शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया-युक्रेन युद्धबंदीवर ट्रम्प यांचा मोठा यू-टर्न...! म्हणाले, पुतिन-झेलेन्स्की आधी समोरा-समोर बोलतील
2
मनोज जरांगे पाटील आता तरी मुंबई गाठणार की वेशीवरुनच ऐनवेळी माघारी फिरणार?; चर्चांना उधाण
3
Stock Markets Today: आठवड्याच्या अखेरच्या दिवशी शेअर बाजारात घसरण; निफ्टी २५,००० च्या खाली, Wipro, Tata Motors, BEL मध्ये तेजी
4
दक्षिण अमेरिकेत मोठा भूकंप; हादऱ्यांमुळे लोक घाबरले, ७.५ तीव्रता, त्सुनामीचा इशारा
5
लखपती बनण्याची मशीन आहे पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ २२२ रुपयांत सुरू करा गुंतवणूक, पाहा कॅलक्युलेशन
6
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
7
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
8
"रशियासाठी भारत लॉन्ड्री सर्व्हिस, पुढच्या आठवड्यात दुप्पट..."; ट्रम्प यांच्या सल्लागाराची पुन्हा धमकी
9
लक्ष्याच्या लेकीचं व्यवसायात पाऊल! स्वानंदी बेर्डेने सुरू केलं 'कांतप्रिया', आई-वडिलांच्या नावावरुन ठेवलं ब्रँडचं नाव
10
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
11
४ ग्रहांचे सप्टेंबरमध्ये गोचर: ८ राशींना श्रीमंती योग, सुख-सुबत्ता-समृद्धी; पद-पैसा वृद्धी!
12
पावसाळी परिस्थितीचा गैरफायदा, प्रवाशांची लूट, ॲप आधारित टॅक्सींवर कडक कारवाई करा: सरदेसाई
13
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
14
'दूरस्थ'चे दोन महिन्यांत केवळ १०,१६९ प्रवेश; कोणत्या अभ्यासक्रमांना किती प्रवेश? जाणून घ्या
15
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
16
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
17
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
18
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
19
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
20
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे

गेल्या 5 वर्षात किती लष्कर आणि पोलीस भरती झाली?; डॉ. अमोल कोल्हेंचा सरकारला सवाल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2019 09:20 IST

भयानक बेरोजगारीचं प्रमाण वाढलं, रोजगाराची संधी कुठे नाही

सांगली -  देशप्रेम आमच्या काळजात आहे, नसानसात आहे, रिकाम्या पोटी सैन्य कधी लढत नाही ही गोष्ट लक्षात ठेवली. आमची पोरं सकाळी सकाळी धावत असताना, लष्करात, पोलिसांत भरती होण्यासाठी जीव तोडून मेहनत करत असतात तरीही पोलीस भरती झाली नाही. आबांच्या काळात 65 हजार पोलीस भरती झाली होती. पण या काळात किती झाली? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सरकारला विचारला आहे. 

तासगाव कवठेमहांकाळ येथे राष्ट्रवादी उमेदवार सुमन पाटील यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते. यावेळी बोलताना अमोल कोल्हे म्हणाले की, महाराष्ट्रात असा एकही मतदारसंघ नाही ज्यात आर.आर आबांची आठवण आली नाही. रोहित पाटलांच्या रुपाने तासगाव-कवठेमहांकाळ पुन्हा धडाडीचं नेतृत्व मिळालं आहे. ही विधानसभेची निवडणूक ही दोन पक्षातील निवडणूक नाही, उमेदवारांची निवडणूक नाही, ही दोन विचारांची निवडणूक आहे. ज्यांनी 5 वर्ष ज्यांनी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा, बेरोजगारांच्या प्रश्नांचा खेळखंडोबा केला आहे. गेल्या 5 वर्षात महाराष्ट्रात 16 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली असा आरोप त्यांनी केला. 

तसेच मुख्यमंत्र्यांच्या सभेत कर्जमाफीवर प्रश्न केला त्यावर मुख्यमंत्री म्हणतात प्रत्येक सभेत असे 2-4 नमुने येतात. मुख्यमंत्रीसाहेब, ते नमुने नव्हते तर तो हाडामासाचा माणूस होता, ज्याच्या डोळ्यासमोर त्यांचं भवितव्य होतं, पोराबाळांची काळजी होती म्हणून तो तुम्हाला प्रश्न विचारला त्यावर तुमचं उत्तर भारत माता की जय असं सांगत अमोल कोल्हे यांनी सरकारवर प्रहार केला. 

दरम्यान, भयानक बेरोजगारीचं प्रमाण वाढलं, रोजगाराची संधी कुठे नाही, अनेक कंपन्यातील लोकांना काढलं जातं आहे. ही हसण्याची परिस्थिती नाही तर चिंतेची परिस्थिती नाही. ज्या माणसाने उभं आयुष्य मेहनत केली, त्यांची बायका-पोरं घरात असतात त्याची नोकरी जाते ही परिस्थिती त्याच्यासमोर उभी राहते ती आपल्याबाबतीत होईल. 72 हजार मेगा भरती होणार होती काय झालं या मेगा भरतीचं? असा सवालही डॉ. अमोल कोल्हे यांनी सरकारला विचारला आहे.   

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसtasgaon-kavathe-mahankal-acतासगाव-कवठेमहांकाळDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019