शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

उन्हाळी सोयाबीन बियाणेप्रकरणी चौकशी करून मदत देऊ, कृषिमंत्री दादा भुसेंचे आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2022 17:46 IST

निकृष्ट उन्हाळी सोयाबीन वाणामुळे झालेल्या नुकसानीची चौकशी करण्यासाठी चौकशी समितीची स्थापना केली जाईल.

भिलवडी : मुदत संपून गेल्यानंतरही परिपक्व न झालेल्या सांगली जिल्ह्यासह, राज्यातील उन्हाळी सोयाबीन बियाणेप्रकरणी सखोल चौकशी करून मदत देऊ, असे आश्वासन महाराष्ट्राचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळास दिली.

कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांच्या पुढाकाराने मंत्रालयात बुधवारी दुपारी बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीस कृषी विभाग, महाबीजचे सर्व अधिकारी, धनगाव (ता. पलुस) येथील शेतकरी उपस्थित होते.

सांगलीसह अन्य जिल्ह्यांतही यावर्षी महाबीजमार्फत बीजोत्पादन कार्यक्रम आखला होता. यामध्ये हजारो शेतकऱ्यांना केडीएस ७२६ जातीचे बियाणे दिले होते. ते सर्व बियाणे सदोष असल्यामुळे किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला. तसेच उत्पन्न ही कमी प्रमाणात आले. यासंदर्भात धनगाव येथील शेतकऱ्यांनी आवाज उठविला होता. दरम्यान कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी या सोयाबीन पिकांची पाहणी करून यासंदर्भात मंत्रालयात बैठकीचे आयोजन केले होते.

निकृष्ट उन्हाळी सोयाबीन वाणामुळे झालेल्या नुकसानीची चौकशी करण्यासाठी चौकशी समितीची स्थापना केली जाईल. याबाबत सखोल अभ्यास करून समिती शासनाकडे अहवाल सादर करील व त्यानंतर शेतकऱ्यांना दिलासा देण्यात येणार असल्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी सांगितले. यावेळी प्रदीप साळुंखे, शरद साळुंखे, धनगावचे सरपंच सतपाल साळुंखे, दीपक भोसले आदी उपस्थित होते.

टॅग्स :SangliसांगलीVishwajeet Kadamविश्वजीत कदमFarmerशेतकरी