शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
2
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
3
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
4
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
5
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
6
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
7
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
8
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
9
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
10
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
11
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
12
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
13
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
14
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
15
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
16
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
17
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
18
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
19
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
20
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा

गीतकार चिंतामणी पोतदार काळाच्या पडद्याआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:30 IST

लोकमत न्यूज नेटवर्क फोटो : २१०९२०२१ चिंतामणी पोतदार सांगली : कर्णमधुर गीतांनी रसिकांना भुरळ घालणारे शब्दप्रभू गीतकार चिंतामणी बाबूराव ...

लोकमत न्यूज नेटवर्क

फोटो : २१०९२०२१ चिंतामणी पोतदार

सांगली : कर्णमधुर गीतांनी रसिकांना भुरळ घालणारे शब्दप्रभू गीतकार चिंतामणी बाबूराव पोतदार (वय ८१) यांचे वृद्धापकाळाने मंगळवारी सायंकाळी येथील राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

पोतदार यांच्या निधनाचे वृत्त समजताच सांगलीतील रसिक स्नेह्यांनी शोक व्यक्त केला. हरहुन्नरी चित्रकार आणि कलंदर गीतकार अशी चिंतामणी पोतदार यांची ओळख होती. रुढार्थाने कोणतेही शास्त्रशुद्ध शिक्षण न घेताही कला क्षेत्रात स्वत:चे अस्तित्व निर्माण केले होते. फटाकडी, सासूरवाशीण, सासर-माहेर, कळतंय पण वळत नाही, महादेवाचा नंदी, पटलं तर व्हय म्हणा, जोरदार, धमाकेदार, रिक्षावाली, अन्याय या मराठी चित्रपटांसाठी त्यांनी गीतलेखन केले.

चिंतामणी पोतदार यांचा उमेदीचा काळ सांगलीच्या भावे नाट्यगृहात गेला. अनेक मराठी नाटकांचे बॅनर्स, नेपथ्य त्यांच्या कुंचल्यातून साकारले. रंगकर्मी दिलीप परदेशी यांच्यासोबत त्यांची विशेष भट्टी जमली होती. त्यांच्या अनेक नाटकांना नेपथ्यासाठीचे पुरस्कारही मिळाले होते. भावे नाट्यगृहातील विष्णुदास भावे यांचे रंगचित्र पोतदार यांच्याच कुंचल्यातून साकारले आहे. आनंद चित्रपटगृहातही अनेक मराठी चित्रपटांचे बॅनर त्यांनी रंगविले.

पोतदार यांनी शेकडो गाणी लिहिली, त्यातील अनेक चित्रपटांतून रसिकांपर्यंत पोहोचली. त्यांनी शेकडो मंगलाष्टकाही लिहिल्या. अनेक दिग्गजांच्या विवाहात त्या गायिल्या गेल्या. निर्माते अण्णासाहेब घाटगे, संगीतकार बाळ पळसुले यांच्याशी त्यांचा विशेष स्नेह होता. राज्य नाट्य स्पर्धेतील नाटकांसाठी साकारलेले अनेक बॅनर्स विशेष गाजले. त्यांनी चितारलेल्या स्वागत कमानी सांगलीतील गणेशोत्सवाचे वैशिष्ट्य ठरल्या होत्या. उतारवयात काही काळ सांगलीवाडीत आणि सध्या घनश्यामनगरमध्ये त्यांचा मुक्काम होता. रात्री उशिरा त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाले.

चौकट

गाजलेली गाणी

कुठं कुठं जायाचं हनीमूनला, थाप मारून थापाड्या गेला, रंगू बाजारला जाते, बुच काढून बाटली फोडा यासह अनेक गाजलेली गीते पोतदार यांच्या लेखणीतून उतरली होती. सुषमा शिरोमणी आणि दादा कोंडके यांच्या चित्रपटांसाठी लिहिलेली गाणी सुपरहिट ठरली. मुंबईच्या मराठी चंदेरी दुनियेत न रमलेले चिंतामणी अखेरपर्यंत सांगलीतच राहिले. दादा कोंडके मुंबईतूनच आपण लिहिलेली गाणी त्यांना दूरध्वनीवरून ऐकवून दाखवायचे. लावणीसम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांच्या हस्ते त्यांचा सत्कारही झाला होता.