शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
2
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
3
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
4
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
5
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
6
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
7
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
8
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
9
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
10
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
11
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
12
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
13
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
14
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
15
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
16
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
17
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
18
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
19
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
20
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे

काँग्रेसनेच सांगली काँग्रेसमुक्त केली - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2019 17:24 IST

आम्ही नेहमी काँग्रेसी विचारांपासून मुक्त भारताचा निर्धार करीत होतो; मात्र सांगलीतील काँग्रेस नेत्यांनी एकमेकांची जिरवाजिरवी करण्याच्या प्रयत्नात पक्षाची जिरवून हा जिल्हा काँग्रेसमुक्त केला, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभेत केली आहे. 

ठळक मुद्दे'सांगलीतील काँग्रेस नेत्यांनी एकमेकांची जिरवाजिरवी करण्याच्या प्रयत्नात पक्षाची जिरवून हा जिल्हा काँग्रेसमुक्त केला'महायुतीचे उमेदवार संजयकाका पाटील यांच्या प्रचारार्थ येथील स्टेशन चौकात रविवारी सभा पार पडली. फडणवीस म्हणाले की, सांगली ही वसंतदादांची भूमी आहे. याठिकाणी काँग्रेसने स्वत:च्या चिन्हावर लढण्याची आवश्यकता असताना, आता वसंतदादांचे नातू स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या उसन्या तिकिटावर लढत आहेत.

सांगली - आम्ही नेहमी काँग्रेसी विचारांपासून मुक्त भारताचा निर्धार करीत होतो; मात्र सांगलीतील काँग्रेस नेत्यांनी एकमेकांची जिरवाजिरवी करण्याच्या प्रयत्नात पक्षाची जिरवून हा जिल्हा काँग्रेसमुक्त केला, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभेत केली आहे. 

महायुतीचे उमेदवार संजयकाका पाटील यांच्या प्रचारार्थ येथील स्टेशन चौकात रविवारी सभा पार पडली. यावेळी व्यासपीठावर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खासदार संजयकाका पाटील, माजी आमदार संभाजी पवार,  नितीन शिंदे, भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्षा नीता केळकर, पृथ्वीराज देशमुख, शिवसेनेचे नेते गौतम पवार आदी उपस्थित होते. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सांगली ही वसंतदादांची भूमी आहे. याठिकाणी काँग्रेसने स्वत:च्या चिन्हावर लढण्याची आवश्यकता असताना, आता वसंतदादांचे नातू स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या उसन्या तिकिटावर लढत आहेत. उमेदवारी देताना एकमेकांची जिरवाजिरवी करण्याच्या प्रयत्नात काँग्रेस नेत्यांनी पक्षाची जिरविली. स्वाभिमानी म्हणणाऱ्यांचा स्वाभिमान आता शिल्लक तरी आहे का? शरद पवारांच्या विरोधात शेट्टी यांनी माझ्याकडे अनेक तक्रारी केल्या होत्या. अनेक कारखान्यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली होती. आता ते अशाच भ्रष्टाचारी लोकांच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत. त्यांच्याकडे असलेला स्वाभिमान म्हणजे सदाभाऊ खोत आमच्याकडे आहे. त्यामुळे शेट्टी यांच्याकडे स्वाभिमान शिल्लक राहिलेला नाही.

दादांच्या वारसदारांनीच सर्व संस्था बुडविल्या - संजयकाका पाटील

 वसंतदादा पाटील यांच्या नावाने मते मागणाऱ्या त्यांच्या वारसदारांनी त्यांच्या नावाच्या संस्थाच बुडविल्या. त्यामुळे ते कोणत्या अधिकाराने मते मागत आहेत, असा सवाल खासदार संजयकाका पाटील यांनी उपस्थित केला आहे. भाजपाचे खासदार संजयकाका पाटील यांच्या प्रचारार्थ येथील मारुती चौकात सभा पार पडली. यावेळी पाटील बोलत होते. ते म्हणाले की, वसंतदादा कारखाना चालवायला देऊन अभिमान बाळगणाऱ्या विशाल पाटील यांच्या घरात ११ वेळा खासदारकी मिळाली. पण त्यांनी सांगलीसह जिल्ह्यासाठी, सर्वसामान्य जनतेसाठी काय केले? कोणते प्रश्न मार्गी लावले? 

विशाल पाटील हे दादांचा नातू म्हणून मते मागत आहेत. त्यांनी कारखाना चालवायला दिला, पण कामगारांना देशोधडीला लावले. कामगारांचे भविष्य निर्वाह निधीसह अनेक देणी दिलेली नाहीत. कामगारांना टाचा घासून मरण्याची वेळ आली आहे. दुसरीकडील उमेदवार हे  जातीच्या आधारावर निवडणुकीत उतरले आहेत. त्यांचा पूर्वइतिहास वेगळा होता, आता ते एमआयएमचे ओवेसी यांच्या नावे लढत आहेत. ओवेसींचा जातीधर्माचा विखारी चेहरा संसदेत अनुभवला आहे. या लोकांची महत्त्वाकांक्षा ही राक्षसी स्वरुपाची आहे.

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकsangli-pcसांगलीBJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस