शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

कृष्णाकाठचा ढाण्या वाघ शांत झाला, बापू बिरू वाटेगावकरांचे दीर्घ आजाराने निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 3:54 AM

जिवंतपणी दंतकथा बनून राहिलेल्या आणि पश्चिम महाराष्ट्रातील गावगुंडांच्या व खासगी सावकारीविरोधात चाळीस वर्षे रक्तरंजीत लढा देणा-या बापू बिरू वाटेगावकर यांचे मंगळवारी दीर्घ आजाराने निधन झाले.

बोरगाव (जि. सांगली) : जिवंतपणी दंतकथा बनून राहिलेल्या आणि पश्चिम महाराष्ट्रातील गावगुंडांच्या व खासगी सावकारीविरोधात चाळीस वर्षे रक्तरंजीत लढा देणा-या बापू बिरू वाटेगावकर (रा. बोरगाव, ता. वाळवा, जि. सांगली) यांचे मंगळवारी दीर्घ आजाराने निधन झाले. ते ९६ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर उद्या (बुधवार) दुपारी एक वाजता कृष्णातीरावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात मुलगा, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

नव्वदीनंतरही तब्येत ठणठणीत, वाणी खणखणीत असणा-या बापू बिरू यांच्यावर पुण्यात जुलैमध्ये सांधे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाली होती. त्यातच अन्ननलिकेच्या कर्करोगाने त्यांना ग्रासले होते. उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. ‘कृष्णाकाठचा ढाण्या वाघ’ अशी ओळख असणाºया बापू बिरूंचा जन्म १ जानेवारी १९२२ रोजी झाला. अन्यायाविरोधात पेटून उठून गुन्हेगारी क्षेत्राकडे वळलेले बापू बिरू गरिबांचा ‘रॉबिनहूड’ बनले होते. १९६५च्या दरम्यान बोरगावातील गावगुंडांनी थैमान घातले होते. त्यावेळी अतिशय गरीब परिस्थितीतून पहिलवानकी करणाºया बापू बिरूंनी हातात कुºहाड व बंदूक घेऊन बंड पुकारले. कृष्णाकाठी गोरगरिबांवर अन्याय करणारे खासगी सावकार, तसेच महिलांवर वाईट नजर ठेवणाºया, अत्याचार करणाºया गुंडांविरोधात त्यांनी आवाज उठवला. त्यांनी कित्येकांची कर्जे मुक्त केली. सावकारी पाशात अडकलेल्या जमिनी सोडवून दिल्या. अनेक महिलांचे संसार उभे केले.

‘बापू बिरू’ हे नाव कृष्णा खोºयात घेतले तर गुंड थरथर कापत. या सा-यातून त्यांच्यावर खुनाचे तब्बल १२ गुन्हे दाखल झाले होते. २५ वर्षे ते पोलिसांना गुंगारा देत होते. नंतर त्यांनी पोलिसांसमोर शरणागती पत्करली. खुनाच्या आरोपात त्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली. पंधरा वर्षांपूर्वी पुण्याचा येरवडा कारागृहातून जन्मठेपेची शिक्षा भोगून ते बाहेर आले होते. गावात परतल्यानंतर त्यांनी अध्यात्म आणि धनगर समाजाच्या कार्यासाठी स्वत:ला वाहून घेतले होते. ‘आप्पा महाराज’ या टोपणनावाने ते परिचित होते. माळकरी असल्याने ते भजन, प्रवचनात रमले होते.त्यांच्या जीवन चरित्रावर अनेक पोवाडे, वगनाट्य, चित्रपट बनले आहेत. तमाशासम्राज्ञी मंगला बनसोडे यांचे ‘कृष्णाकाठचा फरारी’ हे वगनाट्य तुफान गाजले. शिवशाहीर बाबासाहेब देशमुख यांनी रचलेला आणि गायलेला पोवाडाही प्रसिद्ध झाला.परस्त्रीचे अपहरण करणाºया स्वत:च्या मुलालाही संपविलेपरस्त्रीकडे कोणीही वाईट नजरेने पहायचे नाही, हा बापू बिरूंचा दंडक होता. यासाठी वेळप्रसंगी त्यांनी कुºहाड आणि बंदूकही चालवली. त्यांचा थोरला मुलगा तानाजीने परस्त्रीचे अपहरण केल्यावर त्यालासुद्धा त्यांनी गोळी घालून ठार केले.