शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
2
“काँग्रेसचे पाक प्रेम उतू चाललेय, ऑपरेशन सिंदूरचा हिशोब विचारणारे देशद्रोही”: एकनाथ शिंदे
3
ढाका येथील भारतीय उच्चायुक्तालयाला धमकी, सरकारने बांगलादेशी अधिकाऱ्याला समन्स बजावले
4
भारतीय बाजारात उद्याच स्वस्तातली सात सीटर कार लाँच होणार; अर्टिगा, ट्रायबरला मिळणार टक्कर...
5
स्वस्त 'पर्सनल लोन'च्या शोधात आहात? 'या' ५ बँकांमध्ये मिळतोय सर्वात कमी व्याजदर; १२ लाखांचा EMI किती?
6
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
7
खुशखबर! थिएटरनंतर आता OTTवर दाखल होतोय 'धुरंधर', जाणून घ्या कुठे आणि कधी पाहता येणार?
8
PM मोदी जॉर्डन-ओमान दौऱ्यावर, तर जयशंकर इजराइलमध्ये; भारताचा जगाला स्पष्ट संदेश..!
9
मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बुरखा हटवल्याने महिला डॉक्टर धक्क्यात; सरकारी नोकरी नाकारून सोडले राज्य
10
काव्या मारननं पारखलं सोनं! अनसोल्ड खेळाडूवर लावली बोली, त्यानं ४८ चेंडूत कुटल्या ७६ धावा
11
Post Office ची जबरदस्त स्कीम... घरबसल्या दर महिन्याला होईल २० हजार रुपयांची कमाई, कोणती आहे योजना, पाहा डिटेल्स
12
बुकिंग सुरू होताच 'या' कारवर तुटून पडले लोक, 24 तासांत 70000 यूनिट बूक; खिशात हवेत फक्त ₹21000
13
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दागिने घेताना १०० वेळा विचार करावा लागणार; चांदी २ लाखांच्या पार, सोन्याच्या दरातही मोठी तेजी
14
राजकीय सूडबुद्धीतून रचलेले प्रकरण, ईडी-सीबीआयचा गैरवापर; 'नॅशनल हेराल्ड'वरुन खरगेंची मोदी-शाहांवर टीका
15
...अन् त्यावेळी राष्ट्रपती बनण्याचा प्रस्ताव वाजपेयींनी नाकारला; 'अटल संस्मरण' पुस्तकात दावा
16
“मातोश्रीबाबत मनात आदर कायम, पण...”; शिंदे गटात प्रवेश करताच बड्या नेत्याने सगळेच सांगितले
17
Video - हार्ट अटॅकमुळे वेदनेने तडफडत होता पती; पत्नीने जोडले हात, पण कोणीच केली नाही मदत
18
शेतकऱ्यांसाठी मोठा अलर्ट! फार्मर आयडीशिवाय पीएम किसानचे पैसे येणार नाहीत; अशी तयार करा ID
19
‘मी काही चुकीचं बोललो नाही, माफी मागण्याचा प्रश्नच नाही..’, पृथ्वीराज चव्हाण ऑपरेशन सिंदूरबाबतच्या वक्तव्यावर ठाम  
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद: कर्नाटकातील ८८५ मराठी गावे अगोदर द्या, मग जतचे बोला; सांगलीतून तीव्र संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2022 12:59 IST

