शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
6
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
7
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
8
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
9
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
10
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
11
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
12
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
13
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
14
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
15
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
16
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
17
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
18
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
19
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
20
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

गेल्या 5 वर्षात किती लष्कर आणि पोलीस भरती झाली?; डॉ. अमोल कोल्हेंचा सरकारला सवाल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2019 09:20 IST

भयानक बेरोजगारीचं प्रमाण वाढलं, रोजगाराची संधी कुठे नाही

सांगली -  देशप्रेम आमच्या काळजात आहे, नसानसात आहे, रिकाम्या पोटी सैन्य कधी लढत नाही ही गोष्ट लक्षात ठेवली. आमची पोरं सकाळी सकाळी धावत असताना, लष्करात, पोलिसांत भरती होण्यासाठी जीव तोडून मेहनत करत असतात तरीही पोलीस भरती झाली नाही. आबांच्या काळात 65 हजार पोलीस भरती झाली होती. पण या काळात किती झाली? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सरकारला विचारला आहे. 

तासगाव कवठेमहांकाळ येथे राष्ट्रवादी उमेदवार सुमन पाटील यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते. यावेळी बोलताना अमोल कोल्हे म्हणाले की, महाराष्ट्रात असा एकही मतदारसंघ नाही ज्यात आर.आर आबांची आठवण आली नाही. रोहित पाटलांच्या रुपाने तासगाव-कवठेमहांकाळ पुन्हा धडाडीचं नेतृत्व मिळालं आहे. ही विधानसभेची निवडणूक ही दोन पक्षातील निवडणूक नाही, उमेदवारांची निवडणूक नाही, ही दोन विचारांची निवडणूक आहे. ज्यांनी 5 वर्ष ज्यांनी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा, बेरोजगारांच्या प्रश्नांचा खेळखंडोबा केला आहे. गेल्या 5 वर्षात महाराष्ट्रात 16 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली असा आरोप त्यांनी केला. 

तसेच मुख्यमंत्र्यांच्या सभेत कर्जमाफीवर प्रश्न केला त्यावर मुख्यमंत्री म्हणतात प्रत्येक सभेत असे 2-4 नमुने येतात. मुख्यमंत्रीसाहेब, ते नमुने नव्हते तर तो हाडामासाचा माणूस होता, ज्याच्या डोळ्यासमोर त्यांचं भवितव्य होतं, पोराबाळांची काळजी होती म्हणून तो तुम्हाला प्रश्न विचारला त्यावर तुमचं उत्तर भारत माता की जय असं सांगत अमोल कोल्हे यांनी सरकारवर प्रहार केला. 

दरम्यान, भयानक बेरोजगारीचं प्रमाण वाढलं, रोजगाराची संधी कुठे नाही, अनेक कंपन्यातील लोकांना काढलं जातं आहे. ही हसण्याची परिस्थिती नाही तर चिंतेची परिस्थिती नाही. ज्या माणसाने उभं आयुष्य मेहनत केली, त्यांची बायका-पोरं घरात असतात त्याची नोकरी जाते ही परिस्थिती त्याच्यासमोर उभी राहते ती आपल्याबाबतीत होईल. 72 हजार मेगा भरती होणार होती काय झालं या मेगा भरतीचं? असा सवालही डॉ. अमोल कोल्हे यांनी सरकारला विचारला आहे.   

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसtasgaon-kavathe-mahankal-acतासगाव-कवठेमहांकाळDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019