शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीतील अनिकेतच्या खुनाचा तपास सीबीआयकडे द्या: राजू शेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 22:39 IST

सांगली : अनिकेत कोथळे याचा पोलिसांनी निर्दयीपणे आणि क्रूरपणे खून केला आहे.

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांकडे मागणी, कामटेला सहकार्य करणाºयांनाही अटक करापोलिस उपअधीक्षक डॉ. दीपाली काळे यांना पुसटशीदेखील कल्पना कशी नव्हती? मुख्यमंत्र्यांनी याकडे दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,

सांगली : अनिकेत कोथळे याचा पोलिसांनी निर्दयीपणे आणि क्रूरपणे खून केला आहे. या प्रकरणाची राज्य शासनाने सीबीआयमार्फत त्वरित चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा करावी, तसेच आरोपींना सहकार्य करणाºयांनाही त्वरित अटक करावी, अशी मागणी खासदार राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे शुक्रवारी केली.

शेट्टी म्हणाले की, केवळ दोन हजार रूपयांची चोरी केल्याच्या आरोपाखाली अनिकेतला अटक करण्यात आली होती. त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली होती. असे असताना कोठडीमध्ये असणाºया या तरूणावर रात्री थर्ड डिग्रीचा वापर करण्यात आला. त्याला अक्षरश: उलटा टांगून पाण्यात बुडवून मारहाण करण्यात आली. त्यातच त्याचा मृत्यू झाला. ही घटना माणुसकीला काळिमा फासणारी आहे. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटेसह संशयितांना अटक करून, तपास सीआयडीकडे देण्यात आला आहे.

वास्तविक पोलिस दलातीलच ही घटना आहे. त्यामुळे सीआयडीकडून योग्यरितीने तपास होईल असे वाटत नाही. वारणानगर येथील पोलिसांनी टाकलेल्या दरोड्याचा तपासदेखील संथगतीने सुरू आहे. जिल्'ात गुन्हेगारी विश्वाने तोंड वर काढले आहे. जिल्हा पोलिसप्रमुख दत्तात्रय शिंदे यांचे लक्ष नाही. चिरीमिरीमुळे बिनदिक्कतपणे चालणाºया अवैध व्यवसायांकडे पोलिस दलाचे लक्ष नाही. पोलिसच जर असे वागू लागले, तर न्याय कोणाकडे मागायचा? जिल्'ाचा बिहार होऊन बसलेला आहे, तरीही गृहखाते मूग गिळून गप्प आहे.

दोषी लोकांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न अधिकारी करत आहेत. त्यामुळे पोलिस दलाची बदनामी होत आहे. अनिकेतच्या खुनामागे नेमका कोणाचा हात आहे? त्याला ठार मारण्याची सुपारी देण्यात आली होती, असा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे. एवढी मोठी घटना घडूनदेखील पोलिस अधीक्षक शिंदे, पोलिस उपअधीक्षक डॉ. दीपाली काळे यांना पुसटशीदेखील कल्पना कशी नव्हती? अनिकेत कोठडीतून पळून गेला आहे, अशा बतावण्या करण्यात आल्या होत्या.

या सर्व पार्श्वभूमीवर सीआयडीकडून या प्रकरणाचा योग्यरित्या तपास होईल असे वाटत नाही. त्यामुळे हे खून प्रकरण आणि वारणानगर येथील पोलिसांनी मारलेल्या कोट्यवधी रूपयांच्या डल्ल्याचे प्रकरण या दोन्ही प्रकरणांचा तपास त्वरित सीबीआयकडे देण्यात यावा, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. मुख्यमंत्र्यांनी याकडे दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही राजू शेट्टी यांनी दिला.

टॅग्स :PoliceपोलिसRaju Shettyराजू शेट्टी