शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
2
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
3
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
4
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
5
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
6
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
7
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
8
“महाराष्ट्र विधानपरिषद देशासाठी आदर्श”; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे कौतुकोद्गार
9
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
10
Mamata Banerjee : "मी माफी मागते"; मेस्सीच्या कार्यक्रमातील गोंधळ पाहून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी नाराज
11
H-1B व्हिसाच्या नव्या नियमांवरुन ट्रम्पच गोत्यात, वॉशिंग्टन ते कॅलिफोर्नियापर्यंत १९ राज्यांनी कोर्टाचा दरवाजा ठोठावला
12
इंडिगोला आणखी एक धक्का; रांचीत लँडिंग दरम्यान 'टेल स्ट्राइक'; थोडक्यात वाचले ७० प्रवासी
13
Lionel Messi: सॉल्ट लेक स्टेडियम तोडफोडप्रकरणी आयोजकाला अटक, प्रेक्षकांनाही तिकिटाचे पैसे परत मिळणार!
14
WhatsApp कॉलवर बोलताय? तुमचं लोकेशन होऊ शकतं ट्रॅक; सुरक्षिततेसाठी ऑन करा 'ही' सेटिंग
15
"आम्ही थांबणार नाही..", दुसऱ्या बाळाच्या जन्माआधीच भारती सिंग करतेय तिसऱ्या बाळाचं प्लानिंग? पती हर्ष म्हणाला...
16
Stock Market Holidays: पुढच्या वर्षी १५ दिवस बंद राहणार शेअर बाजार, पाहा NSE मध्ये सुट्ट्या कधी, पाहा लिस्ट
17
कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी उपस्थित केलं भाजपाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह, म्हणाले, येथे सर्व निर्णय... 
18
जिथं वक्फचा वाद उफाळला, तिथे भाजपाला मिळाला 'ऐतिहासिक' विजय; केरळमध्ये हैराण करणारा निकाल
19
Gold-Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; १८ कॅरेट सोनंही १ लाखांच्या पार, मुंबई ते दिल्ली नवे दर काय?
20
“विधान परिषदेतील नियम, परंपरा आणि चर्चांमुळे लोकशाही बळकट”: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
Daily Top 2Weekly Top 5

Vidhan Sabha Election 2024: जनतेचा नव्हे, तर..; खानापूर विधानसभेच्या निवडणुकीत मोठे षडयंत्र, वैभव पाटील यांचा आरोप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2024 17:55 IST

'मीच मला मतदान केले आहे की नाही, असा प्रश्न'

दिलीप मोहिते विटा : लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली जनतेची मने विचलित करून महायुतीने ईव्हीएमला हाताशी धरून महाविकास आघाडीला सत्तेपासून दूर ठेवण्याचे मोठे षडयंत्र रचले. तोच प्रयोग खानापूर मतदारसंघातही झाला असून या मतदारसंघातही तशाच प्रकारे मोठे षडयंत्र रचले. त्यामुळे ईव्हीएम हे यंत्र आहे की षडयंत्र? असा संतप्त सवाल उपस्थित करीत खानापूर मतदारसंघात झालेला विरोधी उमेदवाराचा विजय हा जनमताचा कौल नसून तो ईव्हीएम यंत्राचा कौल आहे, असे महाविकास आघाडीचे पराभूत उमेदवार अ‍ॅड. वैभव पाटील यांनी विटा येथील पत्रकार परिषदेत सांगत निवडणूक प्रक्रियेबाबतच शंका उपस्थित केली.वैभव पाटील म्हणाले, खानापूर मतदारसंघाचा निकाल पहाता यात मोठे षडयंत्र रचले गेले आहे. माझ्या विरोधातील निवडून आलेले उमेदवारच मी दोन ते पाच हजाराने निवडून येणार असे सांगत होते. तेच ७८ हजाराने निवडून येत आहेत. हे आश्चर्यकारक आहे. निवडणूकीच्या काळातील एकूण वातावरण, मला मिळत असलेला प्रतिसाद, सर्व प्रकारे लोकांतून होत असलेला उठाव याचा विचार केला तर या मताधिक्यामुळे मीच मला मतदान केले आहे की नाही, असा प्रश्न निर्माण होत आहे.भविष्यात या देशात लोकशाही जीवंत ठेवायची असेल तर मतदान बॅलेट पेपरवर घ्यायला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त करून खानापूरच्या निवडणूकीत अनेक जणांनी मला साथ दिली. मदत केली, पक्षानेही भरपूर सहकार्य केले. सर्व माझ्याबरोबरच असताना झालेला माझा पराभव हा ईव्हीएम यंत्राचा विजय म्हणावा लागेल. हा जनमताचा कौल नाही. तो ईव्हीएमचा कौल आहे. तो त्यांना मिळाला आहे. मात्र, या निकालाने जनतेचे प्रश्न सुटले की जनतेला प्रश्न पडले, असे मी या निकालाबाबत बोलताना म्हणत आहे.खानापूर मतदारसंघात निवडणूकीच्या सुरूवातीच्या काळात आमच्या जनशक्तीबरोबर धनशक्ती आहे, असे मला वाटत होते. परंतु, विरोधी उमेदवाराच्या धनशक्तीसोबत ईव्हीएम यंत्रही आहे. हे जनतेने पाहिले. परंतु, मी हरणारा वैभव पाटील नाही. पराभव झाला असला तरी कार्यकर्त्यांनी व जनतेनेही खचून जाऊ नये. हा विजय ईव्हीएम यंत्राचा झाला आहे. मी नव्या जोमाने पुन्हा उभा राहत आहे, असेही वैभव पाटील यावेळी म्हणाले.यंत्र म्हणून बघायचे की षडयंत्र राज्यात महाविकास आघाडीचे जे उमेदवार निवडून आले ते हजारपासून पंचवीस हजारापर्यंतच्या मतांनी आले. परंतु, महायुतीचे विजयी झालेले उमेदवार हे ४० हजारापासून लाखापर्यंतच्या मताधिक्यांनी आले. त्यामुळे निवडणूकीचा निकाल पहाता ईव्हीएमकडे यंत्र म्हणून बघायचे की षडयंत्र म्हणून बघायचे, असा प्रश्न सर्वसामान्य लोकांना पडला आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024khanapur-acखानापूरNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवारMahavikas Aghadiमहाविकास आघाडीEVM Machineईव्हीएम मशीन