शहरं
Join us  
Trending Stories
1
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
2
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
3
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
4
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
5
Uddhav Thackeray: "नशीब..., नाही तर फडणवीस म्हणून 20वे आले असते...!"; मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत उद्धव ठाकरेंनी भरसभेत नेमकं काय वाचलं?
6
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
7
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
8
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
9
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
10
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
11
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  
12
“लोकशाहीवर चौफेर हल्ले, चीनला शक्य ते भारत करू शकत नाही”; कोलंबियातून राहुल गांधींची टीका
13
याला म्हणतात ढासू परतावा...! ₹1 च्या शेअरमध्ये तुफान तेजी, ₹184 वर पोहोचला भाव; आता कंपनीनं केली मोठी डील
14
...अन्यथा महाराष्ट्रात निवडणुका होऊ देणार नाही; मनोज जरांगेंनी सरकारविरोधात पुन्हा थोपटले दंड, कोणत्या मागण्या केल्या?
15
IAS Srishti Dabas : शाब्बास पोरी! दिवसा काम अन् रात्री अभ्यास; सुंदर IAS चा नेत्रदीपक प्रवास, अडचणींवर केली मात
16
  ब्रिटनमध्ये ज्यूंच्या प्रार्थनास्थळावर भीषण हल्ला, २ जणांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी, संशयित ठार   
17
IND vs WI, 1st Test Day 1 Stumps : KL राहुल लंगडताना दिसला; कुलदीप पॅड बांधून बॅटिंगसाठी नटला,पण...
18
Manoj Jarange Patil : "मी थोड्या दिवसांचा पाहुणा..."; मनोज जरांगे पाटील यांना अश्रू अनावर, मराठ्यांना भावनिक साद
19
उल्हासनगरात गरब्याच्या ठिकाणी शिवसेना शाखाप्रमुखावर पिस्तूल रोखून गोळीबार करणारा गजाआड 
20
दसरा मेळाव्यात मनोज जरांगेंनी दिली पुढील आंदोलनाची हाक; म्हणाले, “सरकारला १ महिन्याची मुदत”

वसंतदादा घराणं काँग्रेस सोडणार नाही - प्रतिक पाटील यांची ग्वाही 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2019 15:09 IST

भारतीय जनता पार्टीत जाण्याची कोणतीही हालचाल सुरु नाही, वसंतदादा घराणे कधी काँग्रेस सोडणार नाही अशी ग्वाही काँग्रेसचे नेते प्रतिक पाटील यांनी दिली आहे

सांगली - विखे-पाटील आणि मोहिते पाटील घराण्यासोबत राज्यातलं आणखी एक महत्त्वाचं घराणं वसंतदादा पाटील यांच्या कुटुंबाच्या भाजपा संपर्कात असल्याची चर्चा आहे. मात्र भारतीय जनता पार्टीत जाण्याची कोणतीही हालचाल सुरु नाही, वसंतदादा घराणे कधी काँग्रेस सोडणार नाही अशी ग्वाही काँग्रेसचे नेते प्रतिक पाटील यांनी दिली आहे. 

वसंतदादा पाटील घराण्यातील प्रतिक पाटील काँग्रेस सोडून भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु होती. मात्र चर्चेला पूर्णविराम देत प्रतिक पाटील यांनी आम्ही काँग्रेसमध्ये राहणार असल्याचं स्पष्ट केलं. यावेळी बोलताना प्रतिक पाटील म्हणाले की, भाजपात जाण्याचं कोणतीही हालचाल नाही, आमचे संबंध सगळ्या पक्षातील नेत्यांची चांगले आहेत. वसंतदादांचा वारसा असल्याने काँग्रेस सोडण्याची शक्यता नाही असं त्यांनी सांगितले.  

दरम्यान सांगलीची जागा काँग्रेस खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडणार आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते, कार्यकर्ते नाराज आहेत. काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यालयाला टाळे ठोकून आंदोलनही केलं होतं.याच पार्श्वभूमीवर सांगलीतील प्रतिष्ठीत घराणे वसंतदादा पाटील यांच्या कुटुंबातील सदस्यांची भाजपाचे नेते आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भेट घेतल्याचं समोर येतंय.  

मात्र सांगलीची जागा काँग्रेसला मिळावी ही मागणी आहे पण काँग्रेसच्या वरिष्ठ जे निर्णय घेतील ते मान्य करणार. राजू शेट्टी हे देखील सांगलीच्या जागेसाठी आग्रही नाहीत. काँग्रेसने स्वाभिमानी शेतकरी संघटनेला एक अथवा दोन जागा सोडाव्यात अशी मागणी राजू शेट्टी यांची आहे. त्यामुळे पक्षातील नेते सांगली लोकसभा मतदारसंघाबाबत निर्णय घेतील. मात्र असं असलं तरी वसंतदादा घराणे कधी काँग्रेस सोडणार नाही. पक्षासाठी आम्ही सगळे वाद बाजूला ठेऊन एकत्र येतो त्यामुळे भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची अफवा आहे असं प्रतिक पाटील यांनी स्पष्ट केले. 

सांगली लोकसभा मतदार संघावर गेल्या ६० वर्षांपासून काँग्रेसची एकहाती सत्ता होती. यात ३५ वर्षं माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या घराण्याचं सांगली लोकसभा मतदार संघावर वर्चस्व राहिलं आहे लोकसभेच्या गेल्या निवडणुकीत माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील यांचा पराभव झाला होता. आणि भाजपनं संजयकाका पाटील यांच्या माध्यमातून हा गड काबिज केला. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकBJPभाजपाcongressकाँग्रेसElectionनिवडणूक