शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुद्धाचे संकेत? 'या' २१ देशात प्रवास करू नका; अमेरिकन नागरिकांसाठी Travel Advisory जारी
2
बंडखोरांसह ३२ जणांचं ६ वर्षासाठी निलंबन; छुपा प्रचार करणाऱ्यांची गय करणार नाही, भाजपाचा इशारा
3
द बर्निंग ट्रेन! मुंबईत लोकलला भीषण आग; ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
4
"माझं खरं नाव आशिष नाही तर अब्दुल..."; लव्ह जिहादवरून नितेश राणेंचा पुन्हा प्रहार
5
नरेंद्र मोदींच्या दौऱ्यापूर्वी भाजपाच्या ५ आमदारांचा 'लेटर बॉम्ब'; गुजरातमध्ये उडाली खळबळ
6
"मागच्या जन्मी पाप करणारा नगरसेवक-महापौर होतो" मुख्यमंत्री गंमतीने असं का म्हणाले?
7
पाकिस्तानात खळबळ! पंतप्रधान शहबाज शरीफ यांना अटक होणार?; जारी झाला अरेस्ट वॉरंट
8
EXCLUSIVE: अजित पवार-शरद पवार दोघेही एकत्र भाजपसोबत आले तर काय...? CM फडणवीसांनी दिलं उत्तर
9
भारत-न्यूझीलंड T-20 सीरीजपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का; तिलक वर्मा संघाबाहेर...
10
२३४ पैकी ५६ जागा अन् ३ मंत्रिपदाची मागणी, शाहांनी आखली रणनीती; तामिळनाडूत भाजपाचं गणित काय?
11
ठाकरे माझे मतदार! मत मागण्यासाठी मातोश्रीवर पोहोचला शिंदेसेनेचा उमेदवार, सारेच अवाक्, त्यानंतर घडलं असं काही? 
12
दुसऱ्याची चूक आणि करोडपती झाला ट्रेडर, ४० कोटी आले खात्यात, पण प्रकरण गेलं कोर्टात, अखेरीस...
13
"त्याच रात्री मी फडणवीसांना म्हणालो, असे असेल तर मी राजकारणातून बाहेर पडतो", गणेश नाईकांनी सांगितलं प्रकरण काय?
14
एक लाखांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला असता; अमेरिकेत दोन भारतीयांनी केला 'हा' मोठा गुन्हा
15
EXCLUSIVE: "१६ तारखेनंतर आम्ही पुन्हा एकत्र चहा घेऊ..."; राज ठाकरेंबद्दल नेमकं काय म्हणाले CM फडणवीस?
16
"डोनाल्ड ट्रम्प हिटलर बनलेत, संपूर्ण जगावर नियंत्रण मिळवायचंय, एक ना एक दिवस आपल्यालाही..."
17
Realme चा धमाका! २००MP कॅमेरा, AI ची कमाल, दमदार फीचर्ससह पॉवरफुल स्मार्टफोन लाँच
18
काका-पुतणे एकत्र येणार? अजित पवार स्पष्टच म्हणाले, "यावरून काय ओळखायचं ते ओळखा"
19
२९ किलो सोनं, रोख रक्कम, DRI ने रॅकेटचा कार्यक्रम केला; कुठे झाली कारवाई, छाप्यात किती कोटी मिळाले?
20
Vijay Hazare Trophy Quarter Finals Full Schedule : मुंबईसह हे ८ संघ क्वार्टर फायनलमध्ये; इथं पाहा संपूर्ण वेळापत्रक
Daily Top 2Weekly Top 5

