शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

उन्हाळी सोयाबीन बियाणेप्रकरणी चौकशी करून मदत देऊ, कृषिमंत्री दादा भुसेंचे आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2022 17:46 IST

निकृष्ट उन्हाळी सोयाबीन वाणामुळे झालेल्या नुकसानीची चौकशी करण्यासाठी चौकशी समितीची स्थापना केली जाईल.

भिलवडी : मुदत संपून गेल्यानंतरही परिपक्व न झालेल्या सांगली जिल्ह्यासह, राज्यातील उन्हाळी सोयाबीन बियाणेप्रकरणी सखोल चौकशी करून मदत देऊ, असे आश्वासन महाराष्ट्राचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळास दिली.

कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांच्या पुढाकाराने मंत्रालयात बुधवारी दुपारी बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीस कृषी विभाग, महाबीजचे सर्व अधिकारी, धनगाव (ता. पलुस) येथील शेतकरी उपस्थित होते.

सांगलीसह अन्य जिल्ह्यांतही यावर्षी महाबीजमार्फत बीजोत्पादन कार्यक्रम आखला होता. यामध्ये हजारो शेतकऱ्यांना केडीएस ७२६ जातीचे बियाणे दिले होते. ते सर्व बियाणे सदोष असल्यामुळे किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला. तसेच उत्पन्न ही कमी प्रमाणात आले. यासंदर्भात धनगाव येथील शेतकऱ्यांनी आवाज उठविला होता. दरम्यान कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी या सोयाबीन पिकांची पाहणी करून यासंदर्भात मंत्रालयात बैठकीचे आयोजन केले होते.

निकृष्ट उन्हाळी सोयाबीन वाणामुळे झालेल्या नुकसानीची चौकशी करण्यासाठी चौकशी समितीची स्थापना केली जाईल. याबाबत सखोल अभ्यास करून समिती शासनाकडे अहवाल सादर करील व त्यानंतर शेतकऱ्यांना दिलासा देण्यात येणार असल्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी सांगितले. यावेळी प्रदीप साळुंखे, शरद साळुंखे, धनगावचे सरपंच सतपाल साळुंखे, दीपक भोसले आदी उपस्थित होते.

टॅग्स :SangliसांगलीVishwajeet Kadamविश्वजीत कदमFarmerशेतकरी