शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
3
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
4
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
5
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
6
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
7
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
8
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
9
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
10
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
11
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
12
शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; Nifty रेड झोनमध्ये, 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी तेजी
13
"एकटीच राहते, मुलगा माझ्यासोबत राहत नाही...", ७९ वर्षीय उषा नाडकर्णी जगताहेत एकाकी जीवन, दुःख व्यक्त करत म्हणाल्या...
14
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
15
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
16
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
17
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
18
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
19
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
20
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ

कृष्णा नदी प्रदूषण: दत्त इंडिया कारखाना, स्वप्नपूर्तीची डिस्टलरी अखेर बंद, प्रदूषण नियंत्रण मंडळाचा दणका 

By शीतल पाटील | Updated: March 15, 2023 13:06 IST

कृष्णा नदी प्रदुषणाबाबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्यासह भाजपच्या आमदारांनी लक्षवेधी व ताराकिंत प्रश्न उपस्थित केला

सांगली : कृष्णा नदीप्रदूषणाची गंभीर दखल घेत, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने वसंतदादा साखर कारखाना चालविणाऱ्या दत्त इंडिया कंपनीसह स्वप्नपुर्ती शुगर्सला डिस्टलरी बंद करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार मंगळवारी डिस्टलरीचा प्रकल्प बंद करण्यात आला. तर रात्री उशिरा साखर कारखानाही बंद करणार असल्याचे दत्त इंडियाचे व्यवस्थापक शरद मोरे यांनी सांगितले. तर महापालिकेने नदी प्रदुषणाची कबुली दिली असली तरी ठोस उपाययोजनाबाबत मात्र मौन पाळले आहे.दरम्यान, प्रदुषण नियंत्रण मंडळाने महापालिका, दत्त इंडिया व स्वप्नपूर्ती शुगर्सवर फौजदारी दाखल करण्याची तयारी चालविली आहे. चार दिवसांपूर्वी कृष्णा नदीत अंकलीजवळ मासे मृत झाले. प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्रदूषणाचा स्रोत शोधून काढत दत्त इंडिया कंपनी व स्वप्नपुर्ती शुगर्सला नोटीस बजावली होती. उपप्रादेशिक प्रदूषण नियंत्रण अधिकारी नवनाथ अवताडे यांनी अहवाल महाराष्ट्र प्रदूषण मंडळाला पाठविला होता. त्याची दखल घेत दोन्ही कंपन्यांना सोमवारी नोटीस बजावण्यात आली.वसंतदादा साखर कारखाना सध्या श्री दत्त इंडिया कंपनी चालवित आहे, तर कारखान्याची डिस्टलरी स्वप्नपूर्ती शुगर लिमिटेडकडे आहे. त्यामुळे दोन्ही कंपन्यांनी तातडीने कारखाने बंद करावेत, असे आदेश दिले होते. या आदेशानंतर स्वप्नपूर्ती शुगर्सने डिस्टलरी प्रकल्प बंद केला आहे. तशी लेखी माहिती प्रदुषण नियंत्रण मंडळाला दिली आहे. तर दत्त इंडियाकडून रात्री उशिरा साखर कारखान्याचे गाळप बंद करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.

वीज, पाणी तोडण्याचा अहवाल मागविलाप्रदुषण नियंत्रण मंडळाने साखर कारखाना व डिस्टलरी प्रकल्पाचा वीज व पाणीपुरवठा खंडीत करण्याचे आदेश महावितरण कंपनी व पाटंबधारे विभागाला दिले होते. या दोन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांनी साखर कारखाना व डिस्टलरीला भेट दिली. पण वीज व पाणी पुरवठा तो़डल्याबाबत कुठलाही अहवाल प्रदुषण नियंत्रण मंडळाला सादर केलेला नाही. याबाबत दोन्ही विभागाकडून बुधवारी अहवाल मागविणार असल्याचे अवताडे यांनी सांगितले.

शेरीनाल्याचे पाणी नदीपात्रातनदी प्रदुषणावरून टीकेची झोड उठली असताना महापालिकेने शेरीनाल्याबाबत ठोस कृती केलेली नाही. मंगळवारीही शेरीनाल्याचे पाणी थेट नदीपात्रात मिसळत होते. दोन पंपाद्वारे सांडपाणी बंधाऱ्याखाली सोडले होते.

विधीमंडळात लक्षवेधीकृष्णा नदी प्रदुषणाबाबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्यासह भाजपच्या आमदारांनी लक्षवेधी व ताराकिंत प्रश्न उपस्थित केला आहे. त्यामुळे हा विषय विधीमंडळातही गाजण्याची चिन्हे आहेत.

टॅग्स :Sangliसांगलीriverनदीpollutionप्रदूषणSugar factoryसाखर कारखाने