शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद: कर्नाटकातील ८८५ मराठी गावे अगोदर द्या, मग जतचे बोला; सांगलीतून तीव्र संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2022 12:59 IST

बोम्मई यांच्या दाव्यास जत तालुक्यात तीव्र विरोध

सांगली : कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगली जिल्ह्यातील जत तालुका कर्नाटकचा असल्याचा दावा केल्यानंतर जिल्ह्यातून संताप व्यक्त होत आहे. कर्नाटकातील ८८५ मराठी बहुभाषिक गावे अगोदर महाराष्ट्राला द्या, मग कन्नड गावांचे बोला, असा इशारा सीमा लढ्यातील कार्यकर्त्यांनी दिला असून जत तालुक्यातील राजकीय नेते व कार्यकर्त्यांनी बोम्मई यांच्या दाव्यास तीव्र विरोध दर्शविला.जत तालुक्यातील ६५ गावांनी २०१२ मध्ये पाणीप्रश्नावर महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांवर संताप व्यक्त करीत कर्नाटकात जाण्याचा इशारा दिला होता. तोच दाखला देत बोम्मई यांनी ही गावे कर्नाटकात घेण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे वक्तव्य मंगळवारी केले. त्यावरून महाराष्ट्रात व विशेषत: सांगली जिल्ह्यात वाद पेटला आहे. बोम्मई यांच्या दाव्यास जत तालुक्यात तीव्र विरोध केला गेला. सीमा लढ्यातील ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी कर्नाटकातील बेळगाव, कारवार, बिदर, भालकी येथील ८८५ मराठी भाषिक गावांचा जुना दावा नव्याने मांडला.

बोम्मई यांनी जत तालुक्यावरून राजकीय भांडवल करू नये. लोकांनी काही वर्षांपूर्वी पाणीप्रश्नावरून कर्नाटकात जाण्याचा इशारा दिला होता. त्याचा संदर्भ देऊन दावा करणे अयोग्य आहे. तालुक्यातील पाणीप्रश्न बऱ्यापैकी मार्गी लागले आहेत. उर्वरित कामेही येत्या काही वर्षांत होतील. त्यामुळे कर्नाटकात कोणीही जाण्यास आता इच्छुक नाही.- विक्रम सावंत, आमदार, जत

जत तालुक्यावर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी दावा करणे अयोग्य आहे. आमचा त्यास विरोध राहील. - विलासराव जगताप, माजी आमदार

भूप्रदेश सलगता व बहुभाषिक या मुद्यावर आमच्यातील काही गावे कर्नाटकला व कर्नाटकातील ८८५ मराठी गावे महाराष्ट्राला मिळावी, अशी यापूर्वीच मागणी केली होती. १९५० मधील परिस्थितीनुसार निर्णय घ्यावेत. अगोदर आमची गावे आम्हाला द्या. - ॲड. अजित सूर्यवंशी, सीमा लढ्यातील कार्यकर्ते

जे सरकार भाकरीचा प्रश्न सोडवू शकत नाही, ते असे मुद्दे उकरून काढते. कर्नाटक, महाराष्ट्र व केंद्रातही भाजपचे सरकार असल्याने ते असे प्रश्न पेटविण्याचा प्रयत्न करतात. आम्ही त्याला भीक घालणार नाही. - ॲड. के. डी. शिंदे, सीमा लढ्यातील कार्यकर्ते

आम्ही जत तालुका तर देणार नाहीच, ऊलट बेळगाव, कारवारसह अन्यठिकाणची मराठी भाषिक गावे महाराष्ट्रात घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही. - प्रा. शरद पाटील, माजी आमदार व सीमा लढ्यातील कार्यकर्तेजत तालुक्यातील कोणतीही गावे कर्नाटकमध्ये जाणार नाही. जर गावे जाणार नसतील, तर काय उचलून नेणार आहात का? जो पाण्याचा प्रश्न आहे तो बऱ्यापैकी मिटलेला आहे. साठ टक्के भागात पाणी पोहोचलेले आहे. उर्वरित ४० टक्के भागात लवकरच पाणी पोहोचेल. आपण दहा वर्ष जत तालुक्याचे आमदार म्हणून काम केले आहे. आजही या गावातले कोणीही कर्नाटकमध्ये जाण्यास तयार नाही. - सुरेश खाडे, पालकमंत्री, सांगली.

यांनी केला विरोधजत तालुक्यातील पाणी संघर्ष समिती कार्यकर्ते सुभाष कोकळे, जिल्हा परिषद सदस्य तम्मनगौडा रवी यांनीही कर्नाटकच्या दाव्यास विरोध दर्शविला असून, आता तालुक्यातील कोणीही कर्नाटकात जाण्यास इच्छुक नसल्याचे स्पष्ट केले आहे

टॅग्स :SangliसांगलीKarnatakकर्नाटकMaharashtraमहाराष्ट्र