शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
2
Ahmedabad Plane Crash Live Updates : भीषण! अहमदाबादमध्ये मोठी दुर्घटना, Air India चं विमान कोसळलं, होते २४२ प्रवासी
3
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
4
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
5
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
6
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?
7
एअर इंडिया विमान अपघातानंतर टाटा ग्रुपचे ट्विट; आपत्कालीन सेंटर, मदत पथकाची स्थापना
8
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
9
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
10
Ahmedabad Plane Crash: विमान अपघातानंतर रितेश देशमुख हळहळला, म्हणाला- "मला मोठा धक्का..."
11
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?
12
Ahmedabad Plane Crash: "ज्यांनी जीव गमावला, त्यांना.."; अहमदाबाद विमान दुर्घटनेमुळे कलाकारांनी व्यक्त केली हळहळ
13
"सगळं तिनेच केलं, मी नकार दिलेला अन्..."; पोलिसांनी मुसक्या आवळताच सोनमच्या बॉयफ्रेंडची पलटी! 
14
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीला उपासाबरोबरच 'ही' उपासना कराल, तर होईल अधिक लाभ!
15
चांदीचा दर १ लाख ९ हजारांवर, सोनंही लाखांच्या पार; पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
16
Ahmedabad Plane Crash: विमानाची राखरांगोळी, इमारतीचा भाग कोसळला, वाहनांचे सांगाडे; अहमदाबाद दुर्घटनेची भयावह दृश्यं...
17
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
18
Ahmedabad Plane Crash : 242 प्रवासी, 1:17 ला टेकऑफ अन् 1:20 ला क्रॅश...विमान अपघाताचे ताजे अपडेट
19
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
20
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीवितहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?

सांगलीत सिंचन योजनांच्या पाण्यावर नेत्यांनी पिकविली मतांची शेती; ३५ वर्षांनंतरही साखरपेरणी सुरूच

By संतोष भिसे | Updated: April 12, 2024 18:45 IST

ताकारी, म्हैसाळ, टेंभूमधून डझनभर आमदार 

संतोष भिसेसांगली : ताकारी, म्हैसाळ, टेंभू, आरफळ आदी सिंचन योजनांच्या पाण्यावर जिल्ह्यातील शेती फुलली आहेच, शिवाय राजकारण्यांनीही प्रत्येक निवडणुकीत या योजनांचे भांडवल करीत मतांची भरघोस पिके घेतली आहेत. आजवर या योजनांमधून डझनभर आमदार, खासदार आणि मंत्र्यांचे पीक आले आहे. सध्या ३५ वर्षांनंतरही प्रत्येक निवडणुकीत या योजनांच्या पाण्याची साखरपेरणी सुरूच आहे.

जिल्ह्यातील सिंचन योजना म्हणजे राजकारण्यांसाठी निवडणुकीतील प्रचाराचा हमखास मुद्दा ठरत आला आहे. २० टक्के राजकारण आणि ८० टक्के समाजकारण असा बोलघेवडेपणा नेत्यांकडून केला जात असला, तरी सिंचन योजनांबाबतीत मात्र २० टक्केच समाजकारण आणि बाकीचे राजकारण असा शेतकऱ्यांचा अनुभव आहे. त्यामुळेच आज सुमारे ४० वर्षे होत आली तरी, म्हैसाळ योजना १०० टक्के पूर्ण होऊ शकली नाही. नेत्यांनी फक्त घोषणांचा पाऊस पाडला. योजना पूर्ण होऊन शेतीच्या बांधावर पाणी पोहोचावे, यासाठी कुणीच प्रामाणिक प्रयत्न केले नाहीत. आता सध्याच्या लोकसभा निवडणुकीतही या योजनेचा मुद्दा प्रचारात अग्रस्थानी दिसत आहे. अगदी आगामी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारातही याच मुद्द्यावर रान तापलेले दिसणार आहे.कवठेमहांकाळ, मिरज, जत, तासगाव, खानापूर, विटा, आटपाडी या टंचाईग्रस्त तालुक्यांसाठी सिंचन योजनांचा मोठा आधार आहे. त्यांच्या पाण्यावरच अनेकदा निवडणुकीचे पारडे फिरल्याचा अनुभव आहे. त्यामुळेच डॉ. पतंगराव कदम यांच्यापासून आर. आर. पाटील यांच्यापर्यंत प्रत्येक नेत्यासाठी या योजना जिव्हाळ्याच्या राहिल्या आहेत. अगदी अलीकडे विटा - खानापूरचे आमदार अनिल बाबर यांनीही टेंभू, आरफळसाठी सातत्याने प्रतिष्ठा पणाला लावल्याचे पाहायला मिळाले आहे.मिरज - कवठेमहांकाळचे तत्कालीन आमदार अजितराव घोरपडे यांनी म्हैसाळ योजनेच्या जोरावरच आमदारकीला आणि राज्यमंत्रिपदालाही गवसणी घातली होती. त्यांच्यापूर्वी शिवाजीराव शेंडगे यांनीही योजनेच्या आधारे मंत्रिपद मिळविले होते. जतला उमाजीराव सनमडीकर, मधुकर कांबळे, प्रकाश शेंडगे, विलासराव जगताप, विक्रम सावंत, तासगावला सुमनताई पाटील, विटा - खानापूरला सदाशिवराव पाटील, मिरजेला सुरेश खाडे, आटपाडीला राजेंद्रअण्णा देशमुख, गोपीचंद पडळकर यांच्यासाठीही पाणी योजना हा हमखास गुलाल उधळणारा विषय ठरला आहे.

जिल्ह्याचे नेतृत्वही पाण्यावरचजिल्ह्याचे नेतृत्व करायचे, तरी सध्या सिंचन योजनांचे नाणे खणखणीतपणे वाजवावे लागते. अर्थात, यातील राजकारण सोडले, तरी नेत्यांच्या कमी अधिक रेट्यामुळेच आज दुष्काळी भागात गंगा अवतरली आहे, हे मान्य करावे लागते. पतंगराव कदम, आर. आर. पाटील व जयंत पाटील यांनी म्हैसाळ योजना सतत प्रवाहीत ठेवून जिल्ह्याच्या पूर्व भागाला वेळोवेळी दिलासा दिला होता. हीच साखरपेरणी आता लोकसभा निवडणुकीतही सुरू आहे. जतच्या विस्तारित म्हैसाळ योजनेसाठी प्राणपणाने काम करू, अशी ग्वाही शेतकऱ्यांना दिली जात आहे.

टॅग्स :SangliसांगलीWaterपाणीPoliticsराजकारण