शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Kanchenjunga Express Train Accident: बंगालमध्ये ट्रेनचा मोठा अपघात! कंचनजंगा एक्स्प्रेसला भरधाव मालगाडीची धडक, ५ जणांचा मृत्यू
2
देवेंद्र फडणवीसांनी मला संकटातून वाचवलं; खासदार नरेश म्हस्केंनी सांगितला किस्सा
3
बापरे! महागाईचा सर्जिकल स्ट्राइक; पाकिस्तानात टोमॅटो २०० रुपये किलो
4
चाळिशीनंतर स्वत:ला जपा! महिलांना 'या' आजारांचा मोठा धोका; दुर्लक्ष करणं बेतेल जीवावर
5
अनंत अंबानी-राधिका मर्चंटचे प्री-वेडिंग शूट करणाऱ्या फोटोग्राफरचे मानधन किती? जाणून घ्या
6
सावधान! पावसाळ्यात समोसा, वडापाव खाणं पडू शकतं महागात; 'या' आजारांचा सर्वाधिक धोका
7
Market Cap: मुकेश अंबानींच्या रिलायन्सची हवा, LICची ही झाली मोठी कमाई; TCS सह 'या' कंपन्यांना नुकसान
8
'फादर्स डे' निमित्त जिनिलीयाने लिहिलेली पोस्ट वाचून रितेश देशमुख म्हणाला - 'बायको तुझ्याशिवाय...'
9
Munjya Box Office Collection : बॉक्स ऑफिसवर 'मुंज्या'चं राज्य; १० दिवसात मोडला 'मैदान'चा लाइफटाइम कलेक्शनचा रेकॉर्ड
10
नागपुरात परत हिट ॲंड रन, फुटपाथवर झोपलेल्या आठ जणांना मद्यधुंद कारचालकाने चिरडले, दोघांचा मृत्यू
11
Sanjay Raut : "रवींद्र वायकर यांचा विजय खरा नाही, विजयी करणारा फोन पोलीस स्टेशनमधून बदलण्याचा प्रयत्न"
12
ईदनिमित्त दुर्गाडी देवीच्या दर्शनासाठी बंदी; शिवसेना शिंदे गट - ठाकरे गटाचे घंटानाद आंदोलन
13
"मी स्वत:च नकार दिला..."; मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळताच भाजपा नेत्याचा मोठा खुलासा
14
Modi 3.0 Budget : पहिल्या अर्थसंकल्पात नोकऱ्यांवर भर देण्याची शक्यता; PLI स्कीम, लघु उद्योगांना मिळणार प्रोत्साहन
15
सूर्य तळपतोय! उष्णतेचा प्रकोप ठरतोय जीवघेणा; उत्तर प्रदेशमध्ये ३३ जणांचा मृत्यू
16
गुरपतवंत सिंग पन्नूनच्या हत्येचा कट रचणाऱ्या आरोपीचे प्रत्यार्पण, चेक रिपब्लिकमधून निखिल गुप्ता अमेरिकेत
17
Success Story : एकेकाळी ₹२५० साठी करायचे काम, १२वी मध्ये दोनदा अपयश; आता उभी केली ₹१ लाख कोटींची कंपनी
18
'अभिनेत्री' आलिया भट झाली 'लेखिका', स्वतःच्या पहिल्या पुस्तकाचं केलं प्रकाशन! काय आहे विषय?
19
नवीन मालिका सुरु होत असताना शिवानी सुर्वेने चाहत्यांना केलं आवाहन, म्हणाली - "१२ वर्षांपुर्वी..."
20
वायकरांच्या मतदारसंघातील मतमोजणीवरून वादंग; निवडणूक आयोगाने EVMबाबत दिलं 'हे' स्पष्टीकरण

अनेकांचा डोळा : कवलापूरच्या शासकीय जागेसाठी--रस्सीखेच सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2018 12:05 AM

कवलापूर (ता. मिरज) येथील नियोजित विमानतळाची जागा पडून असल्याने ती मिळविण्यासाठी विविध शासकीय कार्यालयांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. उपप्रादेशिक परिवहन (आरटीओ), जिल्हा मध्यवर्ती कारागृह,

ठळक मुद्देआरटीओ, कारागृह, पाटबंधारे, महावितरण, विद्यापीठसह विविध कार्यालयांची मागणी

सचिन लाड ।सांगली : कवलापूर (ता. मिरज) येथील नियोजित विमानतळाची जागा पडून असल्याने ती मिळविण्यासाठी विविध शासकीय कार्यालयांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. उपप्रादेशिक परिवहन (आरटीओ), जिल्हा मध्यवर्ती कारागृह, पाटबंधारे विभाग, महावितरण, विद्यापीठसह विविध कार्यालयांनी जागेला पसंती दर्शवित प्रशस्त कार्यालय उभारण्यासाठी या जागेची मागणी केली आहे. ही जागा मिळविण्यासाठी त्यांच्यात रस्सीखेच सुरू आहे. पण शासनाकडून एकाही कार्यालयाला अजून हिरवा कंदील मिळालेला नाही.

