शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशात डॉक्टरी शिकून थेट भारतात प्रॅक्टीस करण्याचा मार्ग सोपा होणार; एनएमसी आणतेय नवे नियम...
2
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
3
Pune Video: लाज लज्जाच सोडली! पुण्यात जोडप्याचे दुचाकीवरच अश्लील चाळे; व्हिडीओ व्हायरल 
4
ठाकरे ब्रँडला शह देण्यासाठी रणनीती, मुंबईत एकत्र लढेल महायुती! 'प्लॅन बी'चीही तयारी...
5
बारामती हळहळलं ! २४ तासात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, वडिलांनी देखील घेतला अखेरचा श्वास
6
बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांचे सूर बदलले, म्हणाले, 'भारताचे मनापासून आभार...', नेमकं कारण काय?
7
शाहरुख-सलमानच्या घराबाहेर चाहत्यांची गर्दी, पण आमिरच्या का नाही? अभिनेता म्हणाला...
8
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा
9
VIDEO: शटल कॉक घेऊन उभा राहिला अन् जोरात कोसळला…; २५ वर्षाच्या तरुणाचा धक्कादायक मृत्यू
10
Shreyasi Joshi : पुण्याच्या लेकीची कमाल; आशियाई रोलर स्केटिंग चॅम्पियनशिपमध्ये गोल्ड मेडल जिंकणारी पहिली भारतीय
11
देशातील सर्वात स्वस्त ईलेक्ट्रीक कार १५००० रुपयांनी महागली; वर्षात तिसऱ्यांदा वाढ...
12
भारतीय सैन्यापेक्षा ISI वर जास्त विश्वास; चिदंबरम यांच्या पहलगामबाबत केलेल्या वक्तव्यावर भाजपचा संताप
13
राज्यात तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर; हिंदी सक्तीला लागला ब्रेक? 'हे' विषय शिकवणार
14
Nag Panchami 2025: नागपंचमीला 'या' घरगुती उपायांनीदेखील दूर होईल कालसर्पदोष!
15
रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकची गेल्या महिन्यात रेकॉर्ड ब्रेक विक्री; खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड!
16
गरोदरपणात सुचली कल्पना! फक्त ६० हजारांच्या गुंतवणुकीतून 'या' जोडप्याने कमावले ५ कोटी!
17
Uorfi Javed : बारीक दिसण्यासाठी जेवणं सोडलं, उपाशी राहिली अन्...; उर्फी जावेदने 'या' आजाराचा केला सामना
18
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तामिळनाडू दौरा; महान चोल साम्राज्याचा उल्लेख करत म्हणाले...
19
Nag Panchami 2025: नागपंचमीला तळणे, चिरणे, कापणे निषिद्ध; वाचा शास्त्रीय आणि धार्मिक कारण!
20
मुलांच्या शिक्षणाचं टेन्शन? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देणार हमखास परतावा आणि टॅक्समध्ये सूट!

सांगलीत सिंचन योजनांच्या पाण्यावर नेत्यांनी पिकविली मतांची शेती; ३५ वर्षांनंतरही साखरपेरणी सुरूच

By संतोष भिसे | Updated: April 12, 2024 18:45 IST

ताकारी, म्हैसाळ, टेंभूमधून डझनभर आमदार 

संतोष भिसेसांगली : ताकारी, म्हैसाळ, टेंभू, आरफळ आदी सिंचन योजनांच्या पाण्यावर जिल्ह्यातील शेती फुलली आहेच, शिवाय राजकारण्यांनीही प्रत्येक निवडणुकीत या योजनांचे भांडवल करीत मतांची भरघोस पिके घेतली आहेत. आजवर या योजनांमधून डझनभर आमदार, खासदार आणि मंत्र्यांचे पीक आले आहे. सध्या ३५ वर्षांनंतरही प्रत्येक निवडणुकीत या योजनांच्या पाण्याची साखरपेरणी सुरूच आहे.

