शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
5
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
6
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
7
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
8
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
9
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
10
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
11
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
12
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
13
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
14
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
15
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
16
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
17
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
18
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
19
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
20
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
Daily Top 2Weekly Top 5

मुलींच्या अपहरणप्रकरणी सावत्र आईला सक्तमजुरी बांबवडे-शिराळा येथील घटना : आरोपी महिला लातूरची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2018 23:43 IST

इस्लामपूर : बांबवडे (ता. शिराळा) येथून तीन अल्पवयीन मुलींचे अपहरण करून त्यांना अमानवी कृत्यासाठी विकण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिलेस येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाच्या पहिले जिल्हा न्यायाधीश श्रीमती के. एस. होरे यांनी

इस्लामपूर : बांबवडे (ता. शिराळा) येथून तीन अल्पवयीन मुलींचे अपहरण करून त्यांना अमानवी कृत्यासाठी विकण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिलेस येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाच्या पहिले जिल्हा न्यायाधीश श्रीमती के. एस. होरे यांनी दोषी धरत तिला पाच वर्षे सश्रम कारावास आणि ६ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.शिक्षा झालेली ही महिला आरोपी लातूर जिल्ह्यातील टाकळी बुद्रुक येथील राहणारी आहे. विद्या रघुनाथ गायकवाड (वय ३६) असे तिचे नाव आहे. या आरोपी महिलेने ८ ते ९ जणांबरोबर लग्न करून संसारही थाटला होता. अल्पवयीन मुलींना पळवून नेण्यापूर्वी तिने बांबवडे (ता. शिराळा) येथील मानसिंग हिंदुराव धुमाळ यांच्याशी संसार केला. न्यायालयाने तिला कलम ३६३, ३६६ आणी ३६६ (अ) नुसार प्रत्येकी पाच वर्षे सश्रम कारावास व दंडाची शिक्षा सुनावली. दंड न दिल्यास तिला आणखी ३ महिने सश्रम कारावास भोगावा लागणार आहे.या खटल्याची पार्श्वभूमी अशी, आरोपी विद्या रघुनाथ गायकवाड हिने अनेक नवºयांना गंडा घातल्यानंतर मानसिंग धुमाळ यांच्याशी लग्न केले. त्यांना पहिल्या पत्नीपासून १६, १४ आणि ११ वर्षे वयाच्या तीन मुली होत्या. विद्या ही या मुलींना सावत्र आई लागत होती. या मुली अल्पवयीन आहेत, हे माहीत असतानाही ती मुलींना ‘तुमचे चांगल्या ठिकाणी लग्न लावून देते’ असे म्हणून फूस लावत होती. ५ एप्रिल २०१७ रोजी विद्या बांबवडे येथील राहत्या घरातून या तीन मुलींना पळवून घेऊन गेली.त्यानंतर मुलींचे वडील मानसिंग धुमाळ यांनी तिच्याविरुद्ध शिराळा पोलिसांत फिर्याद दिली. विद्या ही या मुलींना घेऊन पोलिसांना चकवा देत तब्बल पावणेदोन महिने फरारी राहिली होती. यादरम्यान या मुलींना हातकणंगले येथील धनगर गल्लीत भाड्याने खोली घेऊन ठेवले होते. तेथे वेगवेगळ्या ग्राहकांना आणून त्या मुलींना दाखवत होती. त्याचवेळी पोलिसांनी तिला २७ मे रोजी अटक केली होती. या खटल्यात सरकार पक्षाला हवालदार टी. ए. पवार, चंद्रकांत शितोळे यांनी मदत केली.दहा साक्षीदार तपासलेअतिरिक्त जिल्हा सरकारी वकील रणजित पाटील यांनी सरकार पक्षातर्फे १० साक्षीदार तपासले. त्यामध्ये आरोपी विद्याच्या दोन पूर्व नवºयांनीही साक्ष दिली. फिर्यादी मानसिंग धुमाळ, १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी, साक्षीदार यांच्यासह तपास अधिकारी पी. एन. गायखे आणि पोलीस उपअधीक्षक किशोर काळे यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. रणजित पाटील यांनी आपल्या युक्तिवादात आरोपी विद्या गायकवाडचे कृत्य हे पूर्वनियोजित आणि हेतूत: केले गेले आहे. तिने अनेकांशी लग्न केले आहे. तिच्यावर कोणीही अवलंबून नाही. त्यामुळे तिच्या हातून पुन्हा असा गुन्हा घडू नये यासाठी जास्तीत जास्त शिक्षा द्यावी, अशी मागणी केली.

टॅग्स :Sangeeta Thombareसंगीता ठोंबरेlaturलातूरCrimeगुन्हा