शहरं
Join us  
Trending Stories
1
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
2
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
3
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
4
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
5
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
6
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
7
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
8
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
9
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
10
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
11
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
12
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
13
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
14
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
15
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
16
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
17
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
18
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
19
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
20
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर, सांगलीकरांना आता पुणे स्टेशनमध्ये ‘नो एन्ट्री’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:29 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : पुणे स्थानकातील रेल्वेगाड्यांची कोंडी कमी करण्यासाठी घोरपडीमध्ये क्वॉड लाईनचा (बायपास) प्रस्ताव मध्य रेल्वेच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : पुणे स्थानकातील रेल्वेगाड्यांची कोंडी कमी करण्यासाठी घोरपडीमध्ये क्वॉड लाईनचा (बायपास) प्रस्ताव मध्य रेल्वेच्या विचारात आहे, त्यामुळे सांगली, सातारा, कोल्हापूरसह दक्षिणेकडून जाणाऱ्या प्रवाशांना आता पुणे स्थानकात उतरता येणार नाही. घोरपडी किंवा हडपसरला उतरावे लागेल.

पुणे स्थानकात फक्त सहा फलाट आहेत. जागेअभावी विस्तारावर मर्यादा येत आहेत. त्यामुळे घोरपडी स्थानकात क्वॉड लाईनचा प्रस्ताव पुढे आला आहे. घोरपडी स्थानक ऑक्टोबर २०१९ मध्ये बंद करण्यात आले. आता तेथे एक अतिरिक्त फलाट तयार केला जाईल. कोल्हापूर-सांगलीसह दक्षिणेकडून जाणाऱ्या रेल्वे पुण्याऐवजी घोरपडीमध्येच थांबतील. प्रवाशांच्या चढ-उतारानंतर हडपसरमार्गे दौंडला व तेथून उत्तरेला मार्गस्थ होतील. त्यामुळे प्रवाशांना घोरपडीलाच उतरावे लागेल. तेथून पुणे स्थानक अवघ्या दोन-तीन किलोमीटरवर असल्याने प्रवाशांना फार त्रास होणार नाही, असा रेल्वेचा दावा आहे. मुंबईकडे जाणाऱ्या गाड्या मात्र पुणे स्थानकातच थांबतील. बायपास लाईनचा प्रयोग दौंड स्थानकात वर्षभरापूर्वीच झाला आहे. दिल्लीकडे जाणाऱ्या गाड्या दौंड स्थानकात न थांबता पुढे सुमारे दीड किलोमीटरवर थांबतात. तेथे इंजिन बदलावे लागत नसल्याने सुमारे अर्धा तास वेळेची बचत झाली आहे.

चौकट

या गाड्या पुणे स्थानकात जाणार नाहीत

महाराष्ट्र एक्स्प्रेस, कोल्हापूर-निजामुद्दीन, म्हैसूर-निजामुद्दीन, गोवा एक्स्प्रेस आदी गाड्या पुणे स्थानकात जाणार नाहीत, घोरपडीमधूनच नागपूर, दिल्लीकडे वळतील.

चौकट

मिरजेत वर्षाला ६००० तास वाया

सोलापूर व बेंगलोरकडून कोल्हापूरला येणाऱ्या रेल्वेगाड्या इंजिनाची दिशा बदलण्यासाठी मिरजेत थांबतात. त्यासाठी अर्धा तासांचा वेळ जातो. डिझेलही मोठ्या प्रमाणात खर्ची पडते. प्रवासी आणि मालगाड्यांच्या इंजिन बदलासाठी मिरजेत वर्षभरात हजार तासांचा वेळ वाया गेल्याचे रेल्वेचे निरीक्षण आहे. त्यावर उपाय म्हणून कृष्णाघाट रेल्वे गेटपासून स्वतंत्र बायपास लाईनचा (क्वाड) प्रस्ताव आहे. गेटपासून निघालेली लाईन कोल्हापूर रेल्वे चाळीजवळ कोल्हापूर लोहमार्गाला जोडली जाईल. त्यामुळे काही गाड्या, विशेषत: मालगाड्यांना मिरज स्थानकात जाण्याची गरज राहणार नाही. इंजिनही बदलावे लागणार नसल्याने वेळ व डिझेलची बचत होईल.