शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

भू-संपादनाची शासनाकडून कडेगावला पाचपट भरपाई शेतकऱ्यांना दिलासा : संग्रामसिंह देशमुख यांचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 21:41 IST

कडेपूर : कडेगाव तालुक्यातील शेतीला पाणी देऊन दुष्काळग्रस्त शेतकºयांच्या जीवनात नंदनवन फुलविण्यासाठी शासनाने ताकारी, टेंभू, आरफळ पाणी योजना सुरू केल्या आहेत.

राजेंद्र मोहिते ।कडेपूर : कडेगाव तालुक्यातील शेतीला पाणी देऊन दुष्काळग्रस्त शेतकऱ्याच्या जीवनात नंदनवन फुलविण्यासाठी शासनाने ताकारी, टेंभू, आरफळ पाणी योजना सुरू केल्या आहेत. यासाठी शेतजमिनींचे भू-संपादन करण्यात आले. मात्र, अनेक शेतकऱ्यांना अद्याप नुकसानभरपाई मिळालेली नाही. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी शेतकऱ्यांची बैठक घेऊन त्यांच्या अडचणी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. शासनाने शेतकºयांना आता पाचपट नुकसानभरपाई देण्याचा निर्णय घेतला आहे.

देशमुख यांच्या प्रयत्नामुळे शेतकºयांना तब्बल २० वर्षांनंतर नुकसानभरपाई मिळणार आहे. कडेगाव तालुक्यातील शेतीला पाणी देण्यासाठी नवमहाराष्टÑाचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण आणि माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी ताकारी योजना मंजूर केली. मात्र, या योजनेचा लाभ क्षेत्राबाहेरील शेतीला पाणी देण्यासाठी माजी आमदार संपतराव देशमुख आणि भाजपाचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी टेंभू योजना मंजूर केली.

कृष्णा नदीचे पाणी दुष्काळी भागात येणार असल्याने शेतकऱ्यांनी पाणी योजनांचे मुख्य कालवे, पोटकालवे, शेतचºया खुदाई करण्यास शासनास मोठे सहकार्य केले. मुख्य कालव्यासाठी मोठ्या प्रमाणात शेतजमीन दिल्या. पाणी योजनांची कामे पूर्ण होऊन योजना कार्यान्वित झाल्या. शेतात ऊस पिकू लागला. शेतकरी अर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ लागले. मात्र, ज्या शेतकºयांनी आपली शेतजमीन प्रकल्पासाठी दिली, त्यापैकी अनेकांना अद्याप नुकसानभरपाई मिळालेली नाही.

प्रकल्पग्रस्त, भूमिहीन म्हणून दाखले मिळाले नाहीत. शासकीय कार्यालयात अनेक हेलपाटे घालून कोणी दखल घेत नसल्याचा अनुभव शेतकºयांना येत आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी तालुक्यातील पुनर्वसन आणि प्रकल्पग्रस्त शेतकºयांची शासकीय अधिकाºयांसोबत बैठक घेतली. बैठकीत अनेक शेतकºयांनी प्रशासनाची दिरंगाई होत असल्याच्या आणि भरपाई मिळत नसल्याच्या तक्रारी केल्या.

देशमुख म्हणाले की, पाटबंधारे विभागाच्या अधिकाºयांनी शेतकºयांच्या नुकसानभरपाईचे प्रस्ताव जसे तयार होतील, तसे प्रांताधिकारी कार्यालयाकडे पाठवले पाहिजेत. शेतकºयांची अडवणूक होता कामा नये. शासनाने भू-संपादन केलेल्या शेतीला पाचपट नुकसानभरपाई देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता शेवटच्या शेतकºयास नुकसानभरपाईचा लाभ मिळवून देण्यापर्यंत चळवळ म्हणून काम करणार आहे. यापुढील काळात शासनाने सूक्ष्मसिंंचन व्यवस्थेद्वारे पाणी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पाणी योजनासाठी शेतकºयांना आपल्या जमिनी द्याव्या लागणार नसल्याचे सांगितले.गावोगावी बैठका घ्या : माहिती द्यासंग्रामसिंह देशमुख म्हणाले की, तालुक्यातील पाणी योजनांसाठी मोठ्या प्रमाणात शेतजमिनी गेल्या आहेत. मात्र, अद्याप भरपाई मिळालेली नाही. शासनाने २०१४ मध्ये खासगी वाटाघाटीद्वारे नुकसानभरपाई देण्याचा आदेश दिला आहे. मात्र, कोणतीही कार्यवाही झालेली नाही. अधिकाºयांनी गावोगावी ग्रामसभा व ग्रामपंचायतीमध्ये बैठका घेऊन शेतकºयांना माहिती दिली पाहिजे.

टॅग्स :FarmerशेतकरीSangliसांगली