शहरं
Join us  
Trending Stories
1
आभाळ फाटले, अतिवृष्टीचा विक्रम! ५३२० गावांतील पिकांचा चिखल; संपूर्ण आठवडा पावसाचा...
2
Video: दोन वर्षाचा नातू आणि आजी अडकली पुरात, वाचवण्यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर उतरले पाण्यात
3
अल्पवयीन मुलीच्या गुप्तांगाला स्पर्श करणे म्हणजे बलात्कार नव्हे; सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा
4
अपुऱ्या झोपेमुळे स्मृतिभ्रंशाचा मोठा धोका; ५ वर्षाच्या अभ्यासानंतर समोर आला धक्कादायक रिपोर्ट
5
स्क्रीनवर सोज्वळ, खऱ्या आयुष्यात बिकिनी? सीतेच्या भूमिकेत दिसणाऱ्या साई पल्लवीवर होतेय टीका
6
इस प्यार को क्या नाम दूं? भावोजीसोबत मेहुणी पळाली; जाताना १ लाख रोख अन् २ लाखांचे दागिनेही घेऊन गेली; पुढे काय झालं?
7
ट्रम्प यांच्या एच-1 बी शुल्क आदेशानंतर भारतीय प्रवासी एमिरेट्सच्या विमानातून उतरले, विमान ३ तास उशीरा
8
Mumbai Robbery: मोबाईल आणि ब्रँडेड घड्याळांच्या दुकानात दरोडा; चार सराईत गुन्हेगारांना अटक!
9
मराठवाड्यात पुन्हा पावसाचा कहर; पाच जणांचा मृत्यू, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगरमध्ये जलप्रलय
10
आजचे राशीभविष्य, २३ सप्टेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मित्रांकडून लाभ होईल
11
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
12
एच-१बी व्हिसाला टक्कर, आता चीनचा के-व्हिसा; कुशल कर्मचाऱ्यांसाठी  चीनने उघडले आपले दार
13
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
14
आजपासून ओला, उबरचालक आकारणार सरकारमान्य भाडे; अधिक भाडे घेतल्यास कंपन्यांवर कारवाई होणार
15
कुजबुज! ठाकरे बंधूंसाठी शरद पवारांची माघार? मुख्यमंत्र्यांनाच पडला परिवहन मंत्र्यांचा विसर
16
मराठा आरक्षणावर अन्य खंडपीठासमोर सुनावणी; सरकारचा हा निर्णय गोंधळात टाकणारा, याचिकेत आरोप
17
आयुष्याची जमापुंजी गुंतवली, घराचा ताबा घ्यायला गेले अन् दारातच जीव गेला; मुलुंड शहरातील घटना
18
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे बंधूंच्या युतीला दिवाळीचा मुहूर्त? अधिक जागा लढवण्याचा मनसेचा आग्रह
19
पावसामुळे शेतकरी हवालदिल! ओला दुष्काळ जाहीर करून सरकारने तत्काळ मदतीचा हात पुढे करावा
20
...आपण इतके बधिर का झालो आहोत?; फरहानची ‘स्टेनगन’- ही दहशतवादी मस्ती ठेचून काढा!

उन्हाळी सोयाबीन बियाणेप्रकरणी चौकशी करून मदत देऊ, कृषिमंत्री दादा भुसेंचे आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2022 17:46 IST

निकृष्ट उन्हाळी सोयाबीन वाणामुळे झालेल्या नुकसानीची चौकशी करण्यासाठी चौकशी समितीची स्थापना केली जाईल.

भिलवडी : मुदत संपून गेल्यानंतरही परिपक्व न झालेल्या सांगली जिल्ह्यासह, राज्यातील उन्हाळी सोयाबीन बियाणेप्रकरणी सखोल चौकशी करून मदत देऊ, असे आश्वासन महाराष्ट्राचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळास दिली.

कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांच्या पुढाकाराने मंत्रालयात बुधवारी दुपारी बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीस कृषी विभाग, महाबीजचे सर्व अधिकारी, धनगाव (ता. पलुस) येथील शेतकरी उपस्थित होते.

सांगलीसह अन्य जिल्ह्यांतही यावर्षी महाबीजमार्फत बीजोत्पादन कार्यक्रम आखला होता. यामध्ये हजारो शेतकऱ्यांना केडीएस ७२६ जातीचे बियाणे दिले होते. ते सर्व बियाणे सदोष असल्यामुळे किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला. तसेच उत्पन्न ही कमी प्रमाणात आले. यासंदर्भात धनगाव येथील शेतकऱ्यांनी आवाज उठविला होता. दरम्यान कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी या सोयाबीन पिकांची पाहणी करून यासंदर्भात मंत्रालयात बैठकीचे आयोजन केले होते.

निकृष्ट उन्हाळी सोयाबीन वाणामुळे झालेल्या नुकसानीची चौकशी करण्यासाठी चौकशी समितीची स्थापना केली जाईल. याबाबत सखोल अभ्यास करून समिती शासनाकडे अहवाल सादर करील व त्यानंतर शेतकऱ्यांना दिलासा देण्यात येणार असल्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी सांगितले. यावेळी प्रदीप साळुंखे, शरद साळुंखे, धनगावचे सरपंच सतपाल साळुंखे, दीपक भोसले आदी उपस्थित होते.

टॅग्स :SangliसांगलीVishwajeet Kadamविश्वजीत कदमFarmerशेतकरी