शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
2
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
3
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
4
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
5
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
6
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
7
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
8
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
9
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
10
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
11
“महाराष्ट्र विधानपरिषद देशासाठी आदर्श”; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे कौतुकोद्गार
12
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
13
Mamata Banerjee : "मी माफी मागते"; मेस्सीच्या कार्यक्रमातील गोंधळ पाहून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी नाराज
14
H-1B व्हिसाच्या नव्या नियमांवरुन ट्रम्पच गोत्यात, वॉशिंग्टन ते कॅलिफोर्नियापर्यंत १९ राज्यांनी कोर्टाचा दरवाजा ठोठावला
15
इंडिगोला आणखी एक धक्का; रांचीत लँडिंग दरम्यान 'टेल स्ट्राइक'; थोडक्यात वाचले ७० प्रवासी
16
Lionel Messi: सॉल्ट लेक स्टेडियम तोडफोडप्रकरणी आयोजकाला अटक, प्रेक्षकांनाही तिकिटाचे पैसे परत मिळणार!
17
WhatsApp कॉलवर बोलताय? तुमचं लोकेशन होऊ शकतं ट्रॅक; सुरक्षिततेसाठी ऑन करा 'ही' सेटिंग
18
शोएब मलिकचं तिसरं लग्नही मोडण्याच्या मार्गावर? सना जावेदसोबतच्या नात्यात दुरावा 
19
"आम्ही थांबणार नाही..", दुसऱ्या बाळाच्या जन्माआधीच भारती सिंग करतेय तिसऱ्या बाळाचं प्लानिंग? पती हर्ष म्हणाला...
20
Stock Market Holidays: पुढच्या वर्षी १५ दिवस बंद राहणार शेअर बाजार, पाहा NSE मध्ये सुट्ट्या कधी, पाहा लिस्ट
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसच्या बंडखोर उमेदवार जयश्रीताई पाटील यांची अनामत रक्कम जप्त, सांगली जिल्ह्यात डिपॉजिट जप्त झालेले उमेदवार किती..वाचा

By अशोक डोंबाळे | Updated: November 25, 2024 18:24 IST

अनामत रक्कम कधी जप्त होते ?

सांगली : जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांतील ९९ उमेदवारांपैकी केवळ सहा पराभूत उमेदवारांची अनामत वाचली आहे. उर्वरित काँग्रेसच्या जयश्री पाटील, भाजपचे तम्मनगौडा रवी पाटील व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राजेंद्र देशमुख या बंडखोर उमेदवारांची अनामत जप्त (डिपॉझिट) झाली. शासनाच्या खात्यामध्ये २० लाख ७५ हजार रुपयांची अनामत जमा होणार आहे.लोकप्रतिनिधी कायदा, १९५१ नुसार, संसदीय किंवा विधानसभा निवडणूक लढविणाऱ्या प्रत्येक उमेदवाराला निवडणूक आयोगाकडे ठरावीक रक्कम जमा करणे बंधनकारक आहे. सर्वसाधारण मतदारसंघातून निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारास विधानसभेला २५ हजार आणि आरक्षित मतदारसंघातून अर्ज दाखल करण्यासाठी १० हजार रुपयांची अनामत रक्कम निवडणूक आयोगाने ठरविली आहे.

उमेदवारांनी अर्ज दाखल केल्यानंतर मतदारसंघात एकूण झालेल्या मताच्या एकषष्ठांश मते मिळणे गरजेचे आहे. उमेदवाराला तेवढी मते मिळाली नाही, तर त्याची अर्ज भरताना जमा केलेली अनामत रक्कम शासनाकडे जमा होते. या सूत्रानुसार जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांतील ८३ पराभूत उमेदवारांना साधारण ३४ ते ३५ हजार मते मिळणे गरजेचे आहे.

या उमेदवारांचे डिपॉझिट वाचले..सांगली विधानसभा मतदारसंघातील एकूण १४ उमेदवार रिंगणात उतरले होते. यापैकी काँग्रेसचे पराभूत उमेदवार पृथ्वीराज पाटील यांना ७६ हजार ३६३ मते मिळाल्यामुळे ते अनामत रक्कम वाचविण्यात यशस्वी झाले. पण, काँग्रेस बंडखोर जयश्रीताई मदन पाटील यांना ३२ हजार ६३६ मते मिळाल्यामुळे त्यांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. या मतदारसंघातील उर्वरित ११ उमेदवारांचीही अनामत रक्कम जप्त झाली. खानापूर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे वैभव पाटील यांची अनामत रक्कम वाचली असून, बंडखोर माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांच्यासह १२ उमेदवारांची अनामत जप्त झाली. जत विधानसभा मतदारसंघातही लक्षवेधी लढत झाली असून, तेथेही भाजप बंडखोर तमन्नगोडा रवी पाटील यांना १९ हजार १२० मते मिळाल्यामुळे त्यांची अनामत जप्त झाली. अन्य आठ उमेदवारांचीही अनामत जप्त झाली आहे. आठ विधानसभा मतदारसंघांतील ८३ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाल्यामुळे २० लाख ७५ हजार रुपयांची रक्कम शासनाच्या तिजोरीत जमा होणार आहे.

अनामत रक्कम कधी जप्त होते ?उमेदवाराला मतदारसंघातील एकूण वैध मतांच्या एकषष्ठांश म्हणजेच १६.३३ टक्के मते किंवा त्यापेक्षा कमी मते मिळाल्यास, त्यांची अनामत रक्कम जप्त केली जाते. याचा अर्थ असा की, ज्या उमेदवाराने २५,००० रुपये किंवा १०,००० रुपये रक्कम जमा केली असल्यास, त्यांना निवडणूक आयोगाकडून कोणताही परतावा दिला जाणार नाही. उदाहरणार्थ- जर विधानसभेच्या जागेवर एकूण २,००,००० मते पडली, तर सुरक्षा ठेव वाचविण्यासाठी प्रत्येक उमेदवाराला एकूण वैध मतांपैकी एक-षष्ठांश मते मिळवावी लागतील. याचा अर्थ प्रत्येक उमेदवाराला ३३,३३२ पेक्षा जास्त मते मिळणे आवश्यक आहे. २०२४ विधानसभा निवडणुकीत एकूण उमेदवारांपैकी जवळपास ८३.८३ टक्के उमेदवारांनी त्यांची अनामत रक्कम गमावली आहे.

विधानसभा मतदारसंघनिहाय उमेदवारमतदारसंघ - एकूण उमेदवार - अनामत जप्तची संख्या

  • मिरज १४ - १२
  • सांगली १४ - १२
  • इस्लामपूर १२ -   १०
  • शिराळा ०६ - ०४
  • पलूस-कडेगाव ११ - ०९
  • खानापूर  १४ - १२
  • तासगाव-क.महांकाळ १७ - १५
  • जत   ११ - ०९
  • एकूण  ९९ - ८३
टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४sangli-acसांगलीcongressकाँग्रेसwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024