शहरं
Join us  
Trending Stories
1
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
2
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
3
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
4
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
5
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
6
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
7
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
8
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
9
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
10
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
11
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
12
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
13
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
14
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
15
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
16
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
17
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
18
Who Is Yash Rathod : विदर्भाची रन मशीन! पोट्याचं द्विशतक अवघ्या ६ धावांनी हुकलं
19
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
20
यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला...

कोल्हापूर, सांगलीकरांना आता पुणे स्टेशनमध्ये ‘नो एन्ट्री’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:29 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : पुणे स्थानकातील रेल्वेगाड्यांची कोंडी कमी करण्यासाठी घोरपडीमध्ये क्वॉड लाईनचा (बायपास) प्रस्ताव मध्य रेल्वेच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : पुणे स्थानकातील रेल्वेगाड्यांची कोंडी कमी करण्यासाठी घोरपडीमध्ये क्वॉड लाईनचा (बायपास) प्रस्ताव मध्य रेल्वेच्या विचारात आहे, त्यामुळे सांगली, सातारा, कोल्हापूरसह दक्षिणेकडून जाणाऱ्या प्रवाशांना आता पुणे स्थानकात उतरता येणार नाही. घोरपडी किंवा हडपसरला उतरावे लागेल.

पुणे स्थानकात फक्त सहा फलाट आहेत. जागेअभावी विस्तारावर मर्यादा येत आहेत. त्यामुळे घोरपडी स्थानकात क्वॉड लाईनचा प्रस्ताव पुढे आला आहे. घोरपडी स्थानक ऑक्टोबर २०१९ मध्ये बंद करण्यात आले. आता तेथे एक अतिरिक्त फलाट तयार केला जाईल. कोल्हापूर-सांगलीसह दक्षिणेकडून जाणाऱ्या रेल्वे पुण्याऐवजी घोरपडीमध्येच थांबतील. प्रवाशांच्या चढ-उतारानंतर हडपसरमार्गे दौंडला व तेथून उत्तरेला मार्गस्थ होतील. त्यामुळे प्रवाशांना घोरपडीलाच उतरावे लागेल. तेथून पुणे स्थानक अवघ्या दोन-तीन किलोमीटरवर असल्याने प्रवाशांना फार त्रास होणार नाही, असा रेल्वेचा दावा आहे. मुंबईकडे जाणाऱ्या गाड्या मात्र पुणे स्थानकातच थांबतील. बायपास लाईनचा प्रयोग दौंड स्थानकात वर्षभरापूर्वीच झाला आहे. दिल्लीकडे जाणाऱ्या गाड्या दौंड स्थानकात न थांबता पुढे सुमारे दीड किलोमीटरवर थांबतात. तेथे इंजिन बदलावे लागत नसल्याने सुमारे अर्धा तास वेळेची बचत झाली आहे.

चौकट

या गाड्या पुणे स्थानकात जाणार नाहीत

महाराष्ट्र एक्स्प्रेस, कोल्हापूर-निजामुद्दीन, म्हैसूर-निजामुद्दीन, गोवा एक्स्प्रेस आदी गाड्या पुणे स्थानकात जाणार नाहीत, घोरपडीमधूनच नागपूर, दिल्लीकडे वळतील.

चौकट

मिरजेत वर्षाला ६००० तास वाया

सोलापूर व बेंगलोरकडून कोल्हापूरला येणाऱ्या रेल्वेगाड्या इंजिनाची दिशा बदलण्यासाठी मिरजेत थांबतात. त्यासाठी अर्धा तासांचा वेळ जातो. डिझेलही मोठ्या प्रमाणात खर्ची पडते. प्रवासी आणि मालगाड्यांच्या इंजिन बदलासाठी मिरजेत वर्षभरात हजार तासांचा वेळ वाया गेल्याचे रेल्वेचे निरीक्षण आहे. त्यावर उपाय म्हणून कृष्णाघाट रेल्वे गेटपासून स्वतंत्र बायपास लाईनचा (क्वाड) प्रस्ताव आहे. गेटपासून निघालेली लाईन कोल्हापूर रेल्वे चाळीजवळ कोल्हापूर लोहमार्गाला जोडली जाईल. त्यामुळे काही गाड्या, विशेषत: मालगाड्यांना मिरज स्थानकात जाण्याची गरज राहणार नाही. इंजिनही बदलावे लागणार नसल्याने वेळ व डिझेलची बचत होईल.