शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

यंदा आटपाडीचा आमदार करुया : सर्वपक्षीय बैठकीत निर्धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2019 21:39 IST

आटपाडी तालुक्याचा आमदार करण्यासाठी सर्वानुमते उमेदवार निवडण्यासाठी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांनी आटपाडीत सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी बोलताना अमरसिंह देशमुख म्हणाले, तालुक्यात कुठे समाजमंदिरांना निधी दिला म्हणजे विकास झाला का? तालुक्याच्या मूळ प्रश्नांवर काम केले जाते का?

ठळक मुद्देकॉँग्रेस, रिपाइं, भारिप बहुजन महासंघ, ‘स्वाभिमानी’, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एकत्र

आटपाडी : यंदा ठरवूया... आटपाडीचाच आमदार झाला पाहिजे. १९९५ ची पुनरावृत्ती घडली पाहिजे. किती दिवस अन्याय सोसायचा? खानापूरच्या नेत्याचं ओझं किती दिवस डोक्यावर घ्यायचं? आटपाडी तालुक्याचा सुपुत्रच जो आटपाडीचा स्वाभिमान बनेल, त्यांना आमदार करुया, अशा भावना तालुक्यातील सर्वपक्षीय बैठकीत व्यक्त केल्या.

आटपाडी तालुक्याचा आमदार करण्यासाठी सर्वानुमते उमेदवार निवडण्यासाठी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांनी आटपाडीत सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी बोलताना अमरसिंह देशमुख म्हणाले, तालुक्यात कुठे समाजमंदिरांना निधी दिला म्हणजे विकास झाला का? तालुक्याच्या मूळ प्रश्नांवर काम केले जाते का? खानापूर मतदारसंघाची निर्मिती झाल्यापासून फक्त एकदा राजेंद्रअण्णा देशमुख आमदार झाले. सध्या टेंभूचे पाणी नाझरेला चाललेय. कुणाचे नियंत्रण नाही. पैसे असूनसुद्धा पाण्यासाठी कुणाच्या तरी दारात बसावे लागते, हे लाजिरवाणे आहे. त्यासाठी आटपाडी तालुक्याचा आमदार होणे गरजेचे आहे. सर्वानुमते उमेदवार ठरवा, असे आवाहन त्यांनी केले.

राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष हणमंतराव देशमुख म्हणाले, आपण आणि स्वाभिमानी विकास आघाडीचे नेते भारत पाटील यांनी आटपाडीचा आमदार होण्यासाठी बैठक घ्यावी, असे आवाहन केले होते. तालुक्यातील आमदार होण्यासाठी आपली पाठिंबा देण्याची भूमिका आहे. जो या तालुक्याचा सुपुत्र आहे, तो कधीच या विचारांशी प्रतारणा करणार नाही. राष्ट्रवादीच्या पक्षश्रेष्ठींशी विनंती करून पाठिंब्याची भूमिका घेऊ.

काँग्रेसचे सरचिटणीस राजाराम देशमुख म्हणाले, १९९५ पासून तालुक्यात विधानसभा आणि विधानपरिषद आमदाराचा दुष्काळ आहे. तालुक्यातील सर्व प्रमुख नेत्यांची एकत्रित बैठक घेऊन सक्षम उमेदवार देऊ. पण कोणत्याही परिस्थितीत आटपाडीचा आमदार होणार म्हणजे होणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

बैठकीत अ‍ॅड. सचिन सातपुते, श्रावण वाक्षे, रिपाइंचे तालुकाध्यक्ष राजेंद्र खरात, भारिप बहुजन महासंघाचे नेते अरुण वाघमारे, काँग्रेसचे युवा अध्यक्ष राहुल गायकवाड, अशोक लवटे, स्वाभिमानी विकास आघाडीचे नेते भारत पाटील, विनायकराव मासाळ, अजित चव्हाण, प्रा. डॉ. अंकुश कोळेकर, प्रणव गुरव, पी. जी. बाड, अशोक माळी, मोहन खरात, सावंता पुसावळे यांची भाषणे झाली.

बैठकीस वसंतराव गायकवाड, शिवराम मासाळ, भगवानराव मोरे, भाऊसाहेब गायकवाड, सभापती हर्षवर्धन देशमुख, महिपती पवार यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.जय आटपाडी तालुका!बैठकीत अनेक वक्त्यांनी आटपाडी तालुक्यावरील अन्यायाचा पाढा वाचला. अनेक कार्यकर्त्यांनी खोट्या गुन्ह्यात अडकवून पोलिसांकडून कारवाई करुन त्रास दिल्याचा आरोप केला. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष हणमंतराव देशमुख यांनी ‘जय आटपाडी तालुका!’ अशी प्रथम घोषणा दिली. त्यानंतर सर्व वक्त्यांनी आटपाडी तालुक्याची अस्मिता जागृत करत आटपाडी तालुक्याच्या जय-जयकाराच्या घोषणा दिल्या.

अनिल बाबर यांच्यावर आरोपआटपाडी तालुक्याच्या पिण्याच्या पाण्याची धनगाव येथून पाणी उपसा करणारी योजना आपण सादर केल्यापासून एक वर्षाच्या आत मंजूर झाली. निविदा निघाली. २२५ कि.मी. जलवाहिनीचे काम झाले. पण गेले दीड वर्ष केवळ सव्वा कि. मी. अंतराचे काम थांबलेय. पैसे पडून आहेत. मला अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यांच्यावर विधानसभा निवडणूक होईपर्यंत आटपाडीला पाणी देऊ नका, म्हणून दबाव आणला आहे, असा आरोप अमरसिंह देशमुख यांनी आ. अनिल बाबर यांच्यावर केला. 

टॅग्स :PoliticsराजकारणSangamnerसंगमनेर