कवलापूर हे मिरज तालुक्यातील ३५ हजार लोकसंख्येचे गाव आहे. सांगलीपासून अवघ्या नऊ किलोमीटरवर असलेल्या या गावात सुमारे दीडशे एकराचे माळरान आहे. या माळरानावर विमानतळ करण्यासाठी शासनाने फार वर्षांपूर्वी निर्णय घेतला. तेव्हापासून ही जागा विमानतळ म्हणून ओळखली जाते. गेल्या अनेक वर्षांपासून ही जागा महाराष्टÑ औद्योगिक विकास महामंडळाच्या ताब्यात आहे. महामंडळाकडून येथे औद्योगिक क्षेत्र विकसित करण्याचा विचार होता; पण शासकीय स्तरावर काहीच हालचाली झाल्या नाहीत. शासनाने येथे विमानतळ करण्याचा निर्णय घेतला. शिवसेना-भाजप युतीचे सरकार आल्यानंतर विमानतळ करण्यास गती मिळाली. मंत्र्यांच्याहस्ते भूमिपूजन झाले. युतीची सत्ता गेल्यानंतर काँग्रेस-राष्टवादी आघाडीची सत्ता आली. या सरकारनेही विमानतळासाठी नव्याने भूमिपूजन करून घेतले.

नियोजित विमानतळाच्या धावपट्टीसाठी अनेक शेतकऱ्यांची शेतजमीन जाणार होती. त्यामुळे येथील शेतकºयांनी विमानतळास विरोध केला. हे प्रकरण न्यायालयात गेले. न्यायालयाने शेतकºयांच्या बाजूने निर्णय दिल्याने शासनाने विमानतळ उभारण्याचा विचार सोडून दिला. ही जागा कित्येक वर्षांपासून पडीक आहे. ग्रामस्थ त्याचा गायरान जमीन म्हणून वापर करीत आहेत. महसूल विभागाने ही जागा ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांना अद्याप यश आले नाही.

सध्या सांगलीचे कारागृह स्थलांतर करण्यासाठी ३२ एकर जागेची गरज आहे. कारागृह प्रशासनाने प्रथम या जागेवर हक्क सांगत तशी मागणी केली. आरटीओ, पाटबंधारे विभाग, महावितरण, कृषी विभाग, शिवाजी विद्यापीठ उपकेंद्र यासह विविध कार्यालयांसाठी याठिकाणच्या जागेची मागणी केली आहे. शासनाकडे प्रस्तावही पाठविले आहेत. मात्र हे प्रस्ताव धूळ खात पडून आहेत. आरटीओंनी ‘ब्रेक टेस्ट ट्रॅक’ उभा करण्यासाठीही जागा मागितली होती, मात्र औद्योगिक महामंडळाने नकार दिला. सध्या या जागेवर कधीतरी मंत्र्यांचे हेलिकॉप्टर उतरते. यासाठी हेलिपॅडही तयार केले जाते.औद्योगिक वसाहत : प्रस्ताव तयारएकीकडे अनेक शासकीय कार्यालयाच्या प्रमुखांनी ही जागा मिळविण्यासाठी धडपड सुरू ठेवली आहे, तर दुसरीकडे या जागेचे मालक असलेले औद्योगिक विकास महामंडळ जागा देण्यास तयार नाही. त्यांनी याठिकाणी औद्योगिक वसाहत (मिनी एमआयडीसी) उभा करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. यासाठी काही महिन्यांपूर्वी रेखांकन मंजूर करुन निविदाही काढली आहे. औद्योगिक वसाहत झाल्यास रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. तसेच कवलापूरच्या ग्रामस्थांनीही शासकीय कार्यालयास जागा देण्यास विरोध केला आहे.

टॅग्स :SangliसांगलीMIDCएमआयडीसी