शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
2
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
3
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
4
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
5
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
6
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
7
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
8
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
9
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
10
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
11
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
12
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
13
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
14
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
15
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
16
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
17
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
18
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
19
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
20
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?

शेतीमाल पुरवठ्याबाबत बाजारपेठेत संभ्रम

By admin | Updated: May 31, 2017 23:19 IST

शेतीमाल पुरवठ्याबाबत बाजारपेठेत संभ्रम

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : रघुनाथदादा पाटील यांच्या शेतकरी संघटनेने पुकारलेल्या शेतकऱ्यांच्या बंद आंदोलनास १ जूनपासून सुरुवात होत आहे. किसान सभेनेही या आंदोलनास पाठिंबा दर्शविला असून, दूध, भाजीपाला, फळभाज्यांचा पुरवठा गुरुवारपासून बंद करण्याचा इशारा संघटनेने दिल्याने, सांगलीच्या बाजारात संभ्रमाचे व चिंतेचे वातावरण आहे. राज्यात अनेक शेतकरी संघटनांनी याबाबतचे आंदोलन पुकारले आहे. सांगली जिल्ह्यात रघुनाथदादा पाटील आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांनी याबाबत शेतकऱ्यांना बंदचे आवाहन केले आहे. आंदोलनाबाबत रघुनाथदादा पाटील म्हणाले की, बंद आंदोलनात शेतकरी स्वत:हून उतरले आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील पुणतांब्यापासून सुरू झालेल्या आंदोलनाची ही धग आता संपूर्ण महाराष्ट्रात पसरणार आहे. आर्थिक संकट शेतकऱ्यांच्या जिवाशी आल्याने, ते स्वत:हून आंदोलनात उतरले आहेत. दूध, फळभाज्या, भाजीपाला यांची विक्री १ जूनपासून बंद करण्यात येईल. शेतीतून तयार झालेला कोणताही माल शेतकरी बाजारात विकणार नाहीत. गावातच वस्तुविनिमय स्वरुपात त्याचा विनियोग होईल. त्यामुळे या आंदोलनाचे चटके हळुहळू बाजारपेठांना आणि पर्यायाने शासनाला बसायला सुरुवात होईल. आंदोलनाची तीव्रता वाढविण्यासाठी येत्या काही दिवसात रास्ता रोकोसारखी आंदोलनेही करण्यात येतील. ते म्हणाले की, शेतकऱ्यांचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न सरकार करीत आहे. यातून सरकारची मानसिकता दिसत आहे. अशाप्रकारे शेतकऱ्यांमधील सरकारविरोधी असंतोष आणखी तीव्र होईल. आंदोलनात अन्य संघटनाही उतरतील अशी आशा आहे. मला किंवा कोणत्याही संघटनेच्या श्रेयाचा हा प्रश्न नाही. त्यामुळेच पुणतांब्यातील आंदोलनात स्वाभिमानी, शरद जोशीप्रणित शेतकरी संघटना, किसान सभा असे सर्वजण एकत्र दिसले. पश्चिम महाराष्ट्रातही हे चित्र दिसेल, अशी आशा आहे. शेतकरी संघटनेचा पाठिंबासांगली : अहमदनगर जिल्ह्यातील पुणतांबे या गावातील शेतकऱ्यांनी संपाची घोषणा केली आहे. त्याला शरद जोशीप्रणित शेतकरी संघटनेचा पाठिंबा आहे. शेतकरी संपावर या आंदोलनांतर्गत दि. १ जूनपासून दूध व भाजीपाला न विकण्याचे आंदोलन जाहीर केले आहे. सरकारला शेतकरी एकजूट दाखवण्यासाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती नेते संजय कोले यांनी दिली. आंदोलनात रस्त्यावर आंदोलन करण्यापेक्षा बांधावरच करण्यात यावे. यासाठी कुटुंबाला लागेल तेवढेच धान्य, भाजीपाला, दूध उत्पादित करावे. तेवढाच पेरा करावा. उर्वरित शेतात हिरवळीचे खत उत्पादित करणारी पिके करावीत. जनावरांच्या चाऱ्याचे उत्पादन घ्यावे. दूध बाजारात नेण्यापेक्षा त्याचे घरीच लोणी, तूप बनवावे. ते दीर्घकाळ टिकते. उत्पादित शेतमाल शहराकडे न पाठवता गावातच विकावा. त्यामुळे आंदोलन शांततेत पार पडेल. शेतकऱ्यांनी आंदोलनात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाप्रमुख रामचंद्र कणसे, जिल्हाध्यक्ष सुनील फराटे, जिल्हा प्रतिनिधी मोहन परमणे, मिरज तालुकाप्रमुख एकनाथ कापसे, माजी जिल्हाप्रमुख शीतल राजोबा आदींनी केले आहे. विक्रेते अनभिज्ञशेतकऱ्यांच्या संपाबाबत अधिकृत माहिती उपलब्ध नसल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात येत आहे. यामुळे सांगलीच्या विविध भाजी मंडईत व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांमध्ये संभ्रम आहे. शेतकऱ्यांच्या शेतीमाल पुरवठा बंदच्या आंदोलनाबाबत अनेकजण अनभिज्ञ आहेत. येत्या दोन दिवसातील परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येणार असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.