शहरं
Join us  
Trending Stories
1
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
2
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
3
"...म्हणून मी 'चला हवा येऊ द्या'मधून बाहेर पडलो", अखेर निलेश साबळेने सांगितलं खरं कारण
4
छत्री तलाव येथे वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणाला 'भुता'कडून मारहाण? व्हिडीओ व्हायरल; पोलिस म्हणतात...
5
'आमच्या भारतात २५०० राजकीय पक्ष...', PM मोदींनी आकडा सांगताच घानातील सर्व नेते चक्रावले
6
कोण असतील पुढचे दलाई लामा? भारताने स्पष्ट शब्दात उत्तर दिलं; चीनलाही थेट सुनावलं! म्हणाले... 
7
Criminal Justice 4: ‘माधव मिश्रा’ची साधी भोळी पत्नी, खऱ्या आयुष्यात 'फॅशन क्वीन' आहे खुशबू अत्रे ( PHOTOS )
8
भय इथले संपत नाही! तांदळामुळे कॅन्सरचा मोठा धोका? 'हा' राईस आहे सर्वात सुरक्षित
9
निलेश साबळेपाठोपाठ 'चला हवा येऊ द्या'मधून भाऊ कदमचीही एक्झिट, नेमकं कारण तरी काय?
10
Viral Video : समुद्राची खोली दाखवण्यासाठी पाकिस्तानी पत्रकाराने काय केलं बघाच! तुम्हालाही हसू आवरणार नाही
11
अपात्र, दोषी लाडक्या बहि‍णींना पैसे परत द्यावे लागणार?; अदिती तटकरेंनी विधानसभेत काय सांगितले?
12
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी 'रेड अलर्ट'! 'ही' आहेत ३ मोठी कारणे; घसरणीतही 'या' शेअर्सने मारली बाजी
13
Ashadhi Ekadashi 2025: पांडुरंगाच्या मूर्तीवर शिवलिंग का आहे? अनेकांना माहीत नाही कारण!
14
"डच्चू दिला, अहंकार, चॅनेलने बाहेर काढलं...", राशीचक्रकार शरद उपाध्येंच्या आरोपांवर निलेश साबळेनं सोडलं मौन, म्हणाला...
15
दोन भाऊ का एकत्र येऊ शकत नाहीत? महेश मांजरेकर म्हणाले, "आपल्याकडे महाभारतापासून..."
16
इंग्लंडच्या बालेकिल्ल्यात जड्डूची 'तलवारबाजी'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला भारतीय
17
"मराठी विरुद्ध कितीही मोर्चे काढा, आमचं..."; मनसे विरोधात आंदोलन करणाऱ्यांना राजू पाटलांचा इशारा
18
Himachal Flood : हिमाचलमध्ये मुसळधार पावसामुळे विध्वंस! ६३ जणांचा मृत्यू, १०९ जखमी; ४०७ कोटींचं नुकसान
19
तुम्ही घर विकण्याचा प्लॅन करताय? आता भरावा लागेल कमी टॅक्स! प्राप्तीकर विभागाने जाहीर केला फॉर्म्युला!
20
मंडप सजला, वऱ्हाडी जमले, तेवढ्यात पडली धाड, बोहल्यावरून वर पसार, कारण ऐकून वधूला बसला धक्का 

सांगलीतील अनिकेतच्या खुनाचा तपास सीबीआयकडे द्या: राजू शेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 22:39 IST

सांगली : अनिकेत कोथळे याचा पोलिसांनी निर्दयीपणे आणि क्रूरपणे खून केला आहे.

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांकडे मागणी, कामटेला सहकार्य करणाºयांनाही अटक करापोलिस उपअधीक्षक डॉ. दीपाली काळे यांना पुसटशीदेखील कल्पना कशी नव्हती? मुख्यमंत्र्यांनी याकडे दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,

सांगली : अनिकेत कोथळे याचा पोलिसांनी निर्दयीपणे आणि क्रूरपणे खून केला आहे. या प्रकरणाची राज्य शासनाने सीबीआयमार्फत त्वरित चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा करावी, तसेच आरोपींना सहकार्य करणाºयांनाही त्वरित अटक करावी, अशी मागणी खासदार राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे शुक्रवारी केली.

शेट्टी म्हणाले की, केवळ दोन हजार रूपयांची चोरी केल्याच्या आरोपाखाली अनिकेतला अटक करण्यात आली होती. त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली होती. असे असताना कोठडीमध्ये असणाºया या तरूणावर रात्री थर्ड डिग्रीचा वापर करण्यात आला. त्याला अक्षरश: उलटा टांगून पाण्यात बुडवून मारहाण करण्यात आली. त्यातच त्याचा मृत्यू झाला. ही घटना माणुसकीला काळिमा फासणारी आहे. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटेसह संशयितांना अटक करून, तपास सीआयडीकडे देण्यात आला आहे.

वास्तविक पोलिस दलातीलच ही घटना आहे. त्यामुळे सीआयडीकडून योग्यरितीने तपास होईल असे वाटत नाही. वारणानगर येथील पोलिसांनी टाकलेल्या दरोड्याचा तपासदेखील संथगतीने सुरू आहे. जिल्'ात गुन्हेगारी विश्वाने तोंड वर काढले आहे. जिल्हा पोलिसप्रमुख दत्तात्रय शिंदे यांचे लक्ष नाही. चिरीमिरीमुळे बिनदिक्कतपणे चालणाºया अवैध व्यवसायांकडे पोलिस दलाचे लक्ष नाही. पोलिसच जर असे वागू लागले, तर न्याय कोणाकडे मागायचा? जिल्'ाचा बिहार होऊन बसलेला आहे, तरीही गृहखाते मूग गिळून गप्प आहे.

दोषी लोकांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न अधिकारी करत आहेत. त्यामुळे पोलिस दलाची बदनामी होत आहे. अनिकेतच्या खुनामागे नेमका कोणाचा हात आहे? त्याला ठार मारण्याची सुपारी देण्यात आली होती, असा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे. एवढी मोठी घटना घडूनदेखील पोलिस अधीक्षक शिंदे, पोलिस उपअधीक्षक डॉ. दीपाली काळे यांना पुसटशीदेखील कल्पना कशी नव्हती? अनिकेत कोठडीतून पळून गेला आहे, अशा बतावण्या करण्यात आल्या होत्या.

या सर्व पार्श्वभूमीवर सीआयडीकडून या प्रकरणाचा योग्यरित्या तपास होईल असे वाटत नाही. त्यामुळे हे खून प्रकरण आणि वारणानगर येथील पोलिसांनी मारलेल्या कोट्यवधी रूपयांच्या डल्ल्याचे प्रकरण या दोन्ही प्रकरणांचा तपास त्वरित सीबीआयकडे देण्यात यावा, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. मुख्यमंत्र्यांनी याकडे दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही राजू शेट्टी यांनी दिला.

टॅग्स :PoliceपोलिसRaju Shettyराजू शेट्टी