शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
4
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
5
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
6
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
7
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
8
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
9
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
10
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
11
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
12
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
13
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
14
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
15
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
16
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
17
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
18
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
19
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले
20
आंध्र प्रदेशातील बस अपघातातील चालकाला अटक, आग लागल्यानंतर प्रवाशांना सोडून पळून गेला होता

Vidhan Sabha Election 2024: जनतेचा नव्हे, तर..; खानापूर विधानसभेच्या निवडणुकीत मोठे षडयंत्र, वैभव पाटील यांचा आरोप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2024 17:55 IST

'मीच मला मतदान केले आहे की नाही, असा प्रश्न'

दिलीप मोहिते विटा : लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली जनतेची मने विचलित करून महायुतीने ईव्हीएमला हाताशी धरून महाविकास आघाडीला सत्तेपासून दूर ठेवण्याचे मोठे षडयंत्र रचले. तोच प्रयोग खानापूर मतदारसंघातही झाला असून या मतदारसंघातही तशाच प्रकारे मोठे षडयंत्र रचले. त्यामुळे ईव्हीएम हे यंत्र आहे की षडयंत्र? असा संतप्त सवाल उपस्थित करीत खानापूर मतदारसंघात झालेला विरोधी उमेदवाराचा विजय हा जनमताचा कौल नसून तो ईव्हीएम यंत्राचा कौल आहे, असे महाविकास आघाडीचे पराभूत उमेदवार अ‍ॅड. वैभव पाटील यांनी विटा येथील पत्रकार परिषदेत सांगत निवडणूक प्रक्रियेबाबतच शंका उपस्थित केली.वैभव पाटील म्हणाले, खानापूर मतदारसंघाचा निकाल पहाता यात मोठे षडयंत्र रचले गेले आहे. माझ्या विरोधातील निवडून आलेले उमेदवारच मी दोन ते पाच हजाराने निवडून येणार असे सांगत होते. तेच ७८ हजाराने निवडून येत आहेत. हे आश्चर्यकारक आहे. निवडणूकीच्या काळातील एकूण वातावरण, मला मिळत असलेला प्रतिसाद, सर्व प्रकारे लोकांतून होत असलेला उठाव याचा विचार केला तर या मताधिक्यामुळे मीच मला मतदान केले आहे की नाही, असा प्रश्न निर्माण होत आहे.भविष्यात या देशात लोकशाही जीवंत ठेवायची असेल तर मतदान बॅलेट पेपरवर घ्यायला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त करून खानापूरच्या निवडणूकीत अनेक जणांनी मला साथ दिली. मदत केली, पक्षानेही भरपूर सहकार्य केले. सर्व माझ्याबरोबरच असताना झालेला माझा पराभव हा ईव्हीएम यंत्राचा विजय म्हणावा लागेल. हा जनमताचा कौल नाही. तो ईव्हीएमचा कौल आहे. तो त्यांना मिळाला आहे. मात्र, या निकालाने जनतेचे प्रश्न सुटले की जनतेला प्रश्न पडले, असे मी या निकालाबाबत बोलताना म्हणत आहे.खानापूर मतदारसंघात निवडणूकीच्या सुरूवातीच्या काळात आमच्या जनशक्तीबरोबर धनशक्ती आहे, असे मला वाटत होते. परंतु, विरोधी उमेदवाराच्या धनशक्तीसोबत ईव्हीएम यंत्रही आहे. हे जनतेने पाहिले. परंतु, मी हरणारा वैभव पाटील नाही. पराभव झाला असला तरी कार्यकर्त्यांनी व जनतेनेही खचून जाऊ नये. हा विजय ईव्हीएम यंत्राचा झाला आहे. मी नव्या जोमाने पुन्हा उभा राहत आहे, असेही वैभव पाटील यावेळी म्हणाले.यंत्र म्हणून बघायचे की षडयंत्र राज्यात महाविकास आघाडीचे जे उमेदवार निवडून आले ते हजारपासून पंचवीस हजारापर्यंतच्या मतांनी आले. परंतु, महायुतीचे विजयी झालेले उमेदवार हे ४० हजारापासून लाखापर्यंतच्या मताधिक्यांनी आले. त्यामुळे निवडणूकीचा निकाल पहाता ईव्हीएमकडे यंत्र म्हणून बघायचे की षडयंत्र म्हणून बघायचे, असा प्रश्न सर्वसामान्य लोकांना पडला आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024khanapur-acखानापूरNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवारMahavikas Aghadiमहाविकास आघाडीEVM Machineईव्हीएम मशीन