शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
5
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
6
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
7
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
8
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
9
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
10
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
11
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
12
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
13
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
14
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
15
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
16
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
17
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
18
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
19
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
20
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..

सांगली बाजार समितीचा ३० कोटींचा चुराडा; उत्पनात दोन कोटींचा तोटा 

By अशोक डोंबाळे | Updated: September 11, 2024 17:21 IST

चार वर्षांमध्ये उत्पन्नात नाही वाढ

अशोक डोंबाळेसांगली : सांगली बाजार समितीच्या तत्कालीन पदाधिकारी आणि प्रशासनाने उत्पन्न वाढीसाठी सुविधा निर्माण केल्या. त्यासाठी ३६ कोटी रुपयांच्या ठेवीमधील ३० कोटींचा चुराडा केला. पण चार वर्षांत बाजार समितीच्या उत्पन्नात वाढ होण्याऐवजी वर्षाला दीड ते दोन कोटींचा तोटा होत आहे. प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांनी कारभार सुधारला नाही, तर भविष्यात कर्मचाऱ्यांचे पगारही करणे कठीण होणार असल्याची गंभीर स्थिती निर्माण झाली आहे.तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी १९५० मध्ये सांगली बाजार समितीची स्थापना केली. १९५१ मध्ये प्रत्यक्ष कामकाजाला सुरवात झाली. तेव्हापासून बाजार समिती कधीही तोट्यात गेली नव्हती. वसंतदादांच्या नंतरच्या पदाधिकाऱ्यांनीही बाजार समिती सक्षम करण्यासाठी ३६ कोटींवर ठेवी ठेवल्या होत्या. या ठेवींमुळे बाजार समितीच्या उत्पन्नात भर पडत होती, पण मागील संचालकांनी बाजार समितीचे उत्पन्न वाढविण्याच्या नावाखाली ३६ कोटी रुपयांच्या ठेवींमधील ३० कोटींचा चुराडा केला.उमदी, सावळीत जागा खरेदी करून विकसित करण्यावर १८ कोटी रुपये खर्च केला. गेल्या चार वर्षांत येथून एक रुपयाचेही उत्पन्न नाही. मिरज दुय्यम बाजार आवारात फुलांसाठी शीतगृह बांधले, पण त्याचा वापर होत नाही. मिरजेत वीस दुकान गाळे बांधले, पण ते भाड्याने गेले नाहीत. यावर चार कोटी २५ लाख रुपयांचा खर्च केला. सांगली मार्केट यार्ड आणि विष्णूअण्णा फळ मार्केटमध्ये वजन काट्यावर सुमारे ३० लाख रुपयांचा खर्च झाला. फळ मार्केटचा वजन काटा बंद असून सांगलीतील वजन काटा तोट्यात आहे. उत्पन्न वाढविण्यासाठी ३० कोटी रुपयांचा चुराडा केला, पण यातून बाजार समितीचे उत्पन्न वाढण्याऐवजी काही लोकप्रतिनिधींचेच उत्पन्न वाढल्याचे आरोप होत आहेत.

कर वसुलीत खाबूगिरीसांगली मार्केट यार्ड, विष्णूअण्णा फळ मार्केटमध्ये मालाची आवक वाढली आहे. धान्य, हळद, गुळाचे दर दुप्पट झाले आहेत. या सर्वांचा विचार केल्यास करापासूनचे उत्पन्न वाढणे अपेक्षित आहे, पण कर वसुलीतील खाबूगिरीमुळे काही कर्मचारीच गलेलठ्ठ झाले. बाजार समितीच्या उत्पन्नाला मात्र मोठा फटका बसला आहे.

टॅग्स :SangliसांगलीMarket Yardमार्केट यार्ड