शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
3
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
4
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
5
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
6
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
7
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
8
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
9
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
10
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
11
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
12
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
13
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
14
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
15
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
16
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
17
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
18
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
19
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?

घाटमाथ्यावर जनावरांची तडफड : चाऱ्याचा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 22:12 IST

घाटनांद्रे : कवठेमहांकाळ तालुक्यातील घाटमाथ्यावरील कुची, जाखापूर, कुंडलापूर, गर्जेवाडी, वाघोली, तिसंगी व घाटनांद्रे परिसरात चालूवर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने चारा तयार न

ठळक मुद्देपशुखाद्याचे दरही भडकले; पशुधन जगविणे बनले जिकिरीचे

घाटनांद्रे : कवठेमहांकाळ तालुक्यातील घाटमाथ्यावरील कुची, जाखापूर, कुंडलापूर, गर्जेवाडी, वाघोली, तिसंगी व घाटनांद्रे परिसरात चालूवर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने चारा तयार न झाल्याने व सध्या ओढे, नाले, बंधारे, तलाव कोरडे ठणठणीत असल्याने जनावरांच्या चाºयाचा व पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यातच पशुखाद्याचे दरही गगनला भिडल्याने आपसुकच पशुपालन व दुग्ध व्यवसायावर गंभीर परिणाम झाल्याने बळिराजाचे संपूर्ण अर्थकारणच कोलमडले आहे.

दुष्काळाच्या या दाहकतेने तालुक्यातील घाटमाथ्यावरील १४ हजार पशुधन धोक्यात आले असून, चारा, पाणीटंचाई व पशुखाद्याचे भडकलेले दर यामुळे पशुधन जगविणे कठीण झाले आहे. अनेक पशुपालक शेतकरी जनावरांना बाजाराचा रस्ता दाखवू लागले आहेत. पशू खरेदी करणारे दलालही दर पाडून मागू लागले आहेत. घाटमाथ्यावरील शेतीबरोबरच पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर बनला आहे. सिंचन योजनेचे काम न झाल्याने शेतीच्या, जनावरांच्या व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. सध्या घाटमाथ्यावरील घाटनांद्रे, तिसंगी, गर्जेवाडी, वाघोली, कुंडलापूर, जाखापूर व कुची या सात गावांमध्ये सुमारे साडेतेरा हजारापर्यंत पशुधन असून, तीव्र चारा व पाणीटंचाईत ते जतन करणे कसरतीचे बनले आहे.

सध्या कडब्याचे दर शेकडा १४०० ते १५०० पर्यंत असून त्यात गोळीपेंड, शेंगपेंड, सरकी पेंड, गहूआटा याचेही दर गगनाला भिडले आहेत. दुसरीकडे घाटमाथ्यावर चालूवर्षी पाऊस सरासरीपेक्षा कमी झाल्याने ओढे, नाले, बंधारे व तलाव कोरडे ठणठणीत असून, विहिरी व कूपनलिकांनी तळ गाठला आहे. दिवसाकाठी मोठ्या जनावरांना १०० लिटर, तर लहान जनावरांना किमान ५० लिटर पाणी लागते. ते उपलब्ध होण्यासाठी कोणतेही स्रोत शेतकºयांकडे उपलब्ध नाहीत. त्यामुळे जनावरे कशी जगवायची? हा प्रश्न शेतकºयांसमोर आहे.

पर्यायाने शेतीस पूरक अशा दुग्ध व्यवसायावर विपरित परिणाम झाला आहे. तीव्र उन्हामुळे जनावरांना विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. यावर मात करण्यासाठी तात्काळ टेंभू जलसिंचन योजनेचे काम सुरू करणे गरजेचे आहे. पण राजकीय नेते मात्र नेहमीसारखे आज-उद्याचा पुकारा करताना दिसत आहेत. शेतकरी राजा तीव्रतेने टेंभू योजनेची प्रतीक्षा करताना दिसत आहे.गाव गाई म्हैशी शेळ्या-मेंढ्यातिसंगी ४८७ ६३२ ५३१गर्जेवाडी १२७ १६४ १८४कुंडलापूर २१६ २६१ २५६घाटनांद्रे ४६७ ९९९ ८७१वाघोली १४५ २६३ १३४जाखापूर १९१६ २७३० १७३९कुची ४५२ ७५५ ५८३सरकी पेंड -७०० रूपये ( ५० कि.)गोळी पेंड - १२०० रूपये (६० कि.)गहू आटा-९०० रूपये (५० कि.)शेंग पेंड - १४०० ते १५००कडबा- १४०० ते १५००( शेकडा)हे सध्याचे दर असून, तेही स्थिर नसून त्यात वाढच होत आहे.

टॅग्स :SangliसांगलीMarketबाजार