटके हळुहळू बाजारपेठांना आणि पर्यायाने शासनाला बसायला सुरुवात होईल. आंदोलनाची तीव्रता वाढविण्यासाठी येत्या काही दिवसात रास्ता रोकोसारखी आंदोलनेही करण्यात येतील. ते म्हणाले की, शेतकऱ्यांचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न सरकार करीत आहे. यातून सरकारची मानसिकता दिसत आहे. अशाप्रकारे शेतकऱ्यांमधील सरकारविरोधी असंतोष आणखी तीव्र होईल. आंदोलनात अन्य संघटनाही उतरतील अशी आशा आहे. मला किंवा कोणत्याही संघटनेच्या श्रेयाचा हा प्रश्न नाही. त्यामुळेच पुणतांब्यातील आंदोलनात स्वाभिमानी, शरद जोशीप्रणित शेतकरी संघटना, किसान सभा असे सर्वजण एकत्र दिसले. पश्चिम महाराष्ट्रातही हे चित्र दिसेल, अशी आशा आहे. शेतकरी संघटनेचा पाठिंबासांगली : अहमदनगर जिल्ह्यातील पुणतांबे या गावातील शेतकऱ्यांनी संपाची घोषणा केली आहे. त्याला शरद जोशीप्रणित शेतकरी संघटनेचा पाठिंबा आहे. शेतकरी संपावर या आंदोलनांतर्गत दि. १ जूनपासून दूध व भाजीपाला न विकण्याचे आंदोलन जाहीर केले आहे. सरकारला शेतकरी एकजूट दाखवण्यासाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती नेते संजय कोले यांनी दिली. आंदोलनात रस्त्यावर आंदोलन करण्यापेक्षा बांधावरच करण्यात यावे. यासाठी कुटुंबाला लागेल तेवढेच धान्य, भाजीपाला, दूध उत्पादित करावे. तेवढाच पेरा करावा. उर्वरित शेतात हिरवळीचे खत उत्पादित करणारी पिके करावीत. जनावरांच्या चाऱ्याचे उत्पादन घ्यावे. दूध बाजारात नेण्यापेक्षा त्याचे घरीच लोणी, तूप बनवावे. ते दीर्घकाळ टिकते. उत्पादित शेतमाल शहराकडे न पाठवता गावातच विकावा. त्यामुळे आंदोलन शांततेत पार पडेल. शेतकऱ्यांनी आंदोलनात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाप्रमुख रामचंद्र कणसे, जिल्हाध्यक्ष सुनील फराटे, जिल्हा प्रतिनिधी मोहन परमणे, मिरज तालुकाप्रमुख एकनाथ कापसे, माजी जिल्हाप्रमुख शीतल राजोबा आदींनी केले आहे. विक्रेते अनभिज्ञशेतकऱ्यांच्या संपाबाबत अधिकृत माहिती उपलब्ध नसल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात येत आहे. यामुळे सांगलीच्या विविध भाजी मंडईत व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांमध्ये संभ्रम आहे. शेतकऱ्यांच्या शेतीमाल पुरवठा बंदच्या आंदोलनाबाबत अनेकजण अनभिज्ञ आहेत. येत्या दोन दिवसातील परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येणार असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.