शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

भू-संपादनाची शासनाकडून कडेगावला पाचपट भरपाई शेतकऱ्यांना दिलासा : संग्रामसिंह देशमुख यांचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 21:41 IST

कडेपूर : कडेगाव तालुक्यातील शेतीला पाणी देऊन दुष्काळग्रस्त शेतकºयांच्या जीवनात नंदनवन फुलविण्यासाठी शासनाने ताकारी, टेंभू, आरफळ पाणी योजना सुरू केल्या आहेत.

राजेंद्र मोहिते ।कडेपूर : कडेगाव तालुक्यातील शेतीला पाणी देऊन दुष्काळग्रस्त शेतकऱ्याच्या जीवनात नंदनवन फुलविण्यासाठी शासनाने ताकारी, टेंभू, आरफळ पाणी योजना सुरू केल्या आहेत. यासाठी शेतजमिनींचे भू-संपादन करण्यात आले. मात्र, अनेक शेतकऱ्यांना अद्याप नुकसानभरपाई मिळालेली नाही. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी शेतकऱ्यांची बैठक घेऊन त्यांच्या अडचणी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. शासनाने शेतकºयांना आता पाचपट नुकसानभरपाई देण्याचा निर्णय घेतला आहे.

देशमुख यांच्या प्रयत्नामुळे शेतकºयांना तब्बल २० वर्षांनंतर नुकसानभरपाई मिळणार आहे. कडेगाव तालुक्यातील शेतीला पाणी देण्यासाठी नवमहाराष्टÑाचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण आणि माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी ताकारी योजना मंजूर केली. मात्र, या योजनेचा लाभ क्षेत्राबाहेरील शेतीला पाणी देण्यासाठी माजी आमदार संपतराव देशमुख आणि भाजपाचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी टेंभू योजना मंजूर केली.

कृष्णा नदीचे पाणी दुष्काळी भागात येणार असल्याने शेतकऱ्यांनी पाणी योजनांचे मुख्य कालवे, पोटकालवे, शेतचºया खुदाई करण्यास शासनास मोठे सहकार्य केले. मुख्य कालव्यासाठी मोठ्या प्रमाणात शेतजमीन दिल्या. पाणी योजनांची कामे पूर्ण होऊन योजना कार्यान्वित झाल्या. शेतात ऊस पिकू लागला. शेतकरी अर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ लागले. मात्र, ज्या शेतकºयांनी आपली शेतजमीन प्रकल्पासाठी दिली, त्यापैकी अनेकांना अद्याप नुकसानभरपाई मिळालेली नाही.

प्रकल्पग्रस्त, भूमिहीन म्हणून दाखले मिळाले नाहीत. शासकीय कार्यालयात अनेक हेलपाटे घालून कोणी दखल घेत नसल्याचा अनुभव शेतकºयांना येत आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी तालुक्यातील पुनर्वसन आणि प्रकल्पग्रस्त शेतकºयांची शासकीय अधिकाºयांसोबत बैठक घेतली. बैठकीत अनेक शेतकºयांनी प्रशासनाची दिरंगाई होत असल्याच्या आणि भरपाई मिळत नसल्याच्या तक्रारी केल्या.

देशमुख म्हणाले की, पाटबंधारे विभागाच्या अधिकाºयांनी शेतकºयांच्या नुकसानभरपाईचे प्रस्ताव जसे तयार होतील, तसे प्रांताधिकारी कार्यालयाकडे पाठवले पाहिजेत. शेतकºयांची अडवणूक होता कामा नये. शासनाने भू-संपादन केलेल्या शेतीला पाचपट नुकसानभरपाई देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता शेवटच्या शेतकºयास नुकसानभरपाईचा लाभ मिळवून देण्यापर्यंत चळवळ म्हणून काम करणार आहे. यापुढील काळात शासनाने सूक्ष्मसिंंचन व्यवस्थेद्वारे पाणी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पाणी योजनासाठी शेतकºयांना आपल्या जमिनी द्याव्या लागणार नसल्याचे सांगितले.गावोगावी बैठका घ्या : माहिती द्यासंग्रामसिंह देशमुख म्हणाले की, तालुक्यातील पाणी योजनांसाठी मोठ्या प्रमाणात शेतजमिनी गेल्या आहेत. मात्र, अद्याप भरपाई मिळालेली नाही. शासनाने २०१४ मध्ये खासगी वाटाघाटीद्वारे नुकसानभरपाई देण्याचा आदेश दिला आहे. मात्र, कोणतीही कार्यवाही झालेली नाही. अधिकाºयांनी गावोगावी ग्रामसभा व ग्रामपंचायतीमध्ये बैठका घेऊन शेतकºयांना माहिती दिली पाहिजे.

टॅग्स :FarmerशेतकरीSangliसांगली