शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

लोकसभा, विधानसभेसाठी आघाडीत तडजोडी! नव्या समीकरणांची चर्चा : नेत्यांकडून आतापासूनच दावेदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 21:44 IST

लोकसभा, विधानसभा निवडणुका काँग्रेस-राष्टवादी आघाडीमार्फत लढविण्याची चिन्हे दिसत असतानाच, सांगली व कोल्हापूर जिल्हयातील जागाबदलाच्या चर्चांना आतापासूनच सुरुवात झाली आहे.

सांगली : लोकसभा, विधानसभा निवडणुका काँग्रेस-राष्टवादी आघाडीमार्फत लढविण्याची चिन्हे दिसत असतानाच, सांगली व कोल्हापूर जिल्हया'तील जागाबदलाच्या चर्चांना आतापासूनच सुरुवात झाली आहे. कोल्हापूर आणि सांगली लोकसभा मतदारसंघाबरोबरच जिल्हयातर्गत विधानसभेच्या जागांची अदलाबदल होण्याचे संकेत मिळत आहेत.

काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेवेळी सतेज पाटील यांनी कोल्हापूरच्या लोकसभेच्या जागेची मागणी व्यक्त केली होती. दुसरीकडे जत विधानसभा मतदारसंघाची जागाही काँग्रेस नेत्यांनी आपल्याकडे राहणार असल्याचे स्पष्टपणे सांगितल्यामुळे, दोन्ही निवडणुकांसाठी जागांची अदलाबदल होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. सतेज पाटील यांनी केलेल्या मागणीनुसार राष्टÑवादीकडील कोल्हापूरची जागा काँग्रेसला मिळाली, तर काँग्रेसकडील सांगली लोकसभा मतदारसंघाची जागा राष्टÑवादी मागू शकते. मात्र, काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांकडून अशा प्रकारच्या मागणीला तीव्र विरोध होऊ शकतो. त्याचप्रकारच्या विरोधाचा सामना कोल्हापुरातही करावा लागणार आहे. त्यामुळे मागण्या व चर्चांच्या पार्श्वभूमीवर दोन्ही मतदारसंघातील इच्छुक उमेदवार व पक्षाचे प्रमुख नेते सावध झाले आहेत.

जत विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी थेट काँग्रेस पदाधिकाऱ्यांना तयारीला लागण्याचे आदेश दिले. त्यामुळे या जागेवरील काँग्रेसची दावेदारी आक्रमकपणे होताना दिसत आहे. काँग्रेसमधील काही नेत्यांनी जतच्या जागेच्या बदल्यात मिरज विधानसभेची जागा राष्टवादीला देण्याचा प्रस्ताव मांडल्याचे समजते. त्यामुळे या दोन्ही मतदारसंघातील काँगे्रस व राष्टवादीचे इच्छुक, पदाधिकारी व कार्यकर्ते सतर्क झाले आहेत. पक्षीय नेत्यांचा निर्णय अंतिम राहणार असला तरी, विरोध व संघर्षाची चिन्हे यानिमित्ताने दिसत आहेत. जागांची अदलाबदल केवळ या चार मतदारसंघांपुरतीच राहणार नसून, अन्य मतदारसंघातही अशाचप्रकारच्या चर्चा रंगण्याची चिन्हे आहेत. निवडणुका लांब असल्या तरी, आतापासूनच आघाडीतील नेत्यांनी तयारी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.आघाडी गृहीत धरून सूचना!काँग्रेस व राष्टवादी या दोन्ही प्रमुख पक्षांच्या प्रदेशाध्यक्षांनी लोकसभा, विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांना, निवडणुकीसाठी सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या असल्या तरी, त्यांनी आघाडी होणार असल्याचेही संकेत दिले आहेत. त्यामुळे आघाडीबाबत आग्रही असलेल्या या दोन्ही नेत्यांकडून ऐनवेळी जागांची अदलाबदल करून आघाडीच्या चर्चा यशस्वी केल्या जाऊ शकतात.जयंत पाटील यांचेही संकेत!सोमवारी सांगलीत प्रसारमाध्यमांशी बोलताना जयंत पाटील म्हणाले की, गेल्या पाच वर्षात राजकीय समीकरणे बदलली आहेत. त्यामुळे ज्याठिकाणी ज्या पक्षाचा उमेदवार निवडून येईल, त्याठिकाणची जागा मित्रपक्षाला सोडण्याबाबत विचार होईल. याबाबत अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही. तरीही भविष्यात याबाबत सामंजस्याने, निवडून येण्याची क्षमता व परिस्थितीचा विचार करून निर्णय घेतले जातील.

टॅग्स :SangliसांगलीPoliticsराजकारणCongress Jan Sangharsh Yatraकाँग्रेस जनसंघर्ष यात्रा