जिल्ह्यातील सिंचन योजना म्हणजे राजकारण्यांसाठी निवडणुकीतील प्रचाराचा हमखास मुद्दा ठरत आला आहे. २० टक्के राजकारण आणि ८० टक्के समाजकारण असा बोलघेवडेपणा नेत्यांकडून केला जात असला, तरी सिंचन योजनांबाबतीत मात्र २० टक्केच समाजकारण आणि बाकीचे राजकारण असा शेतकऱ्यांचा अनुभव आहे. त्यामुळेच आज सुमारे ४० वर्षे होत आली तरी, म्हैसाळ योजना १०० टक्के पूर्ण होऊ शकली नाही. नेत्यांनी फक्त घोषणांचा पाऊस पाडला. योजना पूर्ण होऊन शेतीच्या बांधावर पाणी पोहोचावे, यासाठी कुणीच प्रामाणिक प्रयत्न केले नाहीत. आता सध्याच्या लोकसभा निवडणुकीतही या योजनेचा मुद्दा प्रचारात अग्रस्थानी दिसत आहे. अगदी आगामी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारातही याच मुद्द्यावर रान तापलेले दिसणार आहे.कवठेमहांकाळ, मिरज, जत, तासगाव, खानापूर, विटा, आटपाडी या टंचाईग्रस्त तालुक्यांसाठी सिंचन योजनांचा मोठा आधार आहे. त्यांच्या पाण्यावरच अनेकदा निवडणुकीचे पारडे फिरल्याचा अनुभव आहे. त्यामुळेच डॉ. पतंगराव कदम यांच्यापासून आर. आर. पाटील यांच्यापर्यंत प्रत्येक नेत्यासाठी या योजना जिव्हाळ्याच्या राहिल्या आहेत. अगदी अलीकडे विटा - खानापूरचे आमदार अनिल बाबर यांनीही टेंभू, आरफळसाठी सातत्याने प्रतिष्ठा पणाला लावल्याचे पाहायला मिळाले आहे.मिरज - कवठेमहांकाळचे तत्कालीन आमदार अजितराव घोरपडे यांनी म्हैसाळ योजनेच्या जोरावरच आमदारकीला आणि राज्यमंत्रिपदालाही गवसणी घातली होती. त्यांच्यापूर्वी शिवाजीराव शेंडगे यांनीही योजनेच्या आधारे मंत्रिपद मिळविले होते. जतला उमाजीराव सनमडीकर, मधुकर कांबळे, प्रकाश शेंडगे, विलासराव जगताप, विक्रम सावंत, तासगावला सुमनताई पाटील, विटा - खानापूरला सदाशिवराव पाटील, मिरजेला सुरेश खाडे, आटपाडीला राजेंद्रअण्णा देशमुख, गोपीचंद पडळकर यांच्यासाठीही पाणी योजना हा हमखास गुलाल उधळणारा विषय ठरला आहे.

जिल्ह्याचे नेतृत्वही पाण्यावरचजिल्ह्याचे नेतृत्व करायचे, तरी सध्या सिंचन योजनांचे नाणे खणखणीतपणे वाजवावे लागते. अर्थात, यातील राजकारण सोडले, तरी नेत्यांच्या कमी अधिक रेट्यामुळेच आज दुष्काळी भागात गंगा अवतरली आहे, हे मान्य करावे लागते. पतंगराव कदम, आर. आर. पाटील व जयंत पाटील यांनी म्हैसाळ योजना सतत प्रवाहीत ठेवून जिल्ह्याच्या पूर्व भागाला वेळोवेळी दिलासा दिला होता. हीच साखरपेरणी आता लोकसभा निवडणुकीतही सुरू आहे. जतच्या विस्तारित म्हैसाळ योजनेसाठी प्राणपणाने काम करू, अशी ग्वाही शेतकऱ्यांना दिली जात आहे.

टॅग्स :SangliसांगलीWaterपाणीPoliticsराजकारण