शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

घाटमाथ्यावर जनावरांची तडफड : चाऱ्याचा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 22:12 IST

घाटनांद्रे : कवठेमहांकाळ तालुक्यातील घाटमाथ्यावरील कुची, जाखापूर, कुंडलापूर, गर्जेवाडी, वाघोली, तिसंगी व घाटनांद्रे परिसरात चालूवर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने चारा तयार न

ठळक मुद्देपशुखाद्याचे दरही भडकले; पशुधन जगविणे बनले जिकिरीचे

घाटनांद्रे : कवठेमहांकाळ तालुक्यातील घाटमाथ्यावरील कुची, जाखापूर, कुंडलापूर, गर्जेवाडी, वाघोली, तिसंगी व घाटनांद्रे परिसरात चालूवर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने चारा तयार न झाल्याने व सध्या ओढे, नाले, बंधारे, तलाव कोरडे ठणठणीत असल्याने जनावरांच्या चाºयाचा व पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यातच पशुखाद्याचे दरही गगनला भिडल्याने आपसुकच पशुपालन व दुग्ध व्यवसायावर गंभीर परिणाम झाल्याने बळिराजाचे संपूर्ण अर्थकारणच कोलमडले आहे.

दुष्काळाच्या या दाहकतेने तालुक्यातील घाटमाथ्यावरील १४ हजार पशुधन धोक्यात आले असून, चारा, पाणीटंचाई व पशुखाद्याचे भडकलेले दर यामुळे पशुधन जगविणे कठीण झाले आहे. अनेक पशुपालक शेतकरी जनावरांना बाजाराचा रस्ता दाखवू लागले आहेत. पशू खरेदी करणारे दलालही दर पाडून मागू लागले आहेत. घाटमाथ्यावरील शेतीबरोबरच पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर बनला आहे. सिंचन योजनेचे काम न झाल्याने शेतीच्या, जनावरांच्या व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. सध्या घाटमाथ्यावरील घाटनांद्रे, तिसंगी, गर्जेवाडी, वाघोली, कुंडलापूर, जाखापूर व कुची या सात गावांमध्ये सुमारे साडेतेरा हजारापर्यंत पशुधन असून, तीव्र चारा व पाणीटंचाईत ते जतन करणे कसरतीचे बनले आहे.

सध्या कडब्याचे दर शेकडा १४०० ते १५०० पर्यंत असून त्यात गोळीपेंड, शेंगपेंड, सरकी पेंड, गहूआटा याचेही दर गगनाला भिडले आहेत. दुसरीकडे घाटमाथ्यावर चालूवर्षी पाऊस सरासरीपेक्षा कमी झाल्याने ओढे, नाले, बंधारे व तलाव कोरडे ठणठणीत असून, विहिरी व कूपनलिकांनी तळ गाठला आहे. दिवसाकाठी मोठ्या जनावरांना १०० लिटर, तर लहान जनावरांना किमान ५० लिटर पाणी लागते. ते उपलब्ध होण्यासाठी कोणतेही स्रोत शेतकºयांकडे उपलब्ध नाहीत. त्यामुळे जनावरे कशी जगवायची? हा प्रश्न शेतकºयांसमोर आहे.

पर्यायाने शेतीस पूरक अशा दुग्ध व्यवसायावर विपरित परिणाम झाला आहे. तीव्र उन्हामुळे जनावरांना विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. यावर मात करण्यासाठी तात्काळ टेंभू जलसिंचन योजनेचे काम सुरू करणे गरजेचे आहे. पण राजकीय नेते मात्र नेहमीसारखे आज-उद्याचा पुकारा करताना दिसत आहेत. शेतकरी राजा तीव्रतेने टेंभू योजनेची प्रतीक्षा करताना दिसत आहे.गाव गाई म्हैशी शेळ्या-मेंढ्यातिसंगी ४८७ ६३२ ५३१गर्जेवाडी १२७ १६४ १८४कुंडलापूर २१६ २६१ २५६घाटनांद्रे ४६७ ९९९ ८७१वाघोली १४५ २६३ १३४जाखापूर १९१६ २७३० १७३९कुची ४५२ ७५५ ५८३सरकी पेंड -७०० रूपये ( ५० कि.)गोळी पेंड - १२०० रूपये (६० कि.)गहू आटा-९०० रूपये (५० कि.)शेंग पेंड - १४०० ते १५००कडबा- १४०० ते १५००( शेकडा)हे सध्याचे दर असून, तेही स्थिर नसून त्यात वाढच होत आहे.

टॅग्स :SangliसांगलीMarketबाजार