शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
3
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
4
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
5
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
6
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
7
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
8
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
9
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
10
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
11
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
12
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
13
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
14
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
15
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
16
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
17
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
18
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
19
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
20
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय

मुलींच्या अपहरणप्रकरणी सावत्र आईला सक्तमजुरी बांबवडे-शिराळा येथील घटना : आरोपी महिला लातूरची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2018 23:43 IST

इस्लामपूर : बांबवडे (ता. शिराळा) येथून तीन अल्पवयीन मुलींचे अपहरण करून त्यांना अमानवी कृत्यासाठी विकण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिलेस येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाच्या पहिले जिल्हा न्यायाधीश श्रीमती के. एस. होरे यांनी

इस्लामपूर : बांबवडे (ता. शिराळा) येथून तीन अल्पवयीन मुलींचे अपहरण करून त्यांना अमानवी कृत्यासाठी विकण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिलेस येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाच्या पहिले जिल्हा न्यायाधीश श्रीमती के. एस. होरे यांनी दोषी धरत तिला पाच वर्षे सश्रम कारावास आणि ६ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.शिक्षा झालेली ही महिला आरोपी लातूर जिल्ह्यातील टाकळी बुद्रुक येथील राहणारी आहे. विद्या रघुनाथ गायकवाड (वय ३६) असे तिचे नाव आहे. या आरोपी महिलेने ८ ते ९ जणांबरोबर लग्न करून संसारही थाटला होता. अल्पवयीन मुलींना पळवून नेण्यापूर्वी तिने बांबवडे (ता. शिराळा) येथील मानसिंग हिंदुराव धुमाळ यांच्याशी संसार केला. न्यायालयाने तिला कलम ३६३, ३६६ आणी ३६६ (अ) नुसार प्रत्येकी पाच वर्षे सश्रम कारावास व दंडाची शिक्षा सुनावली. दंड न दिल्यास तिला आणखी ३ महिने सश्रम कारावास भोगावा लागणार आहे.या खटल्याची पार्श्वभूमी अशी, आरोपी विद्या रघुनाथ गायकवाड हिने अनेक नवºयांना गंडा घातल्यानंतर मानसिंग धुमाळ यांच्याशी लग्न केले. त्यांना पहिल्या पत्नीपासून १६, १४ आणि ११ वर्षे वयाच्या तीन मुली होत्या. विद्या ही या मुलींना सावत्र आई लागत होती. या मुली अल्पवयीन आहेत, हे माहीत असतानाही ती मुलींना ‘तुमचे चांगल्या ठिकाणी लग्न लावून देते’ असे म्हणून फूस लावत होती. ५ एप्रिल २०१७ रोजी विद्या बांबवडे येथील राहत्या घरातून या तीन मुलींना पळवून घेऊन गेली.त्यानंतर मुलींचे वडील मानसिंग धुमाळ यांनी तिच्याविरुद्ध शिराळा पोलिसांत फिर्याद दिली. विद्या ही या मुलींना घेऊन पोलिसांना चकवा देत तब्बल पावणेदोन महिने फरारी राहिली होती. यादरम्यान या मुलींना हातकणंगले येथील धनगर गल्लीत भाड्याने खोली घेऊन ठेवले होते. तेथे वेगवेगळ्या ग्राहकांना आणून त्या मुलींना दाखवत होती. त्याचवेळी पोलिसांनी तिला २७ मे रोजी अटक केली होती. या खटल्यात सरकार पक्षाला हवालदार टी. ए. पवार, चंद्रकांत शितोळे यांनी मदत केली.दहा साक्षीदार तपासलेअतिरिक्त जिल्हा सरकारी वकील रणजित पाटील यांनी सरकार पक्षातर्फे १० साक्षीदार तपासले. त्यामध्ये आरोपी विद्याच्या दोन पूर्व नवºयांनीही साक्ष दिली. फिर्यादी मानसिंग धुमाळ, १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी, साक्षीदार यांच्यासह तपास अधिकारी पी. एन. गायखे आणि पोलीस उपअधीक्षक किशोर काळे यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. रणजित पाटील यांनी आपल्या युक्तिवादात आरोपी विद्या गायकवाडचे कृत्य हे पूर्वनियोजित आणि हेतूत: केले गेले आहे. तिने अनेकांशी लग्न केले आहे. तिच्यावर कोणीही अवलंबून नाही. त्यामुळे तिच्या हातून पुन्हा असा गुन्हा घडू नये यासाठी जास्तीत जास्त शिक्षा द्यावी, अशी मागणी केली.

टॅग्स :Sangeeta Thombareसंगीता ठोंबरेlaturलातूरCrimeगुन्हा