बोम्मई यांच्या दाव्यास जत तालुक्यात तीव्र विरोध

सांगली : कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगली जिल्ह्यातील जत तालुका कर्नाटकचा असल्याचा दावा केल्यानंतर जिल्ह्यातून संताप व्यक्त होत आहे. कर्नाटकातील ८८५ मराठी बहुभाषिक गावे अगोदर महाराष्ट्राला द्या, मग कन्नड गावांचे बोला, असा इशारा सीमा लढ्यातील कार्यकर्त्यांनी दिला असून जत तालुक्यातील राजकीय नेते व कार्यकर्त्यांनी बोम्मई यांच्या दाव्यास तीव्र विरोध दर्शविला.जत तालुक्यातील ६५ गावांनी २०१२ मध्ये पाणीप्रश्नावर महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांवर संताप व्यक्त करीत कर्नाटकात जाण्याचा इशारा दिला होता. तोच दाखला देत बोम्मई यांनी ही गावे कर्नाटकात घेण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे वक्तव्य मंगळवारी केले. त्यावरून महाराष्ट्रात व विशेषत: सांगली जिल्ह्यात वाद पेटला आहे. बोम्मई यांच्या दाव्यास जत तालुक्यात तीव्र विरोध केला गेला. सीमा लढ्यातील ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी कर्नाटकातील बेळगाव, कारवार, बिदर, भालकी येथील ८८५ मराठी भाषिक गावांचा जुना दावा नव्याने मांडला.

बोम्मई यांनी जत तालुक्यावरून राजकीय भांडवल करू नये. लोकांनी काही वर्षांपूर्वी पाणीप्रश्नावरून कर्नाटकात जाण्याचा इशारा दिला होता. त्याचा संदर्भ देऊन दावा करणे अयोग्य आहे. तालुक्यातील पाणीप्रश्न बऱ्यापैकी मार्गी लागले आहेत. उर्वरित कामेही येत्या काही वर्षांत होतील. त्यामुळे कर्नाटकात कोणीही जाण्यास आता इच्छुक नाही.- विक्रम सावंत, आमदार, जत

जत तालुक्यावर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी दावा करणे अयोग्य आहे. आमचा त्यास विरोध राहील. - विलासराव जगताप, माजी आमदार

भूप्रदेश सलगता व बहुभाषिक या मुद्यावर आमच्यातील काही गावे कर्नाटकला व कर्नाटकातील ८८५ मराठी गावे महाराष्ट्राला मिळावी, अशी यापूर्वीच मागणी केली होती. १९५० मधील परिस्थितीनुसार निर्णय घ्यावेत. अगोदर आमची गावे आम्हाला द्या. - ॲड. अजित सूर्यवंशी, सीमा लढ्यातील कार्यकर्ते

जे सरकार भाकरीचा प्रश्न सोडवू शकत नाही, ते असे मुद्दे उकरून काढते. कर्नाटक, महाराष्ट्र व केंद्रातही भाजपचे सरकार असल्याने ते असे प्रश्न पेटविण्याचा प्रयत्न करतात. आम्ही त्याला भीक घालणार नाही. - ॲड. के. डी. शिंदे, सीमा लढ्यातील कार्यकर्ते

आम्ही जत तालुका तर देणार नाहीच, ऊलट बेळगाव, कारवारसह अन्यठिकाणची मराठी भाषिक गावे महाराष्ट्रात घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही. - प्रा. शरद पाटील, माजी आमदार व सीमा लढ्यातील कार्यकर्तेजत तालुक्यातील कोणतीही गावे कर्नाटकमध्ये जाणार नाही. जर गावे जाणार नसतील, तर काय उचलून नेणार आहात का? जो पाण्याचा प्रश्न आहे तो बऱ्यापैकी मिटलेला आहे. साठ टक्के भागात पाणी पोहोचलेले आहे. उर्वरित ४० टक्के भागात लवकरच पाणी पोहोचेल. आपण दहा वर्ष जत तालुक्याचे आमदार म्हणून काम केले आहे. आजही या गावातले कोणीही कर्नाटकमध्ये जाण्यास तयार नाही. - सुरेश खाडे, पालकमंत्री, सांगली.

यांनी केला विरोधजत तालुक्यातील पाणी संघर्ष समिती कार्यकर्ते सुभाष कोकळे, जिल्हा परिषद सदस्य तम्मनगौडा रवी यांनीही कर्नाटकच्या दाव्यास विरोध दर्शविला असून, आता तालुक्यातील कोणीही कर्नाटकात जाण्यास इच्छुक नसल्याचे स्पष्ट केले आहे

टॅग्स :SangliसांगलीKarnatakकर्नाटकMaharashtraमहाराष्ट्र