शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
4
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
5
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
6
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
7
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
8
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
9
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
10
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
11
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
12
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
13
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
14
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
15
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
16
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
17
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
18
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
19
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

लोढे तलाव बारमाही करणार -सहा गावांचे शेतकरी एकत्र : बारा लाख भरले; विसापूर-पुणदी योजनेचे पाणी सोडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 21:52 IST

मांजर्डे : लोढे तलावामध्ये विसापूर-पुणदी उपसा सिंचन योजनेचे पाणी सोडून तलाव बारमाही करण्यासाठी ६ गावांतील शेतकºयांनी एकत्रित येऊन पाटबंधारे विभागाकडे १२ लाख रुपये जमा

मांजर्डे : लोढे तलावामध्ये विसापूर-पुणदी उपसा सिंचन योजनेचे पाणी सोडून तलाव बारमाही करण्यासाठी ६ गावांतील शेतकºयांनी एकत्रित येऊन पाटबंधारे विभागाकडे १२ लाख रुपये जमा केले व योजना सुरू झाल्यानंतर उर्वरित रक्कम जमा करण्याचे ठरले.

आरवडे (ता. तासगाव) येथील सिद्धेश्वर मंदिरात लोढे तलाव बारमाही करण्यासाठी पूर्वभागातील गावातील शेतकºयांची बैठक पार पडली होती. बैठकीला आरवडे, डोर्ली, कौलगे, सावर्डे, लोढे या गावांतील शेतकरी उपस्थित होते.

लोढे तलाव तासगाव पूर्व भागातील मोठा तलाव आहे. या तलावाची पाणी साठवण क्षमता १६३ दशलक्ष घनफूट आहे. या तलावावर या परिसरातील आरवडे, लोढे, कौलगे, सावर्डे, डोर्ली, चिंचणी या गावांच्या शेतीचे व पिण्याच्या पाण्याचे भवितव्य अवलंबून आहे. बरीच वर्षे या दुष्काळी पट्ट्यात समाधानकारक पाऊस नसल्याने हा तलाव मागील बरीच वर्षे पूर्ण क्षमतेने भरला नव्हता. परिणामी तलावाच्या परिसरातील बागायती शेती उद्ध्वस्त झाली आहे. हा तलाव पूर्ण क्षमतेने भरला तर या भागातील शेतीला वर्षभर फायदा होतो. येथून पेयजल योजनेद्वारे पाच गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाºया स्वतंत्र पाणीयोजना आहेत. शेतीच्या पाण्यासाठी एकूण १६४ स्वतंत्र पाईपलाइन शेतकºयांनी स्वखर्चाने केल्या आहेत. त्यासाठी शेतकºयांनी मोठ्या प्रमाणावर खर्च केला आहे. परंतु त्याचा शेतीसाठी पुरेसा फायदा झाला नाही. मागील २० वर्षांत पावसाच्या पाण्याने दोनवेळा तलाव पूर्ण क्षमतेने भरला होता. त्यामुळे शेतकºयांनी गुंतवलेले कोट्यवधी रुपये वाया गेले आहेत.

चार वर्षांपूर्वी दिवंगत गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या प्रयत्नातून विसापूर-पुणदी उपसा सिंचन पाणीयोजना अस्तित्वात आली. या योजनेतून शासनाच्या माध्यमातून हा तलाव भरला जाईल, अशी शेतकºयांना आशा होती; परंतु या योजनेतून आतापर्यंत या तलावात ४० दशलक्ष घनफूट पाणी केवळ पिण्यासाठी आले आहे. त्यामुळे या भागातील शेतकºयांनी कोणत्याही राजकीय नेत्यावर विसंबून न राहता एकत्रित येऊन शासनाच्या नियमानुसार प्रतिदशलक्ष घनफूट ४२,८०० रुपये भरून हा तलाव पूर्ण क्षमतेने भरून घ्यायचा, असे या बैठकीत ठरवले. यावेळी प्रति शेतीपंप ३० हजार रुपयाप्रमाणे पैसे जमा करण्यास सर्व शेतकºयांनी होकार दिला व आठ दिवसात सर्वांनी पैसे जमा करून लवकरात लवकर तलाव भरून घ्यायचे सर्वानुमते ठरले.पंधरा दिवसांत योजना सुरू होणारपुणदी सिंचन योजनेचे अभियंता एस. एस. रासनकार म्हणाले की, १५ दिवसात पाणीयोजना सुरू होईल व शेतकºयांनी शासन नियमनुसार पैसे भरले, तर तलावात पाणी सोडण्यास काही अडचण येणार नाही. शेतकºयांनी पैसे भरून सहकार्य करावे. आमच्या विभागाकडून सर्वतोपरी आम्ही मदत करू. 

एकजुटीचे प्रयत्नराजकारण बाजूला ठेवून लोढे तलाव बारमाही करण्यासाठी आपण सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करूया. लोढे तलाव बारमाही झाला तरच बागायती शेती जिवंत राहील, अशा प्रतिक्रिया बैठकीत व्यक्त झाल्या.

टॅग्स :WaterपाणीSangliसांगली