चांदोली ते उमदीपर्यंत भाग हिरवागार करू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:28 IST2021-01-08T05:28:47+5:302021-01-08T05:28:47+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : जत तालुक्यातील दुष्काळग्रस्त उर्वरित ६५ गावांना म्हैसाळ योजनेतून पाणी देण्याचा विचार सुरू आहे. ...

Let's make the part green from Chandoli to Umadi | चांदोली ते उमदीपर्यंत भाग हिरवागार करू

चांदोली ते उमदीपर्यंत भाग हिरवागार करू

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : जत तालुक्यातील दुष्काळग्रस्त उर्वरित ६५ गावांना म्हैसाळ

योजनेतून पाणी देण्याचा विचार सुरू आहे. त्यातून चांदोलीच्या पायथ्यापासून उमदीपर्यंत सांगली जिल्ह्याचा भाग हिरवागार करू, अशी ग्वाही पालकमंत्री जयंत पाटील यांनी सोमवारी सांगलीत

दिली.

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या

पहिल्या मजल्याच्या नूतनीकरणासह स्पोर्टस‌् क्लब व पोर्टलचे उद्घाटन जयंत पाटील यांच्याहस्ते सोमवारी सायंकाळी करण्यात आले. अध्यक्षस्थानी बँकेचे अध्यक्ष दिलीपतात्या पाटील होते. यावेळी बँकेचे

संचालक सी. बी. पाटील, प्रा. शिकंदर जमादार, किरण लाड, बी. के. पाटील,

प्रताप पाटील, उदयसिंह देशमुख, गणपती सगरे, चंद्रकांत हाक्के, बाळासाहेब

होनमोरे, कमल पाटील, श्रध्दा चरापले यांच्यासह मुख्य कार्यकारी अधिकारी

जयवंत कडू-पाटील उपस्थित होते.

जयंत पाटील

म्हणाले, यंदा महापुराचे वाहून जाणारे पाणी दुष्काळी भागाला देण्यात आम्ही यशस्वी झालो. वर्षानुवर्षे पाण्यापासून वंचित असणाऱ्या

गावांना त्याचा फायदा होत आहे. दुष्काळी भागातून बँकेची वसुली कमी होते, त्यामुळे तेथील क्षेत्र पाण्याखाली आल्यास बँकेची चांगली वसुली

होईल. म्हैसाळ योजनेतून जत

तालुक्याला पाणी देण्यात येत आहे. पाण्याची उपलब्धता झाल्यास उर्वरित ६५ गावांना पाणी देण्यात येईल. वसंतदादा पाटील, राजारामबापू पाटील, गुलाबराव

पाटील यांचे संपूर्ण जिल्हा सुजलाम-सुफलाम करण्याचे स्वप्न या माध्यमातून पूर्ण होईल.

दिलीपतात्या पाटील म्हणाले, बँकेत काम सुरू

केल्यानंतर अनेक अडचणी आल्या, काहींनी अडचणी निर्माण केल्या. मात्र जयंतराव पाटील यांचा अदृश्य हात कायम पाठीशी आहे. काही संचालकांनी बँकेच्या बैठकांना न येण्याचा, सह्या न

करण्याचा फंडा वापरला होता, असे सांगत त्याचाही खास शैलीत समाचार घेतला. स्वागत व प्रास्ताविक जयवंत कडू-पाटील

यांनी केले.

चौकट....

नावाला बट्टा लावला नाही

जिल्हा

बँकेत काम करताना तुमच्या नावाला बट्टा लागेल, असे कोणतेही कृत्य केले नाही. याची खात्री करायची असेल, तर, तुम्ही

बँकेची गुप्त चौकशी करावी, अशी विनंती दिलीपतात्या पाटील

यांनी केली.

चौकट

बँक क्रमांक एकवर नेऊ

जिल्हा मध्यवर्ती बँकेने पाच वर्षांत उत्कृष्ट कामगिरी केली असून, राज्यातील पहिल्या क्रमांकाची बँक बनविण्याचा प्रयत्न केला जाईल, असे जयंत पाटील यांनी सांगितले.

Web Title: Let's make the part green from Chandoli to Umadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.