शहरं
Join us  
Trending Stories
1
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
2
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
3
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
4
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
5
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
6
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
7
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
8
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
9
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
10
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
11
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
12
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
13
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
14
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
15
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
16
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
17
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
18
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
19
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
20
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
Daily Top 2Weekly Top 5

शेतीमाल पुरवठ्याबाबत बाजारपेठेत संभ्रम

By admin | Updated: May 31, 2017 23:19 IST

शेतीमाल पुरवठ्याबाबत बाजारपेठेत संभ्रम

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : रघुनाथदादा पाटील यांच्या शेतकरी संघटनेने पुकारलेल्या शेतकऱ्यांच्या बंद आंदोलनास १ जूनपासून सुरुवात होत आहे. किसान सभेनेही या आंदोलनास पाठिंबा दर्शविला असून, दूध, भाजीपाला, फळभाज्यांचा पुरवठा गुरुवारपासून बंद करण्याचा इशारा संघटनेने दिल्याने, सांगलीच्या बाजारात संभ्रमाचे व चिंतेचे वातावरण आहे. राज्यात अनेक शेतकरी संघटनांनी याबाबतचे आंदोलन पुकारले आहे. सांगली जिल्ह्यात रघुनाथदादा पाटील आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांनी याबाबत शेतकऱ्यांना बंदचे आवाहन केले आहे. आंदोलनाबाबत रघुनाथदादा पाटील म्हणाले की, बंद आंदोलनात शेतकरी स्वत:हून उतरले आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील पुणतांब्यापासून सुरू झालेल्या आंदोलनाची ही धग आता संपूर्ण महाराष्ट्रात पसरणार आहे. आर्थिक संकट शेतकऱ्यांच्या जिवाशी आल्याने, ते स्वत:हून आंदोलनात उतरले आहेत. दूध, फळभाज्या, भाजीपाला यांची विक्री १ जूनपासून बंद करण्यात येईल. शेतीतून तयार झालेला कोणताही माल शेतकरी बाजारात विकणार नाहीत. गावातच वस्तुविनिमय स्वरुपात त्याचा विनियोग होईल. त्यामुळे या आंदोलनाचे चटके हळुहळू बाजारपेठांना आणि पर्यायाने शासनाला बसायला सुरुवात होईल. आंदोलनाची तीव्रता वाढविण्यासाठी येत्या काही दिवसात रास्ता रोकोसारखी आंदोलनेही करण्यात येतील. ते म्हणाले की, शेतकऱ्यांचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न सरकार करीत आहे. यातून सरकारची मानसिकता दिसत आहे. अशाप्रकारे शेतकऱ्यांमधील सरकारविरोधी असंतोष आणखी तीव्र होईल. आंदोलनात अन्य संघटनाही उतरतील अशी आशा आहे. मला किंवा कोणत्याही संघटनेच्या श्रेयाचा हा प्रश्न नाही. त्यामुळेच पुणतांब्यातील आंदोलनात स्वाभिमानी, शरद जोशीप्रणित शेतकरी संघटना, किसान सभा असे सर्वजण एकत्र दिसले. पश्चिम महाराष्ट्रातही हे चित्र दिसेल, अशी आशा आहे. शेतकरी संघटनेचा पाठिंबासांगली : अहमदनगर जिल्ह्यातील पुणतांबे या गावातील शेतकऱ्यांनी संपाची घोषणा केली आहे. त्याला शरद जोशीप्रणित शेतकरी संघटनेचा पाठिंबा आहे. शेतकरी संपावर या आंदोलनांतर्गत दि. १ जूनपासून दूध व भाजीपाला न विकण्याचे आंदोलन जाहीर केले आहे. सरकारला शेतकरी एकजूट दाखवण्यासाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती नेते संजय कोले यांनी दिली. आंदोलनात रस्त्यावर आंदोलन करण्यापेक्षा बांधावरच करण्यात यावे. यासाठी कुटुंबाला लागेल तेवढेच धान्य, भाजीपाला, दूध उत्पादित करावे. तेवढाच पेरा करावा. उर्वरित शेतात हिरवळीचे खत उत्पादित करणारी पिके करावीत. जनावरांच्या चाऱ्याचे उत्पादन घ्यावे. दूध बाजारात नेण्यापेक्षा त्याचे घरीच लोणी, तूप बनवावे. ते दीर्घकाळ टिकते. उत्पादित शेतमाल शहराकडे न पाठवता गावातच विकावा. त्यामुळे आंदोलन शांततेत पार पडेल. शेतकऱ्यांनी आंदोलनात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाप्रमुख रामचंद्र कणसे, जिल्हाध्यक्ष सुनील फराटे, जिल्हा प्रतिनिधी मोहन परमणे, मिरज तालुकाप्रमुख एकनाथ कापसे, माजी जिल्हाप्रमुख शीतल राजोबा आदींनी केले आहे. विक्रेते अनभिज्ञशेतकऱ्यांच्या संपाबाबत अधिकृत माहिती उपलब्ध नसल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात येत आहे. यामुळे सांगलीच्या विविध भाजी मंडईत व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांमध्ये संभ्रम आहे. शेतकऱ्यांच्या शेतीमाल पुरवठा बंदच्या आंदोलनाबाबत अनेकजण अनभिज्ञ आहेत. येत्या दोन दिवसातील परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येणार असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.