ठेकेदार, समितीवर गुन्हे दाखल करू

By admin | Updated: January 29, 2015 00:14 IST

सतीश लोखंडे यांचा इशारा : चौदा पाणीपुरवठा योजनांमध्ये हलगर्जीपणाचा ठपका

सांगली : जिल्ह्यातील ६३ ग्रामीण पाणी पुरवठा योजना अद्याप रखडल्या असून, त्यातील काहींनी त्या पूर्ण करण्यास तयारी दर्शविली आहे. त्यामुळे त्या योजना पूर्ण करण्यासाठी कालावधी निश्चित करण्यात येणार आहे. चौदा पाणी पुरवठा योजनांच्या कामातील हलगर्जीपणामुळे संबंधित ठेकेदार व पाणी पुरवठा समितीवर लवकरच गुन्हे दाखल करण्यात येतील, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश लोखंडे यांनी दिली.ग्रामीण पाणी पुरवठा योजनेचा आढावा घेण्यासाठी आज, बुधवारी जिल्हा परिषदेमध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ६३ योजनांचा कृती आराखडाही बैठकीत सादर करण्यात आला. त्यानंतर लोखंडे पत्रकारांशी बोलत होते. सध्या जिल्ह्यात ६३ ग्रामीण पाणी पुरवठा योजना रखडल्या असल्याचे समोर आले आहे. त्यापैकी उंच टाकीचे काम न झालेल्यांमध्ये धुळकरवाडी, कंठी, लकडेवाडी, लमाणतांडा, पांढरवाडी, सोनलगी, जिरग्याळ, जालिहाल खुर्द आणि गुगवाड येथील योजनांचा समावेश आहे. तसेच समितीने पुढील काम करण्यास असमर्थता दर्शविलेल्यांमध्ये लिंगीवरे, करेवाडी, वळसंग, निगडी खुर्द आणि खटाव अशा एकूण चौदा योजना पूर्णपणे रखडलेल्या आहेत. त्यांना याबाबत वेळोवेळी संधीही देण्यात आली होती. परंतु त्यांच्याकडून काहीही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे संबंधित योजनेशी संबंधित ठेकेदार व पाणी पुरवठा समितीवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.सुधारित मंजुरीकरिता आटपाडी पाणी पुरवठा समितीने शासनाकडे योजना पाठविली असून तिला मंजुरी मिळाली आहे. जाडरबोबलाद (ता. जत) येथे सुधारित कामाची आवश्यकता नसून ते काम अंतिम टप्प्यात आले आहे. तसेच सादर केलेल्या योजनांपैकी भिवर्गी आणि साळमळगेवाडी (ता. जत) येथील योजनांना अद्याप शासनाची मंजुरी मिळालेली नाही. रखडलेल्या योजनांपैकी मार्च २०१५ पर्यंत पूर्ण होणाऱ्या योजनांमध्ये लाडेगाव, मरळनाथपूर, शिरटे, गौरवाडी, बहाद्दूरवाडी, खरातवाडी, तर जून २०१५ मध्ये पूर्ण होणाऱ्या योजनांमध्ये इटकरे, बावची, ठाणापुडे, कुरळप, घोलेश्वर, खैराव, खंडनाळ येथील योजनांचा समावेश आहे. आॅगस्ट २०१५ पर्यंत तुजारपूर, येडेनिपाणी, बोरगाव या तीन योजना पूर्ण होणार आहेत. ऐतवडे खुर्द येथील योजना ही तक्रारीमुळे बंद करण्यात आली आहे. बनेवाडी, मिरजवाडी आणि नृसिंहपूर येथील योजना पूर्ण झाल्याचे बैठकीत निदर्शनास आले. यापूर्वी गिरगाव, तुरची, आंबेवाडी, बिसूर, हळ्ळी, मिरवाड, नरवाड, टाकळी-बोलवाड- सुभाषनगर, संतोषवाडी, विजयनगर, बुर्ली, मल्लेवाडी आणि तांदुळवाडी या योजनांवर गुन्हा दाखल करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. त्याचप्रमाणे कोसारी, जानराववाडी, भोसे, बनाळी, रेवनाळ, ढवळेश्वर, मुचंडी, माडग्याळ या योजनांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, तर अमृतवाडी येथील योजना समितीने तेथील योजनेकरिता आवश्यक असणारे पैसे शासनास परत केले आहेत. उंच टाकीचे काम न झालेल्या योजनांपैकी करेवाडी - तिकोंडी आणि सुसलाद येथील योजना पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत. बहे येथील योजनेने सुधारित तांत्रिक मंजुरी घेऊन निवीदा प्रक्रिया सुरू असल्याने तेथील कामही लवकरच सुरू होणार आहे. बैठकीस ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता एस. जी. सादिलगे उपस्थित होते. (प्रतिनिधी)योजनांचा आराखडा सादरग्रामीण पाणी पुरवठा योजनेचा आढावा घेण्यासाठी बुधवारी जिल्हा परिषदेमध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ६३ योजनांचा कृती आराखडाही बैठकीत सादर करण्यात आला. सध्या जिल्ह्यात १४ ग्रामीण पाणी पुरवठा योजना रखडल्या असल्याचे समोर आले आहे. गिरगाव, तुरची, आंबेवाडी, बिसूर, हळ्ळी, मिरवाड, नरवाड, टाकळी-बोलवाड - सुभाषनगर, संतोषवाडी, विजयनगर, बुर्ली, मल्लेवाडी आणि तांदुळवाडी या योजनांवर गुन्हा दाखल करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. त्याचप्रमाणे कोसारी, जानराववाडी, भोसे, बनाळी, रेवनाळ, ढवळेश्वर, मुचंडी, माडग्याळ या योजनांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, अशीही माहिती सतीश लोखंडे यांनी दिली.