शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

सांगलीतील अनिकेतच्या खुनाचा तपास सीबीआयकडे द्या: राजू शेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 22:39 IST

सांगली : अनिकेत कोथळे याचा पोलिसांनी निर्दयीपणे आणि क्रूरपणे खून केला आहे.

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांकडे मागणी, कामटेला सहकार्य करणाºयांनाही अटक करापोलिस उपअधीक्षक डॉ. दीपाली काळे यांना पुसटशीदेखील कल्पना कशी नव्हती? मुख्यमंत्र्यांनी याकडे दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,

सांगली : अनिकेत कोथळे याचा पोलिसांनी निर्दयीपणे आणि क्रूरपणे खून केला आहे. या प्रकरणाची राज्य शासनाने सीबीआयमार्फत त्वरित चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा करावी, तसेच आरोपींना सहकार्य करणाºयांनाही त्वरित अटक करावी, अशी मागणी खासदार राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे शुक्रवारी केली.

शेट्टी म्हणाले की, केवळ दोन हजार रूपयांची चोरी केल्याच्या आरोपाखाली अनिकेतला अटक करण्यात आली होती. त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली होती. असे असताना कोठडीमध्ये असणाºया या तरूणावर रात्री थर्ड डिग्रीचा वापर करण्यात आला. त्याला अक्षरश: उलटा टांगून पाण्यात बुडवून मारहाण करण्यात आली. त्यातच त्याचा मृत्यू झाला. ही घटना माणुसकीला काळिमा फासणारी आहे. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटेसह संशयितांना अटक करून, तपास सीआयडीकडे देण्यात आला आहे.

वास्तविक पोलिस दलातीलच ही घटना आहे. त्यामुळे सीआयडीकडून योग्यरितीने तपास होईल असे वाटत नाही. वारणानगर येथील पोलिसांनी टाकलेल्या दरोड्याचा तपासदेखील संथगतीने सुरू आहे. जिल्'ात गुन्हेगारी विश्वाने तोंड वर काढले आहे. जिल्हा पोलिसप्रमुख दत्तात्रय शिंदे यांचे लक्ष नाही. चिरीमिरीमुळे बिनदिक्कतपणे चालणाºया अवैध व्यवसायांकडे पोलिस दलाचे लक्ष नाही. पोलिसच जर असे वागू लागले, तर न्याय कोणाकडे मागायचा? जिल्'ाचा बिहार होऊन बसलेला आहे, तरीही गृहखाते मूग गिळून गप्प आहे.

दोषी लोकांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न अधिकारी करत आहेत. त्यामुळे पोलिस दलाची बदनामी होत आहे. अनिकेतच्या खुनामागे नेमका कोणाचा हात आहे? त्याला ठार मारण्याची सुपारी देण्यात आली होती, असा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे. एवढी मोठी घटना घडूनदेखील पोलिस अधीक्षक शिंदे, पोलिस उपअधीक्षक डॉ. दीपाली काळे यांना पुसटशीदेखील कल्पना कशी नव्हती? अनिकेत कोठडीतून पळून गेला आहे, अशा बतावण्या करण्यात आल्या होत्या.

या सर्व पार्श्वभूमीवर सीआयडीकडून या प्रकरणाचा योग्यरित्या तपास होईल असे वाटत नाही. त्यामुळे हे खून प्रकरण आणि वारणानगर येथील पोलिसांनी मारलेल्या कोट्यवधी रूपयांच्या डल्ल्याचे प्रकरण या दोन्ही प्रकरणांचा तपास त्वरित सीबीआयकडे देण्यात यावा, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. मुख्यमंत्र्यांनी याकडे दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही राजू शेट्टी यांनी दिला.

टॅग्स :PoliceपोलिसRaju Shettyराजू शेट्टी